ETV Bharat / state

'हे पर्यटन क्षेत्र नाही, कृपया आता कोणीही जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊ नये'

author img

By

Published : Jan 12, 2021, 10:12 PM IST

प्रत्येक मंत्री आल्यानंतर तोच तो पणा दिसून येतो. जिल्हाधिकाऱ्यांची, जिल्हा शल्य चिकित्सक, घटनेच्या वेळेवर उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि डॉक्टर, सुरक्षारक्षक आणि पोलीस या सर्वांची विचारपूस आणि घटनास्थळाची पाहणी या सर्व गोष्टीतून काहीही निष्पन्न होत नाही. मात्र, वेळेचा दुरुपयोग तेवढा होतो. त्यामुळे मंत्र्यांनो कृपया भंडाऱ्यात येऊ नका, अशी विनंती आता नागरिक करीत आहेत.

Don't show up at district hospital Angry ccitizens urge to ministers and VIPs
आता कोणीही जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊ नये; भंडाऱ्यातील संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया

भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झालेल्या जळीत अग्निकांडानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मंत्र्यांपासून तर विविध पक्षातील नेतेमंडळींनी हजेरी लावणे सुरू केले आहे. परंतु नागरिकांना अपेक्षित असलेला चौकशी अहवाल अजूनही पुढे आलेला नाही. मात्र, त्यातल्या त्यात नेतेमंडळींचा रुग्णालयाला भेटी देण्याचा प्रकार सतत सुरू असल्याने संतापलेल्या नागरिकांनी, हे पर्यटन क्षेत्र नाही, कृपया कोणीही नेतेमंडळी यानंतर येऊ नका त्यापेक्षा चौकशी समितीचा अहवाल लवकर सादर करा, अशी मागणी केली आहे.

संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया

आतापर्यंत 15 च्यावर मंत्री व नेते येऊन गेले -

ही घटना घडल्यानंतर स्थानिक आमदार आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीला रूग्णालयाला भेट दिली. दहा नवजात बालकांचा मृत्यू ही अतिशय मोठी घटना असल्यामुळे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री विरोधी पक्षनेते यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, एवढ्यापुरताच नेतेमंडळी थांबले नाही. त्यानंतरही विविध मंत्री आणि विविध पक्षातील नेते मंडळी यांची रेलचेल सतत सुरू राहिली. आतापर्यंत जवळपास 15 च्यावर मंत्री आणि नेते मंडळी भेट देऊन गेले आहे.

या पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊ नये -

वारंवार नेतेमंडळी येत असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी या नेतेमंडळींना एक आग्रहाची विनंती केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हे पर्यटन क्षेत्र नाही. तसेच इथे तुम्ही वारंवार येत आहात मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यासारखे नेते आल्यावरही नागरिकांना कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. तेव्हा तुमच्या येण्यामुळे यापेक्षा वेगळे काय होणार आहे. तसेच तुमच्या येण्यामुळे चौकशी समितीच्या कार्यात व्यत्यय निर्माण होतो. आम्हाला तुमची नाही, तर चौकशी अहवालाची वाट आहे, असा संताप नागरिक व्यक्त केला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात नेते येत असल्याने चौकशी प्रभावित -

घटनेची त्वरित चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी दिला होता. मात्र, मंत्रिमंडळातील नेते आणि विविध पक्षातील नेते येत असल्याने चौकशी प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे. कारण नेते येत असल्यामुळे आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासकीय विभाग आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा इतर कामे सोडून त्यांच्यासाठी कार्यरत होते. प्रत्येक मंत्री आल्यानंतर तोच तो पणा दिसून येतो. जिल्हाधिकाऱ्यांची विचारपूस, जिल्हा शल्य चिकित्सक यांची विचारपूस, घटनेच्या वेळेवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची विचारपूस, सुरक्षारक्षक आणि पोलिसांची विचारपूस आणि घटनास्थळाची पाहणी या सर्व गोष्टीतून काहीही निष्पन्न होत नाही. मात्र, वेळेचा दुरुपयोग तेवढा होतो.

वारंवार भेटून त्यांच्या जखमा ताज्या करू नका -

मंत्री आले की रुग्णालयाची झाडाझडती घेतात. वारंवार त्या घटनास्थळी जाऊन त्याची पाहणी करतात आणि नंतर पीडित महिलांना जाऊन काय झाले, असे विचारून त्यांच्या जखमा ताज्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या महिलांचा मानसिक त्रास वाढविण्याचे हा काम मंत्र्यांनी बंद करावे. सध्या या महिलांना आरामाची गरज आहे. तुमच्या भेटी दिल्यामुळे त्यांचा ताण कमी होण्यापेक्षा वाढतो आहे. त्यामुळे मंत्र्यांनो कृपया भंडाऱ्यात येऊ नका, अशी विनंती आता नागरिक करीत आहेत.

हेही वाचा - गरज भासल्यास नाईक यांच्यावर दिल्लीत होतील उपचार - संरक्षण मंत्री

भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झालेल्या जळीत अग्निकांडानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मंत्र्यांपासून तर विविध पक्षातील नेतेमंडळींनी हजेरी लावणे सुरू केले आहे. परंतु नागरिकांना अपेक्षित असलेला चौकशी अहवाल अजूनही पुढे आलेला नाही. मात्र, त्यातल्या त्यात नेतेमंडळींचा रुग्णालयाला भेटी देण्याचा प्रकार सतत सुरू असल्याने संतापलेल्या नागरिकांनी, हे पर्यटन क्षेत्र नाही, कृपया कोणीही नेतेमंडळी यानंतर येऊ नका त्यापेक्षा चौकशी समितीचा अहवाल लवकर सादर करा, अशी मागणी केली आहे.

संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया

आतापर्यंत 15 च्यावर मंत्री व नेते येऊन गेले -

ही घटना घडल्यानंतर स्थानिक आमदार आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीला रूग्णालयाला भेट दिली. दहा नवजात बालकांचा मृत्यू ही अतिशय मोठी घटना असल्यामुळे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री विरोधी पक्षनेते यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, एवढ्यापुरताच नेतेमंडळी थांबले नाही. त्यानंतरही विविध मंत्री आणि विविध पक्षातील नेते मंडळी यांची रेलचेल सतत सुरू राहिली. आतापर्यंत जवळपास 15 च्यावर मंत्री आणि नेते मंडळी भेट देऊन गेले आहे.

या पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊ नये -

वारंवार नेतेमंडळी येत असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी या नेतेमंडळींना एक आग्रहाची विनंती केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हे पर्यटन क्षेत्र नाही. तसेच इथे तुम्ही वारंवार येत आहात मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यासारखे नेते आल्यावरही नागरिकांना कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. तेव्हा तुमच्या येण्यामुळे यापेक्षा वेगळे काय होणार आहे. तसेच तुमच्या येण्यामुळे चौकशी समितीच्या कार्यात व्यत्यय निर्माण होतो. आम्हाला तुमची नाही, तर चौकशी अहवालाची वाट आहे, असा संताप नागरिक व्यक्त केला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात नेते येत असल्याने चौकशी प्रभावित -

घटनेची त्वरित चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी दिला होता. मात्र, मंत्रिमंडळातील नेते आणि विविध पक्षातील नेते येत असल्याने चौकशी प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे. कारण नेते येत असल्यामुळे आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासकीय विभाग आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा इतर कामे सोडून त्यांच्यासाठी कार्यरत होते. प्रत्येक मंत्री आल्यानंतर तोच तो पणा दिसून येतो. जिल्हाधिकाऱ्यांची विचारपूस, जिल्हा शल्य चिकित्सक यांची विचारपूस, घटनेच्या वेळेवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची विचारपूस, सुरक्षारक्षक आणि पोलिसांची विचारपूस आणि घटनास्थळाची पाहणी या सर्व गोष्टीतून काहीही निष्पन्न होत नाही. मात्र, वेळेचा दुरुपयोग तेवढा होतो.

वारंवार भेटून त्यांच्या जखमा ताज्या करू नका -

मंत्री आले की रुग्णालयाची झाडाझडती घेतात. वारंवार त्या घटनास्थळी जाऊन त्याची पाहणी करतात आणि नंतर पीडित महिलांना जाऊन काय झाले, असे विचारून त्यांच्या जखमा ताज्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या महिलांचा मानसिक त्रास वाढविण्याचे हा काम मंत्र्यांनी बंद करावे. सध्या या महिलांना आरामाची गरज आहे. तुमच्या भेटी दिल्यामुळे त्यांचा ताण कमी होण्यापेक्षा वाढतो आहे. त्यामुळे मंत्र्यांनो कृपया भंडाऱ्यात येऊ नका, अशी विनंती आता नागरिक करीत आहेत.

हेही वाचा - गरज भासल्यास नाईक यांच्यावर दिल्लीत होतील उपचार - संरक्षण मंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.