ETV Bharat / state

पंकजा मुंडेंच्या झुंडशाहीमुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात - रवींद्र दळवी

author img

By

Published : Mar 29, 2019, 12:52 PM IST

बीडच्या लोकसभा निवडणुकीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे दहशतीचे सावट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र दळवी यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र दळवी

बीड - लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून काँग्रेसच्या नेत्याला मंत्री पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाली. पंकजा मुंडे यांच्या झुंडशाहीमुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. बीडच्या लोकसभा निवडणुकीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे दहशतीचे सावट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र दळवी यांनी केला आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र दळवी

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या अर्जामधील माहितीवर काँग्रेसचे परभणी जिल्ह्याचे प्रभारी दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतला. यामुळे दादासाहेब मुंडे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र दळवी यांनी गुरुवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर झुंडशाहीचा आरोप केला. बीडची पोलीस भाजपची हस्तक असल्यासारखे वागत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या झुंडशाहीमुळे बीडची लोकसभा निवडणूक दहशतीखाली आहे. जर अशाप्रकारे घटना घडत राहिल्या व पोलिसांनी दुर्लक्ष केले तर लोकसभा निवडणुका लढवायच्या कशा असा प्रश्न काँग्रेसचे रवींद्र दळवी यांनी उपस्थित केला.

बीडमध्ये काँग्रेस नेत्यावर हल्ला केलेल्या भाजपच्या गुंडांना २४ तासात जर बीड पोलिसांनी पकडले नाही तर राज्यभरात काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, प्रशांत पवार, इद्रीश हशमी, नागेश मिटे, गोविंद साठे आदींची उपस्थिती होती.

बीड - लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून काँग्रेसच्या नेत्याला मंत्री पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाली. पंकजा मुंडे यांच्या झुंडशाहीमुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. बीडच्या लोकसभा निवडणुकीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे दहशतीचे सावट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र दळवी यांनी केला आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र दळवी

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या अर्जामधील माहितीवर काँग्रेसचे परभणी जिल्ह्याचे प्रभारी दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतला. यामुळे दादासाहेब मुंडे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र दळवी यांनी गुरुवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर झुंडशाहीचा आरोप केला. बीडची पोलीस भाजपची हस्तक असल्यासारखे वागत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या झुंडशाहीमुळे बीडची लोकसभा निवडणूक दहशतीखाली आहे. जर अशाप्रकारे घटना घडत राहिल्या व पोलिसांनी दुर्लक्ष केले तर लोकसभा निवडणुका लढवायच्या कशा असा प्रश्न काँग्रेसचे रवींद्र दळवी यांनी उपस्थित केला.

बीडमध्ये काँग्रेस नेत्यावर हल्ला केलेल्या भाजपच्या गुंडांना २४ तासात जर बीड पोलिसांनी पकडले नाही तर राज्यभरात काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, प्रशांत पवार, इद्रीश हशमी, नागेश मिटे, गोविंद साठे आदींची उपस्थिती होती.

Intro:बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या झुंडशाही मुळे लोकसभा निवडणुकांवर दहशतीचे सावट; काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र दळवी यांचा आरोप
बीड- लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून काँग्रेसच्या नेत्याला मंत्री पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या झुंडशाही मुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. बीडच्या लोकसभा निवडणुकीवर मंत्री पंकजा मुंडे मुळे दहशतीचे सावट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र दळवी यांनी केला आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.


Body:बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच लोकसभा उमेदवारांचे अर्ज छाननी दरम्यान भाजपचा उमेदवार प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बरोबर दिलेल्या माहितीवर घेतलेल्या आक्षेपामुळे काँग्रेसचे परभणी जिल्ह्याचे प्रभारी दादासाहेब मुंडे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र दळवी यांनी गुरुवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या झुंडशाही विरोधात आरोप केले. बीडची पोलीस भाजपचे हस्तक असल्यासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मंत्री पंकजा मुंडे यांच्या झुंडशाही मुळे बीडची लोकसभा निवडणूक दहशतीखाली आहे. जर अशाप्रकारे घटना घडत राहिल्या व पोलिसांनी दुर्लक्ष केले तर लोकसभा निवडणुका लढवायच्या काशा असा प्रश्न काँग्रेसचे रवींद्र दळवी यांनी उपस्थित केला आहे.


Conclusion:बीडमध्ये काँग्रेस चा नेत्यावर हल्ला केलेल्या भाजपच्या गुंडांना 24 तासात जर बीड पोलिसांनी पकडले नाही तर राज्यभरात काँग्रेस आंदोलन उभा करेल असा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे प्रशांत पवार इद्रीश हशमी मी नागेश मिटे गोविंद साठे आदींची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.