ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 21 ऑक्टोबरला राज्यभर मतदान होणार आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे. चंद्रपूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्रासाठी 18 लाख 72 हजार नागरिक मतदान करणार आहेत.

author img

By

Published : Sep 21, 2019, 11:30 PM IST

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार

चंद्रपूर - विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 21 ऑक्टोबरला राज्यभर मतदान होणार आहे. चंद्रपूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्रासाठी 18 लाख 72 हजार नागरिक मतदान करणार आहेत.

चंद्रपूर जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे


जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण 18 लाख 72 हजार 787 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 9 लाख 11 हजार 938 महिला मतदार तर 9 लाख 60 हजार 827 पुरुष मतदार आहेत. 27 सप्टेंबर पर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. जिल्ह्यात सध्या 2098 मतदान केंद्र आहेत. यातील 28 मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहे. प्रत्येक मतदार संघात दोन मतदान केंद्र महिला म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मतदान यंत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली असून यंत्राच्या वाहतुकीदरम्यान जीपीएस ट्रॅकिंग वापरण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 4 हजार पोलिस कर्मचारी तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस तैनात करण्यात येतील, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.

हेही वाचा - नागपूर विभाग : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ?


आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील मतदारांवर पैशाचा प्रभाव पडू नये याकरता भरारी पथक, स्थायी निरीक्षण पथक, व्हिडिओ निरीक्षण पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, यासाठी पाच दिवस अगोदर छायाचित्र असलेली प्रत देण्यात येणार आहे. १९५० या क्रमांकावर संपर्क साधल्यास मतदारांना मतदानकेंद्र शोधण्यास सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर - विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 21 ऑक्टोबरला राज्यभर मतदान होणार आहे. चंद्रपूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्रासाठी 18 लाख 72 हजार नागरिक मतदान करणार आहेत.

चंद्रपूर जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे


जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण 18 लाख 72 हजार 787 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 9 लाख 11 हजार 938 महिला मतदार तर 9 लाख 60 हजार 827 पुरुष मतदार आहेत. 27 सप्टेंबर पर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. जिल्ह्यात सध्या 2098 मतदान केंद्र आहेत. यातील 28 मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहे. प्रत्येक मतदार संघात दोन मतदान केंद्र महिला म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मतदान यंत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली असून यंत्राच्या वाहतुकीदरम्यान जीपीएस ट्रॅकिंग वापरण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 4 हजार पोलिस कर्मचारी तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस तैनात करण्यात येतील, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.

हेही वाचा - नागपूर विभाग : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ?


आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील मतदारांवर पैशाचा प्रभाव पडू नये याकरता भरारी पथक, स्थायी निरीक्षण पथक, व्हिडिओ निरीक्षण पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, यासाठी पाच दिवस अगोदर छायाचित्र असलेली प्रत देण्यात येणार आहे. १९५० या क्रमांकावर संपर्क साधल्यास मतदारांना मतदानकेंद्र शोधण्यास सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Intro:
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. सहा विधानसभा क्षेत्रासाठी 18 लाख 72 हजार नागरिक मतदान करणार आहेत.

जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ असून यांची एकुण मतदार संख्या 18 लक्ष 72 हजार 787 मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये 9 लाख 11 हजार 938 महिला मतदार तर 9 लाख 60 हजार 827 पुरुष मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी 1709 मतदार सेनादलातील आहे. 27 सप्टेंबर पर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असून उर्वरित मतदारांना नमुना 6 अर्ज भरून मतदार म्हणून नोंदणी करता येईल.

जिल्ह्यात सध्या 2098 मतदान केंद्र असून यातील 28 मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहे. प्रत्येक मतदार संघात दोन मतदान केंद्र महिला संचलित मतदान केंद्र म्हणून तर एक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मतदान यंत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली असून यंत्राच्या वाहतुकीदरम्यान जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 4 हजार पोलिस कर्मचारी तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस तैनात करण्यात येईल. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील मतदारांवर पैशाचा प्रभाव पडू नये याकरिता भरारी पथक, स्टॅटिक सरव्हीलन्स टीम, व्हिडिओ सरव्हीलन्स टीमची निर्मिती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यास अडचण जाऊ नये याकरिता पाच दिवस आधीच छायाचित्र असलेली प्रत मतदारांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचता येणार आहे. तसेच १९५० या क्रमांकावर संपर्क साधल्यास मतदारांना मतदानकेंद्र शोधण्यास सहकार्य करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Body:बाईट : डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी, चंद्रपुरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.