ETV Bharat / state

संविधान बचाव महासभेची ही लढाई आंबेडकर विरुद्ध गोळवलकर - जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Jan 29, 2020, 5:30 PM IST

संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला आहे. ही लढाई केवळ सीएए व एनआरसीच्या विरोधात नाही तर आंबेडकर विरुद्ध गोळवलकर अशी आहे. ही बीडची 'संविधान बचाव महासभा' या आंदोलनाला बळ देईल, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

savidhan bachaw mahasabha protest in beed
संविधान बचाव महासभा बीड

बीड - देशातील कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना मुस्लीम व हिंदू यांच्यात वाद लावून द्यायचा होता. पण इथे संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला. खरे तर मोदी व शहा यांना मुस्लीम समाजाला अस्वस्थ करायचे होते, पण इथे उलटे झाले, संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला आहे. ही लढाई केवळ 'सीएए' व 'एनआरसी'च्या विरोधात नाही तर आंबेडकर विरुद्ध गोळवलकर, अशी आहे. ही बीडची 'संविधान बचाव महासभा' या आंदोलनाला बळ देईल, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

संविधान बचाव महासभा बीड

यावेळी मंचावरील मान्यवरांनी बोलताना सांगितले की, हा देश संविधानाच्या मार्गावर चालणार आहे. त्यामुळे मोदी व शहा यांचे नापाक इरादे देश मोडून काढेल, असा सूर बीड येथील संविधान बचाव महासभेत उमटला. बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे संविधान बचाव महासभा झाली. यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुस्लीम लॉ बोर्डचे मौलाना रहमानी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, समाजसेविका तिस्टा सेटलवाड, जेएनयू विद्यार्थिनी दिपसीता धर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - संगीताचा संघर्ष; पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने उभा केला व्यवसाय

यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील म्हणाले की, हा देश एक आहे. मोदी व शहा कधीच देश तोडण्यात सफल होऊ शकत नाहीत. बीडमधून सीएए व एनआरसीला होत असलेला कडवा विरोध देशातील आंदोलनाला बळ देईल, असे सांगत ते पुढे म्हणाले की, संविधान हेच आमचे हत्यार आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन अजून तीव्र करून केंद्र सरकारला वठणीवर आणू, असे सांगते पुढे म्हणाले की, आरएसएस हाच मुळात हिंदूंचा शत्रू आहे. समाजात असलेला एकोपा आरएसएसला नको आहे. आजवर आरएसएसने दलित, मुस्लीम, आदिवासी समाजातील व्यक्तीला सरसंघचालक केले आहे का? असा प्रश्न कोळसे-पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा - प्रजासत्ताक दिन : पालकमंत्री मुंडेंच्या हस्ते 5 अंधांना प्रत्येकी १ लाखाची मदत

बीड शहरातील श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडा मैदान पूर्ण भरले होते. जिल्हाभरातून वेगवेगळ्या संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान बचाव महासभेमध्ये सहभाग नोंदवला.

बीड - देशातील कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना मुस्लीम व हिंदू यांच्यात वाद लावून द्यायचा होता. पण इथे संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला. खरे तर मोदी व शहा यांना मुस्लीम समाजाला अस्वस्थ करायचे होते, पण इथे उलटे झाले, संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला आहे. ही लढाई केवळ 'सीएए' व 'एनआरसी'च्या विरोधात नाही तर आंबेडकर विरुद्ध गोळवलकर, अशी आहे. ही बीडची 'संविधान बचाव महासभा' या आंदोलनाला बळ देईल, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

संविधान बचाव महासभा बीड

यावेळी मंचावरील मान्यवरांनी बोलताना सांगितले की, हा देश संविधानाच्या मार्गावर चालणार आहे. त्यामुळे मोदी व शहा यांचे नापाक इरादे देश मोडून काढेल, असा सूर बीड येथील संविधान बचाव महासभेत उमटला. बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे संविधान बचाव महासभा झाली. यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुस्लीम लॉ बोर्डचे मौलाना रहमानी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, समाजसेविका तिस्टा सेटलवाड, जेएनयू विद्यार्थिनी दिपसीता धर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - संगीताचा संघर्ष; पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने उभा केला व्यवसाय

यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील म्हणाले की, हा देश एक आहे. मोदी व शहा कधीच देश तोडण्यात सफल होऊ शकत नाहीत. बीडमधून सीएए व एनआरसीला होत असलेला कडवा विरोध देशातील आंदोलनाला बळ देईल, असे सांगत ते पुढे म्हणाले की, संविधान हेच आमचे हत्यार आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन अजून तीव्र करून केंद्र सरकारला वठणीवर आणू, असे सांगते पुढे म्हणाले की, आरएसएस हाच मुळात हिंदूंचा शत्रू आहे. समाजात असलेला एकोपा आरएसएसला नको आहे. आजवर आरएसएसने दलित, मुस्लीम, आदिवासी समाजातील व्यक्तीला सरसंघचालक केले आहे का? असा प्रश्न कोळसे-पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा - प्रजासत्ताक दिन : पालकमंत्री मुंडेंच्या हस्ते 5 अंधांना प्रत्येकी १ लाखाची मदत

बीड शहरातील श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडा मैदान पूर्ण भरले होते. जिल्हाभरातून वेगवेगळ्या संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान बचाव महासभेमध्ये सहभाग नोंदवला.

Intro:संविधान बचाव महासभा; ही लढाई आंबेडकर विरुद्ध गोळवलकर अशीच- जितेंद्र आव्हाड

बीड- देशातील कट्टरवादी हिंदुत्ववादी संघटनांना मुस्लीम व हिंदू यांच्यात वाद लावून द्यायचा होता. पण इथे संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आला. खरं तर मोदी व शहा यांना समाजातील मुस्लिम समाजाला अस्वस्थ करायचे होते, पण इथं उलटच झालयं, संविधानाला मानणारा प्रत्येकजण एकत्र आलाय. ही लढाई केवळ caa व nrc च्या विरोधात नाही तर आंबेडकर विरुद्ध गोळवलकर अशी आहे. ही बीडची संविधान बचाव महासभा हे आंदोलनाला बळ देईल. असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यावेळी मंचावरील मान्यवरांनी बोलताना सांगितले की आदेश संविधानाच्या मार्गावर चालणार आहे त्यामुळे मोदी व शहा यांचे नापाक इरादे देश मोडून काढेल असा सूर बीड येथील संविधान बचाव महासभेत उमटला.


Body:बीड शहरातील शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे संविधान बचाव महासभा झाली. यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुस्लिम लॉ बोर्ड चे मौलाना रहमानी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, समाजसेविका तिस्टा सेटलवाड, जेनियु विध्यर्थीनी दिपसीता धर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील म्हणाले की, हा देश एक आहे. मोदी व शहा कधीच देश तोडण्यात सफल होऊ शकत नाही. बीड मधून caa व nrc ला होत असलेला कडवा विरोध देशातील आंदोलनाला बळ देईल असे सांगत ते पुढे म्हणाले की, संविधान हेच आमचे हत्यार आहे आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन अजून तीव्र करून केंद्रसरकरला वठणीवर आणू असे सांगते पुढे म्हणाले की, आरएसएस हाच मुळात हिंदूंचा शत्रू आहे. समाजात असलेला एकोपा आरएसएस ला नको आहे. आज वर आरएसएस ने दलित, मुस्लीम, आदिवासी समाजातील व्यक्तीला सरसंघचालक केले आहे का? असा प्रश्न कोळसे-पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.


Conclusion:बीड शहरातील श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडा मैदान पूर्ण भरले होते. जिल्हाभरातून वेगवेगळ्या संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान बचाव महासभेमध्ये सहभाग नोंदवला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.