ETV Bharat / state

नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसीत तीन कामगारांची हत्या; भंगाराच्या गोदामात करत होते काम

तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात हे भंगाराचे गोदाम आहे. या गोदामात इरशाद ( 20), नौशाद (14), राजेश (28) हे तीन कामगार काम करत होते.  तिन्ही कामगारांचा मृतदेह सकाळी 9 च्या सुमारास  गोदामात आढळून आला.

author img

By

Published : Jul 13, 2019, 1:03 PM IST

पोलीस घटनास्थळी पोहोचताना

मुंबई - राज्यात तिहेरी खुनाची तिसरी घडल्याने कायदा व सुव्यवस्थेला मोठा सुरुंग लागला आहे. शिर्डी आणि नागपूर हे तिहेरी हत्याकांडाने हादरले असतानाच नवी मुंबईतही तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. भंगाराच्या गोदामात काम करणाऱ्या तीन कामगारांची झोपेतच हत्या झाल्याने नवी मुंबईत एकच खळबळ माजली आहे. ही घटना तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात घडली आहे.

तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात हे भंगाराचे गोदाम आहे. या गोदामात इरशाद ( 20), नौशाद (14), राजेश (28) हे तीन कामगार काम करत होते. तिन्ही कामगारांचा मृतदेह सकाळी 9 च्या सुमारास गोदामात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आणि श्वानपथकाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेत गोदामातील कामगारांवर डोक्यात जड वस्तूचा प्रहार करण्यात येऊन चाकूचे वार करण्यात आले आहेत. हत्येनंतर त्या तिघांचे मृतदेह त्याच ठिकाणी गोदामात लपविण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचलेली रुग्णवाहिका आणि पोलीस वाहन
Navi Mumbai Police
4 लाखांच्या भंगार विक्रीच्या कारणावरून ही हत्या झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे तिघे कामगार भंगार गोदामाच्या बाहेरील पटांगणात झोपले होते. ते तिघे झोपेत असतानाच धारदार शास्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
बोनसरी गाव
बोनसरी गाव

विशेष म्हणजे ज्या भंगाराच्या गोदामात ही घटना घडली ते गोदाम अनधिकृतपणे चालवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

शिर्डीतही तिहेरी खुनाची घटना आज घडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये तिहेरी खुनाची घडल्याने उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

मुंबई - राज्यात तिहेरी खुनाची तिसरी घडल्याने कायदा व सुव्यवस्थेला मोठा सुरुंग लागला आहे. शिर्डी आणि नागपूर हे तिहेरी हत्याकांडाने हादरले असतानाच नवी मुंबईतही तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. भंगाराच्या गोदामात काम करणाऱ्या तीन कामगारांची झोपेतच हत्या झाल्याने नवी मुंबईत एकच खळबळ माजली आहे. ही घटना तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात घडली आहे.

तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात हे भंगाराचे गोदाम आहे. या गोदामात इरशाद ( 20), नौशाद (14), राजेश (28) हे तीन कामगार काम करत होते. तिन्ही कामगारांचा मृतदेह सकाळी 9 च्या सुमारास गोदामात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आणि श्वानपथकाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेत गोदामातील कामगारांवर डोक्यात जड वस्तूचा प्रहार करण्यात येऊन चाकूचे वार करण्यात आले आहेत. हत्येनंतर त्या तिघांचे मृतदेह त्याच ठिकाणी गोदामात लपविण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचलेली रुग्णवाहिका आणि पोलीस वाहन
Navi Mumbai Police
4 लाखांच्या भंगार विक्रीच्या कारणावरून ही हत्या झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे तिघे कामगार भंगार गोदामाच्या बाहेरील पटांगणात झोपले होते. ते तिघे झोपेत असतानाच धारदार शास्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
बोनसरी गाव
बोनसरी गाव

विशेष म्हणजे ज्या भंगाराच्या गोदामात ही घटना घडली ते गोदाम अनधिकृतपणे चालवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

शिर्डीतही तिहेरी खुनाची घटना आज घडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये तिहेरी खुनाची घडल्याने उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

Intro:बातमीला व्हिडीओ आणि फोटो सोबत जोडले आहे.


नवी मुंबई

शिर्डी आणि नागपूर शहर तिहेरी हत्याकांडाने हादरले असतानाच आता नवी मुंबईतही तिहेरी हत्याकांडाची घटना घडलीय. तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात भंगाराच्या गोदामात काम करणाऱ्या तीन कामगारांची झोपेतच हत्या झाल्याने नवी मुंबईत एकच खळबळ माजली आहे.
Body:तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात हे भंगाराचे गोदाम आहे. या गोदामात इरशाद ( 20), नौशाद (14), राजेश (28) या तीन कामगार काम करत होते. सकाळी 9 च्या सुमारास या तिन्ही कामगारांचा मृतदेह गोदामात आढळून आल्याने नवी मुंबई हादरून गेली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आणि डॉग स्कॉड ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेत गोदामातील कामगारांवर डोक्यात जड वस्तूचा प्रहार करण्यात येऊन चाकूचे वार करण्यात आले आहेत. हत्येनंतर त्या तिघांचे मृतदेह त्याच ठिकाणी गोदामात लपवण्यात आले होते.Conclusion:4 लाखांच्या भंगार विक्रीच्या कारणावरून ही हत्या झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. हे तिघे कामगार भंगार गोदामाच्या बाहेरील पटांगणात झोपले होते. ते तिघे झोपेत असतानाच धारदार शास्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ज्या भंगाराच्या गोदामात ही घटना घडली ते गोदाम अनधिकृतपणे चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.