ETV Bharat / state

भाजपामध्ये काम करणाऱ्यांना डावलले जात आहे - मंत्री उदय सामंत

author img

By

Published : Jul 11, 2021, 11:37 AM IST

Updated : Jul 11, 2021, 12:41 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आहे. ते मी पुन्हा सांगू इच्छितो, त्यांना महाराष्ट्र सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील लोकांना मंत्री करावं लागले. तसेच आमच्याकडच्या एका व्यक्तीला घेऊन त्यांना मंत्री करावे लागले.पण पंकजा ताई यांना डावलले आहे. त्यांच्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उद्रेक आहे.

उदय सामंत
उदय सामंत

बुलडाणा - केंद्रीय राज्यमंत्रीच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या बहिणी प्रीतम मुंडेंना डावलण्यामूळे पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे प्रकरण ताजे असतानाच भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे. आणि समोरून येणाऱ्या लोकांना घेतले जात आहे, असा खोचक टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपाला लगावला. शनिवारी रोजी बुलडाण्याच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

uday samant
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्राप्त आठ व्हेंटिलेटर यंत्राचे लोकार्पण करण्यासाठी मंत्री उदय सामंत हे शनिवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांच्यासोबत पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आहे. ते मी पुन्हा सांगू इच्छितो, त्यांना महाराष्ट्र सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील लोकांना मंत्री करावं लागले. तसेच आमच्याकडच्या एका व्यक्तीला घेवून त्यांना मंत्री करावं लागलं.पण पंकजा ताईंना डावलले आहे. त्यांच्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उद्रेक आहे. भाजपातले कार्यकर्ते आम्हाला फोन करून इथं निष्ठावातांचे काही खरे नाही, असे सांगत आहेत. आणि त्यांच्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे. यावर मी बोलणे योग्य नाही.

बुलडाणा - केंद्रीय राज्यमंत्रीच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या बहिणी प्रीतम मुंडेंना डावलण्यामूळे पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे प्रकरण ताजे असतानाच भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे. आणि समोरून येणाऱ्या लोकांना घेतले जात आहे, असा खोचक टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपाला लगावला. शनिवारी रोजी बुलडाण्याच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

uday samant
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्राप्त आठ व्हेंटिलेटर यंत्राचे लोकार्पण करण्यासाठी मंत्री उदय सामंत हे शनिवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांच्यासोबत पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आहे. ते मी पुन्हा सांगू इच्छितो, त्यांना महाराष्ट्र सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील लोकांना मंत्री करावं लागले. तसेच आमच्याकडच्या एका व्यक्तीला घेवून त्यांना मंत्री करावं लागलं.पण पंकजा ताईंना डावलले आहे. त्यांच्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उद्रेक आहे. भाजपातले कार्यकर्ते आम्हाला फोन करून इथं निष्ठावातांचे काही खरे नाही, असे सांगत आहेत. आणि त्यांच्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे. यावर मी बोलणे योग्य नाही.
Last Updated : Jul 11, 2021, 12:41 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.