ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात, तर कृषी विभागच्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - agriculture department building in Chandrapur

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीतून तब्बल 24 गावांचा कारभार चालतो. तर या कार्यालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली असून या ठिकाणी एकही अधिकारी वेळेवर सापडत नाही.

कृषी विभागच्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
author img

By

Published : Nov 13, 2019, 5:34 PM IST

चंद्रपूर - अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शासनकडून मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचे हात अजूनही रिकामेच आहेत. तर दुसरीकडे बळीराजाच्या मदतीला धावून येणाऱ्या कृषी विभागाच्या इमारतची अवस्था अत्यंत खराब आहे. या इमारतीला जागोजोगी तडे गेले आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरून येथील अधिकाऱ्यांना या इमारतीत काम करावे लागते.

कृषी विभागच्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

हेही वाचा - वाघानं केली गाईची शिकार, थरार कॅमेऱ्यात कैद

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीतून तब्बल 24 गावांचा कारभार चालतो. तर या कार्यालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली असून या ठिकाणी एकही अधिकारी वेळेवर सापडत नाही. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. घूस, उंदिरांनी कार्यालयात घरे केल्यामुळे अधून-मधून विषारी सापही कार्यालयात आढळून आले आहेत. त्यामुळे इमारतीत बसायला कर्मचारी घाबरतात. पावसाळ्यात शेती हंगामाला सुरूवात होते. मात्र, कार्यालयाला गळती लागत असल्याने कृषी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतेत बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले.

हेही वाचा - पक्षी सप्ताहनिमित्त इको-प्रो तर्फे विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण, स्वच्छता कार्यक्रम

कर्मचारीच कार्यालयात येत नसल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंडपिपरी येथील तालुका कृषी कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे येथे नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापही इमारतीच्या बांधकामासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

चंद्रपूर - अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शासनकडून मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचे हात अजूनही रिकामेच आहेत. तर दुसरीकडे बळीराजाच्या मदतीला धावून येणाऱ्या कृषी विभागाच्या इमारतची अवस्था अत्यंत खराब आहे. या इमारतीला जागोजोगी तडे गेले आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरून येथील अधिकाऱ्यांना या इमारतीत काम करावे लागते.

कृषी विभागच्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

हेही वाचा - वाघानं केली गाईची शिकार, थरार कॅमेऱ्यात कैद

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीतून तब्बल 24 गावांचा कारभार चालतो. तर या कार्यालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली असून या ठिकाणी एकही अधिकारी वेळेवर सापडत नाही. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. घूस, उंदिरांनी कार्यालयात घरे केल्यामुळे अधून-मधून विषारी सापही कार्यालयात आढळून आले आहेत. त्यामुळे इमारतीत बसायला कर्मचारी घाबरतात. पावसाळ्यात शेती हंगामाला सुरूवात होते. मात्र, कार्यालयाला गळती लागत असल्याने कृषी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतेत बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले.

हेही वाचा - पक्षी सप्ताहनिमित्त इको-प्रो तर्फे विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण, स्वच्छता कार्यक्रम

कर्मचारीच कार्यालयात येत नसल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंडपिपरी येथील तालुका कृषी कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे येथे नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापही इमारतीच्या बांधकामासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

Intro:बळीराजावर अस्मानी तर कृषी विभागावर सूल्तानी संकट

चंद्रपूर

अस्मानी संकटात बळीराजा पुरता होरपळून निघाला आहे. मदतीची आस लावून बसलेल्या बळीराजाचे हात अद्यापही रिकामेच आहेत. दूसरीकडे बळीराजाचा मदतीला धावून जाणाऱ्या कृषी विभागावर मात्र सूल्तानी संकट कोसळले आहे. अतिशय धोकादायक असलेल्या इमारतीत बसून कृषी विभाग बळीराजाच्या वेदनेवर फुंकर घालीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार गांभिर्याने बघत नाही,असा आरोप अधूनमधून होत असते. खरी शोकांतीका ही की बळीराजाचा मित्र असलेल्या कृषी विभागाला सरकारने वाडीत टाकले आहे की काय ? असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा कृषी मंडळ अधिकारी कार्यालयाकडे बघून येते.

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गोंडपिपरी तालूक्यातील धाबा येथे कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीतून तब्बल चोविस गावांचा कारभार बघीतला जातो. असे असले तरी या कार्यालयात कृषी कर्मचारी सापडतील याची तिळमात्रही गँरंटी नाही. कारण इमारत अतिशय जिर्ण झाली असून कूठल्याही क्षणी इमारत कोसळेल अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी इमारतीच्या स्लॕबचे तूकडे पडले आहेत. भितींना तडे गेलेले आहेत. घूस,उंदीरानी कार्यालयात घरे केली असल्याने अधूनमधून विषारी सापही कार्यालयात आढळून आले आहेत. त्यामुळे इमारतीत बसायला कर्मचारीही घाबरतात. पावसाळ्यात शेती हंगामाला सूरवात होते मात्र कार्यालयाला गळती लागत असल्याने कृषी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतेत बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले.

कर्मचारीच कार्यालयात येत नसल्याने शुल्कश्या कामासाठीही बारा कि.मी.अंतरावर असलेल्या गोंडपिपरी येथिल तालूका कृषी कार्यालय शेतकऱ्यांना गाठावे लागते. नविन इमारतीचे बांधकाम करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार केली. तसा प्रस्ताव तालूका कृषी अधिकार्यांनी जिल्हा प्रशाशनाला पाठविल्याची माहीती आहे. मात्र इमारतीचा बांधकामाला घेऊन अद्यापही ठोस पाऊल उचलल्या गेले नाही.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.