बुलडाणा - मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर, बुलडाणा-चिखली मार्ग पाण्यामुळे १ तासापासून बंद असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 वाहनांमध्ये अडकलेल्या 6 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही. संततधार पावसामुळे बुधवारी संध्याकाळी पैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे आगोदरच 100 टक्के भरलेले येळगाव धरण ओवरफ्लो झाले असून बुलडाणा-चिखली मार्ग गेल्या 1 तासापासून बंद आहे. या रस्त्यावरुन वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात 2 वाहन अडकले होते त्यात असलेल्या 6 लोकांना महसूल विभागाने सुखरूप बाहेर काढल्याची माहिती येळगावचे तलाठी झगरे यांनी दिली आहे तर त्यांचे वाहन सद्या पाण्यात अडकलेले आहेत.
हेही वाचा - कर्जासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन; तब्बल ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांची कुचेष्टा
येळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी खाली असलेल्या पेनटाकळी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. पेनटाकळी धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असल्याने त्याचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर, या धरणातून 5160 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पैनगंगेला आलेल्या पुरामुळे बुलडाणा-अजिंठा, बुलडाणा-धाड, बुलडाणा-रायपूर व बुलडाणा-चिखली असे ऐकून 4 मुख्य मार्ग बंद पडले आहेत. तर या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष देऊन आहे.