ETV Bharat / state

धुळे : विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

author img

By

Published : Mar 12, 2020, 9:29 PM IST

Updated : Mar 12, 2020, 9:58 PM IST

विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून अभिजित मोतीलाल पाटील यांनी तर भाजपकडून माजीमंत्री अमरीश पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

धुळे: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर
धुळे: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर

धुळे - विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांनी, तर भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. निवडणुकीत आमचाच विजयी होणार असल्याचा दावा महाविकास आघाडी आणि भाजपकडून करण्यात येत आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर

विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आपला विजय निश्चित होणार असल्याचा दावा महाविकास आघाडी आणि भाजपकडून करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांनी, तर भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी गंगाथरन डी यांच्याकडे सादर केला.

हेही वाचा - धुळ्यात लाचखोर वनक्षेत्रपाल एसीबीच्या जाळ्यात; 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

जिल्ह्यात काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने ही उमेदवारी काँग्रेसच्या उमेदवाराला देण्यात आली आहे. यामुळे आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वास चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी व्यक्त केला. तर, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता असल्याने आमचा विजय निश्चित आहे, असा दावा माजी मंत्री अमरीश पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना

धुळे - विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांनी, तर भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. निवडणुकीत आमचाच विजयी होणार असल्याचा दावा महाविकास आघाडी आणि भाजपकडून करण्यात येत आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर

विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आपला विजय निश्चित होणार असल्याचा दावा महाविकास आघाडी आणि भाजपकडून करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून नंदुरबार जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांनी, तर भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी गंगाथरन डी यांच्याकडे सादर केला.

हेही वाचा - धुळ्यात लाचखोर वनक्षेत्रपाल एसीबीच्या जाळ्यात; 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

जिल्ह्यात काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने ही उमेदवारी काँग्रेसच्या उमेदवाराला देण्यात आली आहे. यामुळे आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वास चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी व्यक्त केला. तर, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता असल्याने आमचा विजय निश्चित आहे, असा दावा माजी मंत्री अमरीश पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना

Last Updated : Mar 12, 2020, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.