ETV Bharat / state

भाजप-सेना पतित पावन करणारे तीर्थक्षेत्र आहे का? सचिन अहिरांच्या सेना प्रवेशावरून सक्षणा सलगरांचा सवाल - सचिन अहिरसेनाप्रवेश

गेल्या १३ जुलैपासून राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या भंडाऱयात आल्या असता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाबाबत त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर
author img

By

Published : Jul 25, 2019, 9:58 PM IST

Updated : Jul 26, 2019, 1:07 PM IST

भंडारा - भाजप-सेनेला राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष वाटत होता. या पक्षातील नेते भ्रष्टाचारी आहेत, असेही आरोप त्यांनी केले आहेत. आता त्याच पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात फुल-हार देऊन पतितपावन केले जाते का? भाजप-सेना म्हणजे पतित पावन करणारे तीर्थक्षेत्र झाले आहे का? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. गेल्या १३ जुलैपासून त्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज भंडाऱयात आल्या असता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाबाबत त्या बोलत होत्या.

भाजप-सेना पतित पावन करणारे तीर्थक्षेत्र आहे का? सचिन अहिरांच्या सेना प्रवेशावरून सक्षणा सलगरांचा सवाल

राष्ट्रवादीत असताना लोक भ्रष्टाचारी असतात. भाजप-सेनेत गेल्यानंतर ते पूर्णपणे शुद्ध होतात, असा गैरसमज भाजप आणि सेना पसरवत आहे. भाजप-सेनेमध्ये सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रवादीच्या सक्षम नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच या दोन्ही पक्षात कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भविष्यात केवळ सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार असल्याची खोचक टीका सलगर यांनी केली.

राज्यात महिला असुरक्षित; रक्षाबंधानाला मुख्यमंत्र्यांना पाठवणार साडीचोळी अन् बांगड्या -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महिला असुरक्षित आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर क्राइम कॅपिटल म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे या राज्यात महिला, तरुणी आणि नागरिक सुरक्षीत नाही, असे सलगर म्हणाल्या. तसेच अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या रक्षाबंधनाला साडीचोळी आणि बांगड्या पाठवणार असल्याचे सलगर यांनी सांगितले.

सलगर यांनी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील तरुणींशी, महिलांशी चर्चा करून सध्याची परिस्थिती जाणून घेतली. भाजप सरकार केवळ सत्तेसाठी धावपळ करीत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील सलगर यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री असूनही नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महिला असुरक्षीत आहेत. नागरिक असुरक्षीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असल्याचे सलगर म्हणाल्या.

भंडारा - भाजप-सेनेला राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष वाटत होता. या पक्षातील नेते भ्रष्टाचारी आहेत, असेही आरोप त्यांनी केले आहेत. आता त्याच पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात फुल-हार देऊन पतितपावन केले जाते का? भाजप-सेना म्हणजे पतित पावन करणारे तीर्थक्षेत्र झाले आहे का? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. गेल्या १३ जुलैपासून त्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज भंडाऱयात आल्या असता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाबाबत त्या बोलत होत्या.

भाजप-सेना पतित पावन करणारे तीर्थक्षेत्र आहे का? सचिन अहिरांच्या सेना प्रवेशावरून सक्षणा सलगरांचा सवाल

राष्ट्रवादीत असताना लोक भ्रष्टाचारी असतात. भाजप-सेनेत गेल्यानंतर ते पूर्णपणे शुद्ध होतात, असा गैरसमज भाजप आणि सेना पसरवत आहे. भाजप-सेनेमध्ये सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रवादीच्या सक्षम नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच या दोन्ही पक्षात कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भविष्यात केवळ सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार असल्याची खोचक टीका सलगर यांनी केली.

राज्यात महिला असुरक्षित; रक्षाबंधानाला मुख्यमंत्र्यांना पाठवणार साडीचोळी अन् बांगड्या -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महिला असुरक्षित आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर क्राइम कॅपिटल म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे या राज्यात महिला, तरुणी आणि नागरिक सुरक्षीत नाही, असे सलगर म्हणाल्या. तसेच अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या रक्षाबंधनाला साडीचोळी आणि बांगड्या पाठवणार असल्याचे सलगर यांनी सांगितले.

सलगर यांनी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील तरुणींशी, महिलांशी चर्चा करून सध्याची परिस्थिती जाणून घेतली. भाजप सरकार केवळ सत्तेसाठी धावपळ करीत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील सलगर यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री असूनही नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महिला असुरक्षीत आहेत. नागरिक असुरक्षीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असल्याचे सलगर म्हणाल्या.

Intro:ANC : गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महिला असुरक्षित आहेत तर महाराष्ट्राची उपराजधानी संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर हा क्राइम कॅपिटल म्हणून ओळखला जात आहे त्यामुळे ज्या राज्यात महिला युती आणि नागरिक सुरक्षित नाही अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या रक्षाबंधनाला साडीचोळी आणि बांगड्या पाठवणार आहोत अशी घोषणा राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी आज भंडारा जिल्यात केली, त्या सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर युवती आणि महिलांशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत.


Body:13 जुलैपासून सक्षणा सलगर या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत या काळात त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील युवतींशी महिलांशी चर्चा करून सध्याची परिस्थिती जाणून घेतली, सक्षणा यांनी यावेळी बोलताना सांगितले की भाजपा सरकार केवळ सत्तेसाठी धावपळ करीत आहे तरुण युती महिला यांना त्यांचे शिक्षण रोजगार याविषयी शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री असूनही नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे संपूर्ण महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत नागरिक असुरक्षित आहे त्यामुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ते अपयशी ठरले आहेत तेव्हा या रक्षाबंधनाला ओवाळणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आम्ही साडीचोळी आणि बांगड्यां पाठविणार आहोत.
सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर विचारले असता त्यांनी भाजपा सेनेला चांगलेच धारेवर धरले, भाजपसेना म्हणजे पतित पावन करणारे तीर्थ क्षेत्र झाले आहे का असा प्रश्न निर्माण केला कारण या भाजप सेनेला राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचाराचा पक्ष वाटत होता त्यातील नेते म्हणजे भ्रष्टाचारी आहेत असे ते नेहमी म्हणत होते आता त्याच पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात प्रवेश देताना फुल हार देऊन त्यांचे पतितपावन केले जाते का असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला फक्त राष्ट्रवादीत असताना लोक भ्रष्टाचारी असतात बीजेपी सेनेत गेल्यानंतर ते पूर्णपणे शुद्ध होतात असा गैरसमज भाजपा सेना पसरवत आहे असा आरोप त्यांनी केला तसेच भाजपा सेनेमध्ये सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रवादीच्या सक्षम नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याचं काम भाजपा-सेना करत असल्याने भाजपा सेनेमध्ये कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भविष्यातही केवळ सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार असल्याची खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
बाईट : सक्षणा सलगर , राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष


Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.