ETV Bharat / state

इतवारी- नागभिड नॅरोगेज होणार ब्रॉडगेज; नॅरोगेज ट्रेनची धडधड थांबणार

author img

By

Published : Nov 24, 2019, 8:05 PM IST

रेल्वे वाहतूक अजून सुखरूप, सुरळीत व गतिशील करण्याकरीता देशातील सर्व नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात आले. याप्रमाणे इतवारी-नागभिड ब्रॉडगेज प्रकल्पास देखील मंजुरी मिळाल्याने मध्य भारतातील शेवटची नॅरोगेज ट्रेनची धडधड अखेर २५ नोव्हेंबरला थांबणार आहे.

नागपूर-नागभिड ट्रेन

चंद्रपूर- स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज अधिकारी, सैनिक आणि भारतीयांना प्रवास करता यावे यासाठी देशात रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात आले होते. या पैकी एक मार्ग म्हणजे नागपूर-नागभिड नॅरोगेज आहे. रेल्वे वाहतूक अजून सुखरूप, सुरळीत व गतिशील करण्याकरिता देशातील सर्व नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात आले. याप्रमाणे इतवारी-नागभिड ब्रॉडगेज प्रकल्पास देखील मंजुरी मिळाल्याने मध्य भारतातील शेवटची नॅरोगेज ट्रेनची धडधड अखेर २५ नोव्हेंबरला थांबणार आहे.

इतवारी- नागभिड नॅरोगेज होणार ब्रॉडगेज

इंग्रजी राजवटीत १९१३ मध्ये नागपूर-नागभिड ट्रेन सुरू करण्यात आली. तेव्हापासून नॅरोगेज ट्रेनच्या धडधडीसोबत चंद्रपूर, गडचिरोली व भंडारातील नागरीकांच्या जीवनाची धडधड जुडली आहे. इतवारी रेल्वे स्टेशनमधून सुटल्यानंतर सोळा थांबे पार करीत साडे चार तासाने नागभिडला ही ट्रेन पोहचत होती. नॅरोगेज मार्ग आणी ट्रेनच्या मर्यादा लक्षात घेता गेली अनेक वर्षांपासून ब्रॉडगेज मार्गाची मागणी नागरीक आणी लोकप्रतिनिधी मार्फत केली जात होती. त्याप्रमाणे २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये यास मान्यता मिळाली. नॅरोगेजचे ब्रॉडगेज रुपांतर करण्याकरीता ९९२ कोटी अपेक्षीत खर्च असून प्रत्यक्ष कामास १ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे.

मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर, या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रुपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागभीड-भिवापूर दुसऱ्या टप्प्यात भिवापूर-उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड-नागपूर असे विद्युतीकरणासह काम होणार असल्याची माहिती आहे.

सर्वसामान्यांना पडणार भुर्दंड

या मार्गाचे बांधकाम २१ ते ३६ महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. मात्र, नॅरोगेज रेल्वेत दही दुध, भाजीपाला विकणारे, नोकरदार, कामगार, आणि विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये जाणे येणे व्हायचे. आता रेल्वे बंद होणार असल्याने आणि ब्रॉडगेजचे काम पूर्ण होण्याकरीता लागणाऱ्या कालावधीपर्यंत नागरिकांना जादाचे पैसे देऊन प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा भुर्दंड पडणार असल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा- येथे 'प्रकाश' रुसलाय...! विकसित चंद्रपूर जिल्ह्यातील शोकांतिका

चंद्रपूर- स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज अधिकारी, सैनिक आणि भारतीयांना प्रवास करता यावे यासाठी देशात रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात आले होते. या पैकी एक मार्ग म्हणजे नागपूर-नागभिड नॅरोगेज आहे. रेल्वे वाहतूक अजून सुखरूप, सुरळीत व गतिशील करण्याकरिता देशातील सर्व नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात आले. याप्रमाणे इतवारी-नागभिड ब्रॉडगेज प्रकल्पास देखील मंजुरी मिळाल्याने मध्य भारतातील शेवटची नॅरोगेज ट्रेनची धडधड अखेर २५ नोव्हेंबरला थांबणार आहे.

इतवारी- नागभिड नॅरोगेज होणार ब्रॉडगेज

इंग्रजी राजवटीत १९१३ मध्ये नागपूर-नागभिड ट्रेन सुरू करण्यात आली. तेव्हापासून नॅरोगेज ट्रेनच्या धडधडीसोबत चंद्रपूर, गडचिरोली व भंडारातील नागरीकांच्या जीवनाची धडधड जुडली आहे. इतवारी रेल्वे स्टेशनमधून सुटल्यानंतर सोळा थांबे पार करीत साडे चार तासाने नागभिडला ही ट्रेन पोहचत होती. नॅरोगेज मार्ग आणी ट्रेनच्या मर्यादा लक्षात घेता गेली अनेक वर्षांपासून ब्रॉडगेज मार्गाची मागणी नागरीक आणी लोकप्रतिनिधी मार्फत केली जात होती. त्याप्रमाणे २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये यास मान्यता मिळाली. नॅरोगेजचे ब्रॉडगेज रुपांतर करण्याकरीता ९९२ कोटी अपेक्षीत खर्च असून प्रत्यक्ष कामास १ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे.

मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर, या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रुपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागभीड-भिवापूर दुसऱ्या टप्प्यात भिवापूर-उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड-नागपूर असे विद्युतीकरणासह काम होणार असल्याची माहिती आहे.

सर्वसामान्यांना पडणार भुर्दंड

या मार्गाचे बांधकाम २१ ते ३६ महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. मात्र, नॅरोगेज रेल्वेत दही दुध, भाजीपाला विकणारे, नोकरदार, कामगार, आणि विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये जाणे येणे व्हायचे. आता रेल्वे बंद होणार असल्याने आणि ब्रॉडगेजचे काम पूर्ण होण्याकरीता लागणाऱ्या कालावधीपर्यंत नागरिकांना जादाचे पैसे देऊन प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा भुर्दंड पडणार असल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा- येथे 'प्रकाश' रुसलाय...! विकसित चंद्रपूर जिल्ह्यातील शोकांतिका

Intro:शेवटच्या नॅरोगेज ट्रेनची अखेर थांबणार धडधड
इतवारी _ नागभिड ट्रेन २५ नोहेम्बंर पासुन बंद
१०९ किलोमिटर ब्रॉडगेज मार्गाचे कामास १ डिसेंबरपासुन सुरूवात
चिमूर MHC10019
स्वांतत्रोपुर्व काळात इंग्रज अधिकारी , सैनिक , तथा भारतियांना प्रवासा करीता रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करूण रेल्वे सुरू करण्यात आले .याच पैकी एक मार्ग म्हणजे नागपुर - नागभिड नॅरोगेज आहे . रेल्वे वाहतुक अजुन सुखरूप , सुरळीत व गतिशील करण्या करीता देशातिल सर्व नॅरोगेजचे ब्रॉडगेज मध्ये करण्यात आले . याच प्रमाणे इतवारी- नागभिड ब्रॉडगेज प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने मध्य भारतातील शेवटची नॅरोगेज ट्रेनची धडधड अखेर २५ नोहेम्बंरा थांबणार आहे .
इंग्रजी राजवटीत १९१३ मध्ये नागपूर -नागभिड ट्रेन सुरू करण्यात आली . तेव्हा पासुन हि नॅरोगेज ट्रेनच्या धडधडी सोबत चंद्रपूर ,गडचिरोली व भंडारातील नागरीकांच्या जिवनाची धडधड जुडली आहे .इतवारी रेल्वे स्टेशन मधुन सुटल्या नंतर सोळा थांबे पार करीत साढे चार तासाने नागभिडला हि ट्रेन पोहचत होती . या ट्रेनची आठ डब्ब्या मार्फत .नॅरोगेज मार्ग आणी ट्रेन च्या मर्यादा लक्षात घेता गेली अनेक वर्षा पासुन ब्रॉडगेज मार्गाची मागणी नागरीक आणी लोकप्रतिनिधी मार्फत केल्या जात होती . त्याप्रमाणे २०१३ - १४ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये यास मान्यता मिळाली .नॅरोगेजचे ब्रॉडगेज करण्या करीता ९९२ कोटी अपेक्षीत खर्च असुन प्रत्यक्ष कामास १ डिसेंबर पासुन होणार आहे .
मार्गाच्या ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड,ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा,कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरु शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रुपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. पहिल्या टण्यात नागभीड -भिवापूर दुसऱ्या टण्यात भिवापूर -उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड -नागपूर असे काम विद्युतीकरणासह होणार असल्याची माहिती आहे.
OO ०
सर्वसामान्यांना पडणार भुर्दंड :
या मार्गाचे बांधकाम २१ ते ३६ महिन्यात होण्याची अपेक्षा आहे . मात्र नॅरोगेज रेल्वेत दही दुध , भाजीपाला विकणारे , नोकरदार , कामगार , आणी विद्यार्थांना कमी खर्चामध्ये जाणे येणे व्हायचे . आता रेल्वे बंद होणार असल्याने आणी ब्रॉडगेजचे काम पुर्ण होण्या करीता लागणाऱ्या कालावधी पर्यंत जादा चे पैसे देऊन प्रवास करावा लागणार असल्याने सर्वसामान्यांना याचा भुर्दंड पडणार असल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे .
Body:नॅरोगेज रेल्वे व नागभिड स्टेशन Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.