ETV Bharat / state

​​​​​​​'या' गावात धुलिवंदच्या दिवशी काढतात गाढवावरून जावयाची मिरवणूक!

author img

By

Published : Mar 17, 2019, 3:50 PM IST

जिल्ह्यातील एका गावात धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते.

संग्रहित छायाचित्र

बीड - जावई म्हटलं की, मानपान-सन्मान आला. मात्र, जिल्ह्यातील एका गावात धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ऐकून गोंधळात पडलात ना, मात्र ही प्रथा एका गावात गेल्या ९० वर्षांपासून चालत आली आहे.

दरवर्षी धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जावयाला उभा पोशाख करून परत पाठवतात. धुलिवंदनच्या २ दिवस अगोदर संपूर्ण गाव जावयाचा शोध घेत असते. जो जावई मिळेल त्याला पकडून गावात आणून गाढवावरून मिरवणूक काढली जाते. जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा या गावी ही अनोखी प्रथा सुरू आहे.

अशी सुरू झाली ही परंपरा -

९० वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू झाली. असे सांगितले जाते की, गावातील ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला पहिल्यांदा ९० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी गाढवावर बसवून त्यांची गावभर मिरवणूक काढली. हनुमान मंदिराच्या पारावर ही मिरवणूक आणली व त्यानंतर त्या नाराज झालेल्या जावयांचा पारावर मोठा सन्मान केला. त्यांना उभा पोशाख करून सोन्याची अंगठी दिली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली ते आतापर्यंत सुरूच आहे. आता या वर्षीचा जावई कोण? यासाठी गावकरी जावयाचा शोध घेत आहेत. ही अनोखी परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. याची मोठी चर्चा राज्यभरात होत असते.

धुलिवंदनच्या दिवशी डॉल्बी लावला जातो. संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येऊन रंग खेळते. मोठ्या उत्साहात होणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावचे नागरिक देखील धुलिवंदनच्या दिवशी गावामध्ये येतात. ही प्रथा गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे.

मिरवणुकीसाठी असा हेरतात जावई -

धुलिवंदनच्या २ दिवस अगोदरपासूनच गावातील काही लोक जावयावर नजर ठेवून असतात. जावई कुठे आहे त्याची माहिती काढतात व नंतर एक दिवस अगोदर त्या जावयाला गाडीत घालून विडा येथे आणले जाते. धुलिवंदनच्या दिवशी त्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून हनुमान मंदिराच्या पारावर उभा पोशाख, सोन्याच्या अंगठी करून पुन्हा त्या जावयाला त्याच्या गावी नेऊन सोडले जाते. यावर्षी गावकऱ्यांनी जावयाचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यांचा गळाला यावर्षी कोणता जावई लागेल, हे धुलिवंदनच्या दिवशीच कळेल.

बीड - जावई म्हटलं की, मानपान-सन्मान आला. मात्र, जिल्ह्यातील एका गावात धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ऐकून गोंधळात पडलात ना, मात्र ही प्रथा एका गावात गेल्या ९० वर्षांपासून चालत आली आहे.

दरवर्षी धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जावयाला उभा पोशाख करून परत पाठवतात. धुलिवंदनच्या २ दिवस अगोदर संपूर्ण गाव जावयाचा शोध घेत असते. जो जावई मिळेल त्याला पकडून गावात आणून गाढवावरून मिरवणूक काढली जाते. जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा या गावी ही अनोखी प्रथा सुरू आहे.

अशी सुरू झाली ही परंपरा -

९० वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू झाली. असे सांगितले जाते की, गावातील ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला पहिल्यांदा ९० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी गाढवावर बसवून त्यांची गावभर मिरवणूक काढली. हनुमान मंदिराच्या पारावर ही मिरवणूक आणली व त्यानंतर त्या नाराज झालेल्या जावयांचा पारावर मोठा सन्मान केला. त्यांना उभा पोशाख करून सोन्याची अंगठी दिली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली ते आतापर्यंत सुरूच आहे. आता या वर्षीचा जावई कोण? यासाठी गावकरी जावयाचा शोध घेत आहेत. ही अनोखी परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. याची मोठी चर्चा राज्यभरात होत असते.

धुलिवंदनच्या दिवशी डॉल्बी लावला जातो. संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येऊन रंग खेळते. मोठ्या उत्साहात होणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावचे नागरिक देखील धुलिवंदनच्या दिवशी गावामध्ये येतात. ही प्रथा गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे.

मिरवणुकीसाठी असा हेरतात जावई -

धुलिवंदनच्या २ दिवस अगोदरपासूनच गावातील काही लोक जावयावर नजर ठेवून असतात. जावई कुठे आहे त्याची माहिती काढतात व नंतर एक दिवस अगोदर त्या जावयाला गाडीत घालून विडा येथे आणले जाते. धुलिवंदनच्या दिवशी त्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून हनुमान मंदिराच्या पारावर उभा पोशाख, सोन्याच्या अंगठी करून पुन्हा त्या जावयाला त्याच्या गावी नेऊन सोडले जाते. यावर्षी गावकऱ्यांनी जावयाचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यांचा गळाला यावर्षी कोणता जावई लागेल, हे धुलिवंदनच्या दिवशीच कळेल.

Intro:खालील बातमी चे गतवर्षी चेप्रतिकात्मक फोटो डेस्क च्या व्हाट्सअप च्या ग्रुप वर सेंड केले आहेत.....
********************
धुलीवंदन च्या दिवशी बीड मध्ये या गावात जावयाची काढली जाते गाढवावरून मिरवणूक; 90 वर्षापासूनची अनोखी प्रथा

बीड- जावई म्हटलं की, मानपान-सन्मान आला. मात्र बीड जिल्ह्यातल्या एका गावात धुलीवंदन च्या निमित्ताने जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ऐकुन गोंधळात पडलात ना, मात्र ही प्रथा गेल्या 90 वर्षापासून बीड जिल्ह्यातील केज तालुका मधील विडा येथे सुरू आहे. दरवर्षी धुलीवंदनाच्या निमित्ताने जावयाची मिरवणूक काढून जावयाला उभा पोशाख करून परत पाठवले जाते. धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदर संपूर्ण गाव जावयाचा शोध घेत असते. जो जावई मिळेल त्याला पकडून गावात आणून गाढवावरून मिरवणूक काढली जाते.


Body:अशी सुरू झाली ही परंपरा-
90 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू झाली आहे असे सांगितले जाते की, ठाकूर आनंद राव देशमुख यांच्या जावयाला पहिल्यांदा 90 वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी गाढवावर बसवून त्यांची गावभर मिरवणूक काढली. हनुमान मंदिराच्या पारावर ही मिरवणूक आणली व त्यानंतर त्या नाराज झालेल्या जावयांचा पारावर मोठा सन्मान केला. त्यांना उभा पोशाख करून सोन्याची अंगठी दिली. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली ते आतापर्यंत सुरूच आहे आता या वर्षीचा जावई कोण? यासाठी गावकरी जावयाचा शोध घेत आहेत. ही अनोखी परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. याची मोठी चर्चा राज्यभरात होत असते.


Conclusion:मिळाल्या गावात धुलिवंदनच्या दिवशी डॉल्बी लावला जातो. संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येऊन रंग खेळते. मोठ्या उत्साहात होणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावचे नागरिक देखील धुलिवंदनच्या दिवशी येथे ही प्रथा गेल्या नऊ वर्षापासून सुरू आहे.

मिरवणुकीसाठी असा हेरतात जावई-
धुलिवंदनच्या दोन दिवस अगोदर पासूनच गावातील काही लोक जावयावर नजर ठेवून असतात. जावई कुठे आहे त्याची माहिती काढतात व नंतर एक दिवस अगोदर त्या जावयाला गाडीत घालून विडा येथे आणले जाते व धुलिवंदनच्या दिवशी त्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून हनुमान मंदिराच्या पारावर उभा पोशाख, सोन्याच्या अंगठी करून पुन्हा त्या जावयाला त्याच्या गावी नेऊन सोडले जाते. यावर्षी गावकऱ्यांनी जावयाचा शोध घेणे सुरू केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.