ETV Bharat / state

बारावीमध्ये 51 टक्के गुण मिळवणारा प्रसाद बनला 'न्यायाधीश'

author img

By

Published : Dec 24, 2019, 10:11 AM IST

Updated : Dec 24, 2019, 1:28 PM IST

प्रसाद ठाकरे हा 27 वर्षीय तरुण सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा आहे. त्याने मराठी माध्यमाच्या नगरपरिषदेच्या  शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खामगावमध्ये एलएलबी आणि एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले.

prasad thaCKERAY judge
बारावीमध्ये 51 टक्के गुण मिळवणारा प्रसाद ठाकरे बनला 'न्यायाधीश'

बुलडाणा - खामगाव तालुक्यातील वाडी या खेड्यातून येणाऱ्या प्रसाद ठाकरे या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेत त्याने यश संपादन केले. विशेष बाब म्हणजे प्रसादला बारावीमध्ये अवघे 51 टक्के गुण मिळाले होते. म्हणून त्याने 3 वर्षे शेतीही केली. मात्र, कर्जाचा डोंगर झाल्याने त्याने न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. प्रसादच्या जिद्द आणि चिकाटीचे कुटुंबीय व गावकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.

बारावीमध्ये 51 टक्के गुण मिळवणारा प्रसाद बनला 'न्यायाधीश'

हेही वाचा - #१५YearsofDhoni : पहिल्याच सामन्यात झाला होता शून्यावर बाद, नंतर ठरला 'सर्वोत्तम कर्णधार'

प्रसाद ठाकरे हा 27 वर्षीय तरुण सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा आहे. त्याने मराठी माध्यमाच्या नगरपरिषदेच्या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खामगावमध्ये एलएलबी आणि एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले. प्रसादने दिवाणी न्यायाधिश पदाची परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानुसार नियोजन करुन इतरत्र वेळ खर्ची न लावता अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश संपदान केले. एकुण 250 गुणांच्या परीक्षेत प्रसादने लेखी पेपरमध्ये 109 आणि मुलाखतीमध्ये 32 गुण मिळवले. परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास 15 हजार विद्यार्थी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त 190 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले.

प्रसादचे वडील हिंदुस्‍थान लिव्‍हर कंपनीत कार्यरत असून, मुळगावी असलेली शेतीसुद्धा ते करतात. वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले असल्याचे प्रसाद म्हणाला. मुंबई येथील उथ्थान ज्‍युडीशियल अॅकेडमी येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून त्‍याची नियुक्ती केली जाईल. मात्र बुलडाणा जिल्ह्याचे नाव प्रसादने उंचावले असून वडील साहेबराव ठाकरे यांनी जेमतेम परिस्थिती असताना प्रसादला शिकविले आणि आज न्यायाधीश म्हणून निवड झाल्याने याचा त्यांना झाला आहे.

प्रसादला दहावीमध्ये 60 टक्के, 12 वीमध्ये 51 टक्के, एलएलबीला 57 टक्के आणि एल एल एम ला 70 टक्के असे गुण मिळाले होते. सुरुवातीला प्रसाद 12 वीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे खचला होता. प्रसादची सुरुवातीला डॉक्टर व्हायची इच्छा होती. मात्र, त्याने काही दिवस शेती करण्याचे ठरवून 3 वर्ष शेती केली. शेती करताना दीड लाख रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाल्यानंतर त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरविले. न्यायाधीश व्हायचं ध्येय ठरवून स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले व खासगी क्लासला प्रवेश घेतला. त्यानंतर त्याने पहिल्याच प्रयत्नात न्यायिक दंडाधिकारी पदाला गवसणा घातली.

हेही वाचा - लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र

बुलडाणा - खामगाव तालुक्यातील वाडी या खेड्यातून येणाऱ्या प्रसाद ठाकरे या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेत त्याने यश संपादन केले. विशेष बाब म्हणजे प्रसादला बारावीमध्ये अवघे 51 टक्के गुण मिळाले होते. म्हणून त्याने 3 वर्षे शेतीही केली. मात्र, कर्जाचा डोंगर झाल्याने त्याने न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. प्रसादच्या जिद्द आणि चिकाटीचे कुटुंबीय व गावकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.

बारावीमध्ये 51 टक्के गुण मिळवणारा प्रसाद बनला 'न्यायाधीश'

हेही वाचा - #१५YearsofDhoni : पहिल्याच सामन्यात झाला होता शून्यावर बाद, नंतर ठरला 'सर्वोत्तम कर्णधार'

प्रसाद ठाकरे हा 27 वर्षीय तरुण सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा आहे. त्याने मराठी माध्यमाच्या नगरपरिषदेच्या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खामगावमध्ये एलएलबी आणि एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले. प्रसादने दिवाणी न्यायाधिश पदाची परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानुसार नियोजन करुन इतरत्र वेळ खर्ची न लावता अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश संपदान केले. एकुण 250 गुणांच्या परीक्षेत प्रसादने लेखी पेपरमध्ये 109 आणि मुलाखतीमध्ये 32 गुण मिळवले. परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास 15 हजार विद्यार्थी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त 190 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले.

प्रसादचे वडील हिंदुस्‍थान लिव्‍हर कंपनीत कार्यरत असून, मुळगावी असलेली शेतीसुद्धा ते करतात. वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले असल्याचे प्रसाद म्हणाला. मुंबई येथील उथ्थान ज्‍युडीशियल अॅकेडमी येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून त्‍याची नियुक्ती केली जाईल. मात्र बुलडाणा जिल्ह्याचे नाव प्रसादने उंचावले असून वडील साहेबराव ठाकरे यांनी जेमतेम परिस्थिती असताना प्रसादला शिकविले आणि आज न्यायाधीश म्हणून निवड झाल्याने याचा त्यांना झाला आहे.

प्रसादला दहावीमध्ये 60 टक्के, 12 वीमध्ये 51 टक्के, एलएलबीला 57 टक्के आणि एल एल एम ला 70 टक्के असे गुण मिळाले होते. सुरुवातीला प्रसाद 12 वीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे खचला होता. प्रसादची सुरुवातीला डॉक्टर व्हायची इच्छा होती. मात्र, त्याने काही दिवस शेती करण्याचे ठरवून 3 वर्ष शेती केली. शेती करताना दीड लाख रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाल्यानंतर त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरविले. न्यायाधीश व्हायचं ध्येय ठरवून स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले व खासगी क्लासला प्रवेश घेतला. त्यानंतर त्याने पहिल्याच प्रयत्नात न्यायिक दंडाधिकारी पदाला गवसणा घातली.

हेही वाचा - लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र

Intro:Body:स्टोरी मध्ये प्रसादचे दोन बाईट आहे आपल्या परीने घ्यावे..

स्टोरी - 12 वी मध्ये 51 टक्के गुण घेणारा 27 व्या वर्षीचा प्रसाद ठाकरे बनला न्यायाधीश...


बुलडाणा -- जिद्द,चिकाटी अन त्याला परिश्रमाची जोड असल्यास सर्वकाही शक्य आहे, असे म्हटले तर वावगे म्हणू नये .. त्याचीच प्रचिती आज आली राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेचा निकालातून बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील छोट्या खेड्यातील २७ वर्षीय प्रसाद ठाकरे या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातलीय.विशेष म्हणजे त्याला 12 मध्ये केवळ 51 टक्के गुण मिळाले होते..

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्‍यातील वाडी या छोट्याशा गावातील प्रसाद ठाकरे हा 27 वर्षीय तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आणि नगर परिषद च्या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करत आणि मराठी माध्यमाच्या शाळेत आपले संपूर्ण शिक्षण करत , खामगाव मध्ये एलएलबी आणि एलएलएम चे शिक्षण पूर्ण करत , इतरत्र वेळ खर्ची न लावता अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ विभाग ) आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा उत्तीर्ण केलीय... २५० गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये १०९ आणि मुलाखतीमध्ये ३२ गुण मिळालेय.. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त १९० विद्यार्थी ही परीक्षारथी उत्तीर्ण झालेय .. निवड झालेला प्रसाद ठाकरे याचे वडील हिंदुस्‍थान लिव्‍हर कंपनीत कार्यरत असून, मुळगावी असलेली शेती सुध्दा ते करतात... वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले असल्याचे प्रसाद सांगतोय दरम्यान, मुंबई येथील उथ्थान ज्‍युडीशियल ॲकेडमी येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून त्‍याची नियुक्ती केली जाईल.. मात्र बुलडाणा जिल्ह्याचे नाव प्रसाद ने उंचावले असून वडील साहेबराव ठाकरे यांनी जेमतेम परिस्थिती असताना प्रसाद ला शिकविले आणि आज न्यायाधीश म्हणून निवड झाल्याने त्याचा आनंद त्यांना झालाय ..


प्रसाद ला 10 वी मधुर 60 टक्के, 12 वी मध्ये 51 टक्के ,एल एल बी ला 57 टक्के आणि एल एल एम ला 70 टक्के, तरीही २७ व्या वर्षीच प्रसाद न्यायाधीश बनला असून जिद्द ,चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने हे यश मिळविले ... सुरुवातीला प्रसाद 12 वी झाल्यावर खचला होता , कारण त्याला डॉक्टर व्हायचे होते, मात्र 12 वी मध्ये मार्क कमी पडल्याने तो खचला आणि काही दिवस शेती करण्याचे ठरवून त्याने 3 वर्ष शेती केली .. त्यात दीड लाखांचे कर्ज डोक्यावर झालेय .. कारण बुलडाणा जिल्हा अवर्षण ग्रस्त असून दुष्काळ पडला होता.. मात्र 3 वर्षणतर प्रसाद एल एल बी ला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरविले त्यातही 57 टक्के पडले आणि घर खर्च काय निघणार हे डोक्यासमोर ठेवले तर करिअर करण्याचे ठरविले म्हणून स्पर्धा परीक्षेची क्लास लावले आणि 7 ते 8 तास अभ्यास करून तो जिद्दीने न्यायाधीश बनला .. तोही पहिल्याच प्रयत्नात न्यायिक दंडाधिकारी...

प्रसाद हा इतर मुलांसमोर आदर्श ठरला असून प्रसादच्‍या या यशाने त्‍याच्‍या नातेवाइकांसह गावात देखील आनंदाला उधाण आलेय..., तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील प्रसाद एक आदर्श ठरतोय...वसीम शेख इटीव्ही भारत बुलडाणा..

बाईट - 1) बाईट - प्रसाद ठाकरे, निवड झालेला न्यायाधीश ..

2)साहेबराव ठाकरे, प्रसाद चे वडील..

-वसीम शेख,बुलडाणा-

Conclusion:
Last Updated : Dec 24, 2019, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.