ETV Bharat / state

पत्नीच्या छळाला कंटाळून वनरक्षक पतीची आत्महत्या; लग्ना आधीच्याही खर्चाचा मागायची हिशोब

author img

By

Published : Jun 21, 2021, 9:17 PM IST

Updated : Jun 21, 2021, 10:14 PM IST

लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब मागणे, आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे केलेली मारहाण आणि शेती नावावर करण्यावरून पत्नी सतत त्रास देत वनरक्षक असलेल्या अनिल जगताप यांनी आत्महत्या केली.

Forest ranger's husband commits suicide due to wife's harassment;
पत्नीच्या छळाला कंटाळून वनरक्षक पतीची आत्महत्या; लग्ना आधीच्याही खर्चाचा मागायची हिशोब

बीड - पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळलेल्या मृत वनरक्षक असलेल्या पतीने दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल आबासाहेब जगताप (रा. टाकळसींग, ता. आष्टी) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब मागणे, आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे केलेली मारहाण आणि शेती नावावर करण्यावरून पत्नी सतत त्रास देत असल्यामुळे अनिल यांनी गळफास घेत आपली जीवन संपवले. या प्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जमीन नावावर करून देण्यासाठी पतीचा शारीरिक व मानसिक छळ

अनिल यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या माहितीनुसार, अनिलचा विवाह २०१४ साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नीत सातत्याने वाद होऊ लागले. लग्ना अगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोबही ती मागू लागली. तसेच आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही, असेही तिने बजावले. दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर अनिल यांनी आई-वडिलांना घरी फरशी लावण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यात तुंबा मारला होता. याबाबत अश्विनीच्या आई-वडिलांना कळवले होते. मात्र, त्यांनी मुलीचीच बाजू घेतली. तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले. त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करून देण्याचा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.

पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल

यावर्षी मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली हाेती. अनिल यांनी वारंवार फोन करूनही तिने परत येण्यास नकार दिला. जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने त्याला बजावले. अखेर, या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने २८ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुगगाव मार्गावरील एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. २९ मेला ही रोजी उघडकीस आली. या प्रकरणी, अनिल यांच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अजिनाथ देवराव भवर, विजुबाई अजिनाथ भवर, अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर शनिवारी (१९ जून) अनिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा - नागपूर हादरले!!! पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेहुणीला भोसकून आलोक मातूरकरने घेतला गळफास

बीड - पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळलेल्या मृत वनरक्षक असलेल्या पतीने दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल आबासाहेब जगताप (रा. टाकळसींग, ता. आष्टी) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब मागणे, आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे केलेली मारहाण आणि शेती नावावर करण्यावरून पत्नी सतत त्रास देत असल्यामुळे अनिल यांनी गळफास घेत आपली जीवन संपवले. या प्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जमीन नावावर करून देण्यासाठी पतीचा शारीरिक व मानसिक छळ

अनिल यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या माहितीनुसार, अनिलचा विवाह २०१४ साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नीत सातत्याने वाद होऊ लागले. लग्ना अगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोबही ती मागू लागली. तसेच आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही, असेही तिने बजावले. दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर अनिल यांनी आई-वडिलांना घरी फरशी लावण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यात तुंबा मारला होता. याबाबत अश्विनीच्या आई-वडिलांना कळवले होते. मात्र, त्यांनी मुलीचीच बाजू घेतली. तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले. त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करून देण्याचा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.

पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल

यावर्षी मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली हाेती. अनिल यांनी वारंवार फोन करूनही तिने परत येण्यास नकार दिला. जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने त्याला बजावले. अखेर, या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने २८ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुगगाव मार्गावरील एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. २९ मेला ही रोजी उघडकीस आली. या प्रकरणी, अनिल यांच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अजिनाथ देवराव भवर, विजुबाई अजिनाथ भवर, अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर शनिवारी (१९ जून) अनिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा - नागपूर हादरले!!! पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेहुणीला भोसकून आलोक मातूरकरने घेतला गळफास

Last Updated : Jun 21, 2021, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.