ETV Bharat / state

आता भाजपला 'खामोश' म्हणण्याची वेळ आली आहे - शत्रुघ्न सिन्हा

author img

By

Published : Oct 18, 2019, 4:02 AM IST

राष्ट्रवादाच्या नावाखाली  पंतप्रधान फसवणूक करत आहेत. ते देशावर आपले निर्णय थोपतात. त्यामुळे भाजपला आता 'खमोश' म्हणण्याची वेळ आली आहे,असा घणाघात शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. कोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ साकोली येथील होमगार्ड मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

शत्रुघ्न सिन्हा

भंडारा - मागच्या पाच वर्षात भाजप सरकारने तुमच्या नेतृत्वात काय केले असे जर तुम्ही पंतप्रधानांना विचाराल तर त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे, कलम 370 हटवले.राष्ट्रवादाच्या नावाखाली पंतप्रधान फसवणूक करत आहेत, असा घणाघात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ साकोली येथील होमगार्ड मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

शत्रुघ्न सिन्हा

हेही वाचा - नाना पटोलेंच्या मतदारसंघात मोदींची सभा; लोक म्हणतात...

सिन्हा पुढे म्हणाले, "देशात शेती, रोजगार, उद्योग अशा गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या नोटबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयांमुळे संपूर्ण देशाचे कंबरडे मोडले. मात्र ते याविषयी अजिबात बोलत नाहीत. मोदींनी देशाला गरीब बनवले. ते देशावर आपले निर्णय थोपतात. त्यामुळे भाजपला आता 'खमोश' म्हणण्याची वेळ आली आहे" विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे चार दिवस उरले असताना राज्यात प्रचाराने जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकत नाहीत. ते हिटलर आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. यावेळी प्रचार सभेत बोलताना त्यांनीही भाजपसह मोदींवर निषाणा साधला.

भंडारा - मागच्या पाच वर्षात भाजप सरकारने तुमच्या नेतृत्वात काय केले असे जर तुम्ही पंतप्रधानांना विचाराल तर त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे, कलम 370 हटवले.राष्ट्रवादाच्या नावाखाली पंतप्रधान फसवणूक करत आहेत, असा घणाघात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ साकोली येथील होमगार्ड मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

शत्रुघ्न सिन्हा

हेही वाचा - नाना पटोलेंच्या मतदारसंघात मोदींची सभा; लोक म्हणतात...

सिन्हा पुढे म्हणाले, "देशात शेती, रोजगार, उद्योग अशा गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या नोटबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयांमुळे संपूर्ण देशाचे कंबरडे मोडले. मात्र ते याविषयी अजिबात बोलत नाहीत. मोदींनी देशाला गरीब बनवले. ते देशावर आपले निर्णय थोपतात. त्यामुळे भाजपला आता 'खमोश' म्हणण्याची वेळ आली आहे" विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे चार दिवस उरले असताना राज्यात प्रचाराने जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकत नाहीत. ते हिटलर आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. यावेळी प्रचार सभेत बोलताना त्यांनीही भाजपसह मोदींवर निषाणा साधला.

Intro:Body:Anc : मागच्या पाच वर्षात भाजपा सरकारने तुमच्या नेतृत्वात काय केलं असं जर तुम्ही पंतप्रधानांना विचाराल तर त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचा एकच उत्तरे आत्ता आहे तो म्हणजे कलम370 हटविले देशात शेती शेतकरी रोजगारापासून तर उद्योगा अश्या सर्व क्षेत्रांमध्ये मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे त्यांनी केलेली नोटबंदी आणि जीएसटी मध्ये संपूर्ण देशाचे कंबरडे मोडले आहे मात्र या विधानसभेत ते या विषयी अजिबात बोलत नाहीत ते देशाला राष्ट्रवादाच्या नावाखाली फसवणूक करीत आहेत असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे साकोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस चे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी ते गुरुवारी साकोली येथील होमगार्ड मैदानात आले होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे चार दिवस उरले असताना राज्यात प्रचाराने जोर धरला असून कॉग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्राचारा करिता सिने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे साकोली तालुक्यात आले होते तर त्यांना पाहण्या करिता देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्याचे प्रश्न एकत नाही, ओबीसी चे प्रश्न ऐकत नाही ते हिटलर आहेत असे म्हणत नाना पटोले यांनी भाजप त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता त्याच पाठो पाठ खासदार शत्रूगंन सिन्हा ,खासदार यशवंत सिन्हा यांनी देखील राजीनामा दिला होता. सभेला संबीधित करतांना नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांनी सांगितले की भाजपने देशाला गरीब बनविले, पंतप्रधान देश्यावर आपले निर्णय थोपतात, त्यांच्या नोट बंदीच्या निर्णयाने शेतकरी, गरीब, बेरोजगार, यांना मोठ्या अडचणीला समोर जावे लागले तर gst नंतर तर देशातील उद्दोग मोठ्या प्रमाणात बंद झाले आहेत आणि अजूनही बरेच कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत, आता हे थांबवावे लागेल त्यासाठी भाजपा एकच डोयलाग म्हणण्याची वेळ आली आहे ती म्हणजे खामोश, नाना पटोले विषयी बोलताना त्यांनी सांगितले की हा निर्भीड आणि खरा व्यक्ती असल्याने त्यांना निवडून देण्याचे आव्हान शत्रूगंन सिन्हा यांनी केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.