ETV Bharat / state

सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत नावे समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन....

author img

By

Published : Mar 11, 2020, 10:11 PM IST

कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव या गावातील काही शेतकऱ्यांची नावे आहेत. तर, काहींची नावेच नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट करावीत, या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत नावे समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत नावे समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी

बुलडाणा - महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव या गावातील काही शेतकऱ्यांची नावे आहेत. तर, काहींची नावेच नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट करावीत, या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत नावे समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव मध्ये एक हजार ते एक हजार दोनशे शेतकरी आहेत. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत 360 ते 365 शेतकऱ्यांचे नावे आली आहेत. तर, दुसऱ्या यादीमध्ये पाच ते दहा शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी वाट पाहात आहेत. बँक प्रशासनाकडून हेतुपुरस्सर या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सुनगावातील शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीच्या यादीत समाविष्ट करावीत, या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर पुंडलिक पंढरी पाटील, मोहनसिंह फकीरचंदसिंह राजपूत, शेषराव सोनाजी वंडाळे, विजय वंडाळे, अमोल महादेव येऊल, लक्ष्मण रामभाऊ काटोले, गजानन संपत धुळे आदी शेतकरी खातेदारांच्या सह्या आहेत.

हेही वाचा - कोरोनाचे सावट; सैलानी यात्रा रद्दबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिकृत घोषणा

हेही वाचा - कोरोना : प्रशासनाकडून जमावावर निर्बंध; मात्र, महाविकास आघाडीचे मंत्री घेताहेत हजारोंच्या उपस्थितीत जंगी सत्कार

बुलडाणा - महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव या गावातील काही शेतकऱ्यांची नावे आहेत. तर, काहींची नावेच नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट करावीत, या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत नावे समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव मध्ये एक हजार ते एक हजार दोनशे शेतकरी आहेत. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत 360 ते 365 शेतकऱ्यांचे नावे आली आहेत. तर, दुसऱ्या यादीमध्ये पाच ते दहा शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी वाट पाहात आहेत. बँक प्रशासनाकडून हेतुपुरस्सर या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सुनगावातील शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीच्या यादीत समाविष्ट करावीत, या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर पुंडलिक पंढरी पाटील, मोहनसिंह फकीरचंदसिंह राजपूत, शेषराव सोनाजी वंडाळे, विजय वंडाळे, अमोल महादेव येऊल, लक्ष्मण रामभाऊ काटोले, गजानन संपत धुळे आदी शेतकरी खातेदारांच्या सह्या आहेत.

हेही वाचा - कोरोनाचे सावट; सैलानी यात्रा रद्दबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिकृत घोषणा

हेही वाचा - कोरोना : प्रशासनाकडून जमावावर निर्बंध; मात्र, महाविकास आघाडीचे मंत्री घेताहेत हजारोंच्या उपस्थितीत जंगी सत्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.