ETV Bharat / state

भंडाऱ्यात पावसाचे तांडव; बोधरा तलाव फुटला, सातही तालुक्यात अतिवृष्टी

author img

By

Published : Aug 21, 2020, 2:49 PM IST

जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून सातही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. साकोली तालुक्यातील बोधरा तलाव फुटल्याने गावात पाणी शिरले आहे. तसेच गोसे धरणाचे 33 ही दार उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी
जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी

भंडारा : जिल्ह्यात काल(गुरुवार) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने हाहाकार निर्माण केला आहे. जिल्ह्याच्या सातही तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. एकाच रात्रीत या पावसामुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी 86 टक्क्यावरून 102 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, साकोली तालुक्यातील बोधरा तलाव फुटल्याने गावात पाणी शिरले आहे. तसेच गोसे धरणाचे 33 ही दार उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी

जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून भंडारा तालुक्यात 175 मिलीमीटर, मोहाडी तालुक्यात 180 मामी, तुमसर तालुक्यात 153 मीमी, पवनी तालुक्यात 77 मिमी, साकोली तालुक्यात 254 मिमी, लाखांदूर तालुक्यात 99 मिमी आणि लाखनी तालुक्यात 201 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण 163 टक्के सरासरी पाऊस कालपासून बरसलेला आहे. या पावसामुळे साकोली तालुक्यातील बोधरा तलाव फुटला असून गावांमध्ये पाणी शिरले आहे. सुदैवाने जीवितहनी झालेली नाही. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा या गावातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे गावात पाणी शिरले आहे. तसेच बऱ्याच लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे.

भंडारा शहरातील खात रोडवरील घरात आणि एका मंगल कार्यालय पाणी शिरले आहे. त्यामुळे काही काळ तेथील नागरिकांनी रस्ता जाम केला होता. नगर परिषदेने चुकीच्या पद्धतीने नाल्या बांधल्या असल्याने नागरिकांनी नगर पालिकेविरुद्ध नारेबाजी केली. आनंद मंगल कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर शहरातील आंबेडकर वार्डातील दोन घरे या पावसामुळे कोसळली आहेत.

या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर जवळ पोहोचली आहे. वैनगंगा नदीची धोक्याची पातळी ही 245. 50 एवढी असून सध्या नदीची पाणीपातळी 244.26 एवढी आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि गोसे धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने 33 पैकी 17 दार 1 मीटरने तर 16 दार अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. या मधून 5 हजार 491 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारा : जिल्ह्यात काल(गुरुवार) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने हाहाकार निर्माण केला आहे. जिल्ह्याच्या सातही तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. एकाच रात्रीत या पावसामुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी 86 टक्क्यावरून 102 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, साकोली तालुक्यातील बोधरा तलाव फुटल्याने गावात पाणी शिरले आहे. तसेच गोसे धरणाचे 33 ही दार उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी

जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून भंडारा तालुक्यात 175 मिलीमीटर, मोहाडी तालुक्यात 180 मामी, तुमसर तालुक्यात 153 मीमी, पवनी तालुक्यात 77 मिमी, साकोली तालुक्यात 254 मिमी, लाखांदूर तालुक्यात 99 मिमी आणि लाखनी तालुक्यात 201 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण 163 टक्के सरासरी पाऊस कालपासून बरसलेला आहे. या पावसामुळे साकोली तालुक्यातील बोधरा तलाव फुटला असून गावांमध्ये पाणी शिरले आहे. सुदैवाने जीवितहनी झालेली नाही. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा या गावातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे गावात पाणी शिरले आहे. तसेच बऱ्याच लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे.

भंडारा शहरातील खात रोडवरील घरात आणि एका मंगल कार्यालय पाणी शिरले आहे. त्यामुळे काही काळ तेथील नागरिकांनी रस्ता जाम केला होता. नगर परिषदेने चुकीच्या पद्धतीने नाल्या बांधल्या असल्याने नागरिकांनी नगर पालिकेविरुद्ध नारेबाजी केली. आनंद मंगल कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर शहरातील आंबेडकर वार्डातील दोन घरे या पावसामुळे कोसळली आहेत.

या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर जवळ पोहोचली आहे. वैनगंगा नदीची धोक्याची पातळी ही 245. 50 एवढी असून सध्या नदीची पाणीपातळी 244.26 एवढी आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि गोसे धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने 33 पैकी 17 दार 1 मीटरने तर 16 दार अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. या मधून 5 हजार 491 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.