ETV Bharat / state

मुख्यमंत्री महोदय सांगा 'आम्ही मरावं किती' बळीराजाचा संतप्त सवाल - राजुरा शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे वाघ ठार करण्याची मागणी

आरटी वन वाघाला ठार करा, ही मागणी लावून धरत शेतकरी संघटनेचा नेतृत्वाखाली विरूर वनपरीक्षेत्र कार्यालयापुढे शेतकरी, शेतमजुरांचे धरणे आंदोलन सूरू आहे. धरणे आंदोलनात राजूरा तालुक्यातील २८ गावातील शेकडो शेतकरी, शेतमजूरांनी सहभाग घेतला आहे. आंदोलनात शेतकरी नेते अॕड.वामनराव चटप, प्रभाकर ढवस, कपील इदे, डाॕ. गंगाधर बोडे, सूरेश आस्वले, आबाजी ढवस, जिवन आमने उपस्थित होते.

rajuara village farmer demand to cm thackeray to killed rt1 tiger at chandrapur
मुख्यमंत्री महोदय सांगा 'आम्ही मरावं किती' बळीराजाचा संतप्त सवाल
author img

By

Published : Oct 19, 2020, 4:09 PM IST

Updated : Oct 19, 2020, 5:28 PM IST

राजूरा (चंद्रपूर) - मुख्यमंत्री, वनमंत्री महोदाय " सांगा आम्ही मरावं किती " असा संतप्त सवाल बळीराजाने केला आहे. आरटी वन वाघाचा हल्ल्यात दहा शेतकरी, शेतमजूर ठार झाले आहेत. तर पशुधनाचेही मोठे नुकसान वाघाने केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा सयमाचा बांध फुटला आहे. आरटी वन वाघाला ठार करा, अशी मागणी करत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचे विरूर वन कार्यालयासमोर धरणे आंदोलन सूरू आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना नेते
राजूरा तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या आरटी वन वाघाने दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतला. पशुधनाचेही वाघाने मोठे नुकसान केले. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सूरू आहेत. मात्र, अद्याप वनविभागाला यश आले नाही. वाघचा भितीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले. कापूस तोडणीला आला. धान कापणीला आला आहे. मात्र, वाघाचा भितीने शेतकामे रखळली आहेत. परिणामी शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे बळीराजाचा सयमाचा बांध फुटला. आरटी वन वाघाला ठार करा, ही मागणी लावून धरत शेतकरी संघटनेचा नेतृत्वाखाली विरूर वनपरीक्षेत्र कार्यालयापुढे शेतकरी, शेतमजुरांचे धरणे आंदोलन सूरू आहे. धरणे आंदोलनात राजूरा तालुक्यातील २८ गावातील शेकडो शेतकरी, शेतमजूरांनी सहभाग घेतला आहे. आंदोलनात शेतकरी नेते अॕड.वामनराव चटप, प्रभाकर ढवस, कपील इदे, डाॕ. गंगाधर बोडे, सूरेश आस्वले, आबाजी ढवस, जिवन आमने उपस्थित होते.या आहेत मागण्या१ ) राजूरा व विरूर वनक्षेत्रातील नरभक्षी आरटी वन वाघाला ठार मारण्याची तात्काळ परवानगी द्या २ ) साप हा वन्यप्राणी असल्यामुळे साप चावून मरणाऱ्या व्यक्तीस इतर प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत द्या३ ) वाघाने बळी घेतलेल्या कुटूंबातील एका व्यक्तीला वनखात्यात नोकरी द्या.

राजूरा (चंद्रपूर) - मुख्यमंत्री, वनमंत्री महोदाय " सांगा आम्ही मरावं किती " असा संतप्त सवाल बळीराजाने केला आहे. आरटी वन वाघाचा हल्ल्यात दहा शेतकरी, शेतमजूर ठार झाले आहेत. तर पशुधनाचेही मोठे नुकसान वाघाने केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा सयमाचा बांध फुटला आहे. आरटी वन वाघाला ठार करा, अशी मागणी करत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचे विरूर वन कार्यालयासमोर धरणे आंदोलन सूरू आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना नेते
राजूरा तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या आरटी वन वाघाने दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतला. पशुधनाचेही वाघाने मोठे नुकसान केले. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सूरू आहेत. मात्र, अद्याप वनविभागाला यश आले नाही. वाघचा भितीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले. कापूस तोडणीला आला. धान कापणीला आला आहे. मात्र, वाघाचा भितीने शेतकामे रखळली आहेत. परिणामी शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे बळीराजाचा सयमाचा बांध फुटला. आरटी वन वाघाला ठार करा, ही मागणी लावून धरत शेतकरी संघटनेचा नेतृत्वाखाली विरूर वनपरीक्षेत्र कार्यालयापुढे शेतकरी, शेतमजुरांचे धरणे आंदोलन सूरू आहे. धरणे आंदोलनात राजूरा तालुक्यातील २८ गावातील शेकडो शेतकरी, शेतमजूरांनी सहभाग घेतला आहे. आंदोलनात शेतकरी नेते अॕड.वामनराव चटप, प्रभाकर ढवस, कपील इदे, डाॕ. गंगाधर बोडे, सूरेश आस्वले, आबाजी ढवस, जिवन आमने उपस्थित होते.या आहेत मागण्या१ ) राजूरा व विरूर वनक्षेत्रातील नरभक्षी आरटी वन वाघाला ठार मारण्याची तात्काळ परवानगी द्या २ ) साप हा वन्यप्राणी असल्यामुळे साप चावून मरणाऱ्या व्यक्तीस इतर प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत द्या३ ) वाघाने बळी घेतलेल्या कुटूंबातील एका व्यक्तीला वनखात्यात नोकरी द्या.
Last Updated : Oct 19, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.