ETV Bharat / state

...म्हणून तो हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे

सध्या मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे, या महिन्यात मुस्लीम लोक आपल्या ईश्वरला (अल्लाहाला) मनवण्याकरिता रोजे धरतात. सकाळी ४ वाजून २० मिनीटापर्यंत जेवण करतात आणि त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यत काहीच खात-पित नाहीत, असे हे महिनाभर करतात.

author img

By

Published : Jun 3, 2019, 7:57 PM IST

Updated : Jun 3, 2019, 8:32 PM IST

हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे

बुलडाणा - दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील, हा संदेश देत बुलडाण्यातील एक हिंदू धर्मीय अधिकारी मुस्लीम धर्माचे पवित्र रमजानचे पूर्ण रोजे धरत आहे. या अधिकऱ्याने समाजात सर्वधर्म समभावतेचा संदेश दिला आहे. बुलडाण्यातील उपवनसंरक्षक संजय माळी, असे या अवलिया अधिकाऱ्याचे नाव आहे.

हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे

भारत देश विविध जातींचा, प्रांताचा देश असून या देशात एकमेकांच्या धर्मांचा आदर करून सर्वजण गुणगोविंदाने राहतात. मात्र, काही प्रमाणात गोरक्षकांकडून होणाऱ्या अशोभनीय घटनेमुळे सर्वधर्म समभावतेच्या भावनेला धक्का लागत आहे. तर दुसरीकडे सर्वधर्म समभावतेचा संदेश देत दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील ही भावना दुसऱ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी बुलडाणा उपवनसंरक्षक असलेले संजय माळी या हिंदू अधिकाऱ्याने पवित्र रमजानचे संपूर्ण रोजे (उपवास) ठेवून सगळ्यांना समानतेचा संदेश देत आहे. सध्या मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे, या महिन्यात मुस्लीम लोक आपल्या ईश्वरला (अल्लाहाला) मनवण्याकरिता रोजे धरतात. सकाळी ४ वाजून २० मिनीटापर्यंत जेवण करतात आणि त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यत काहीच खात-पित नाहीत, असे हे महिनाभर करतात.

बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या वाहनावर जफर नावाचा मुस्लीम चालक आहे. त्या चालकाला संजय माळी यांनी रोजे (उपवास) ठेवला का? असे विचारले त्यावर माझी तब्बेत ठीक नसून रोजे करण्यासंबंधी माझे शरीर साथ देत नाही असे उत्तर त्या चालकाने दिले, त्यावरून माळींनी मी तुझ्या बदल्यात रोजे ठेऊ शकतो का? असे विचारले, तेव्हा त्या चालकाने चालते असे उत्तर दिले. त्यानंतर उपवनसंरक्षक संजय माळींनी दुसऱ्या दिवसापासून (७ मे) रोजे धरण्यास सुरुवात केली, आज ३ जूनच्या सोमवारी ही २८ व्या दिवशीही त्यांनी २८ वा रोजा धरलेले आहे. हे रोजे धरत त्यांना हलके वाटत असून मनात शांतता निर्मात होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली, आपण दुसऱ्यांच्या धर्मांचा आपण आदर केला तर आपल्याही धर्मांचा आदर दुसऱ्यांकडून होऊ शकतो. सर्व सर्व-धर्म समभवात जगू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे त्यांना सर्व-धर्म समभावतेचा अवलिया या नावाने ओळखले जात आहे.

बुलडाणा - दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील, हा संदेश देत बुलडाण्यातील एक हिंदू धर्मीय अधिकारी मुस्लीम धर्माचे पवित्र रमजानचे पूर्ण रोजे धरत आहे. या अधिकऱ्याने समाजात सर्वधर्म समभावतेचा संदेश दिला आहे. बुलडाण्यातील उपवनसंरक्षक संजय माळी, असे या अवलिया अधिकाऱ्याचे नाव आहे.

हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे

भारत देश विविध जातींचा, प्रांताचा देश असून या देशात एकमेकांच्या धर्मांचा आदर करून सर्वजण गुणगोविंदाने राहतात. मात्र, काही प्रमाणात गोरक्षकांकडून होणाऱ्या अशोभनीय घटनेमुळे सर्वधर्म समभावतेच्या भावनेला धक्का लागत आहे. तर दुसरीकडे सर्वधर्म समभावतेचा संदेश देत दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील ही भावना दुसऱ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी बुलडाणा उपवनसंरक्षक असलेले संजय माळी या हिंदू अधिकाऱ्याने पवित्र रमजानचे संपूर्ण रोजे (उपवास) ठेवून सगळ्यांना समानतेचा संदेश देत आहे. सध्या मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे, या महिन्यात मुस्लीम लोक आपल्या ईश्वरला (अल्लाहाला) मनवण्याकरिता रोजे धरतात. सकाळी ४ वाजून २० मिनीटापर्यंत जेवण करतात आणि त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यत काहीच खात-पित नाहीत, असे हे महिनाभर करतात.

बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या वाहनावर जफर नावाचा मुस्लीम चालक आहे. त्या चालकाला संजय माळी यांनी रोजे (उपवास) ठेवला का? असे विचारले त्यावर माझी तब्बेत ठीक नसून रोजे करण्यासंबंधी माझे शरीर साथ देत नाही असे उत्तर त्या चालकाने दिले, त्यावरून माळींनी मी तुझ्या बदल्यात रोजे ठेऊ शकतो का? असे विचारले, तेव्हा त्या चालकाने चालते असे उत्तर दिले. त्यानंतर उपवनसंरक्षक संजय माळींनी दुसऱ्या दिवसापासून (७ मे) रोजे धरण्यास सुरुवात केली, आज ३ जूनच्या सोमवारी ही २८ व्या दिवशीही त्यांनी २८ वा रोजा धरलेले आहे. हे रोजे धरत त्यांना हलके वाटत असून मनात शांतता निर्मात होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली, आपण दुसऱ्यांच्या धर्मांचा आपण आदर केला तर आपल्याही धर्मांचा आदर दुसऱ्यांकडून होऊ शकतो. सर्व सर्व-धर्म समभवात जगू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे त्यांना सर्व-धर्म समभावतेचा अवलिया या नावाने ओळखले जात आहे.

Intro:Body:श्री साठे सरांच्या सूचनेनुसार..

स्टोरी:- दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर करित हा हिंदू अवलिया अधिकारी धरत आहे रमजानचे 'रोजे'

बुलडाणा:- दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील हा संदेश देत बुलडाण्यातील एक हिंदू अवलिया अधिकारी मुस्लिम धर्मांचे पवित्र रमजानचे पूर्ण रोजे धरत आहे.या अधिकऱ्याने बुलडाणेकरासहित पूर्ण भरतदेशात सर्व-धर्म समभावचा संदेश दिला आहे.बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माळी असे या अवलिया अधिकाऱ्याचे नाव आहे..

भारत देश विविध जातींचा, प्रांताचा देश असून एकमेकांच्या धर्मांचा आदर करून सर्व गुणगोविंदाने राहतात.मात्र काही प्रमाणात गो-रक्षकांकडून होणाऱ्या अशोभनीय घटनेमुळे सर्व-धर्म समभावच्या भावनेला धक्का लागत आहे.तर दुसरीकडे सर्व-धर्म समभावचा संदेशदेत दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील ही भावना दुसऱ्यांच्या मनात निर्माण करण्याकरिता बुलडाणा उपवनसंरक्षक असलेले संजय माळी नावाचे हिंदू अधिकारी पवित्र रमजानचे संपूर्ण रोजे(उपवास) ठेवून सगळ्यांना संदेश देत आहे.आज रोजी ही त्यांचा रोजा(उपवास) सुरू आहे. सध्या मुस्लिम धर्मांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे या महिण्यात मुस्लिम लोक आपल्या ईश्वरला(अल्लाहाला) मनवण्याकरिता आणि भूक-तहान काय असते यांची असण्याकरिता सकळी ४ वाजून २० मिनीतापर्यंत जेवण करतात आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांपर्यत काहीच खात-पित नाही आणि पूर्ण महिण्याभराचे रोजे(उपवास) ठेवतात. झालं असं बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माली यांच्या वाहनावर जफर नावांचा मुस्लिम चालक आहे.त्या चालकाला संजय माळी यांनी रोजे (उपवास) ठेवला का बाबत विचारले त्यावर माझी तब्बेत ठीक नसून रोजे करण्यासंबंधी माझे शरीर साथ देत नाही असे उत्तर त्या चालकाने उत्तरात सांगितले त्यावरून माळींनी मी तुझ्या बदलेत रोजे ठेवतो असे सांगितले व खरोखर उपवनसंरक्षक संजय माळींनी दुसऱ्यादिवशी म्हणजे ७ में पासून रोजे धरण्यास सुरुवात केली आज ३ जूनच्या सोमवारी ही २८ व्या दिवशीही त्यांनी २८ वा रोजा धरलेले आहे.हे रोजे धरत त्यांना हलके वाटत असून मनात शांतता निर्मात होत असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली तर आपण दुसऱ्यांच्या धर्मांचा आपण आदर केला तर आपल्याही धर्मांचा दुसरे आदर करतात आणि सर्व सर्व-धर्म संभवात जगू शकतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.या त्यांच्या सर्व-धर्म समभाव प्रति दिलेला संदेशा मूळे ते सर्व-धर्म समभावचा अवलिया या नावाने ओळखल्या जात आहे..

बाईट :- संजय माळी, उपवनसंरक्षक ,बुलडाणा

टीप:- संजय माळी यांचे हिंदी,मराठी बाईट पाठवत आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Jun 3, 2019, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.