ETV Bharat / state

संसाराचा गाडा ओढायचा की, उचल फेडायची? ऊसतोड मजुरांची व्यथा - ऊसतोड मजुरांची वाईट अवस्था

गेल्यावर्षी मुकादमाकडून घेतलेली 80 हजाराची रक्कम फिटली नव्हती. यंदातर अजून वाईट परिस्थिती आहे. कारखाने उसाअभावी चालतील की नाही? अशी स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या 80 हजारातून 45 हजार रुपये उचल आमच्याकडे बाकी आहेत. आता यंदा पुन्हा गेल्याच वर्षीच्याच उचलीत ऊस तोडायला निघालोय, अशी कैफियत मांडताना ऊसतोड कामगारांच्या डोळ्यात पाणी आले.

ऊसतोड मजुरांची व्यथा
author img

By

Published : Oct 30, 2019, 4:34 PM IST

Updated : Oct 31, 2019, 12:53 AM IST

बीड - वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून ऊस तोडणीचे काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील 7 लाख ऊसतोड मजुरांची अवस्था वाईट आहे. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी हातात कोयता घेऊन उसाच्या फडात आयुष्याशी झगडणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या जीवावर जिल्ह्यात अनेक नेते मोठे झाले आहेत. मात्र, उसाच्या फडात आयुष्याचे पाचरट झालेल्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न गेल्या 25 वर्षात सुटले नाहीत.

ऊसतोड मजुरांची व्यथा

ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात बीड जिल्ह्यातून 7 लाखाहून अधिक ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी राज्याबाहेर निघाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या उचलीतच यंदा देखील उस तोडवा लागणार असल्याचे दुःख उरावर घेऊन कामगारांनी कोयता उचलला आहे. या सगळ्या परिस्थितीत कुटुंब जगवायचं कसं? हा प्रश्न ऊसतोड मजुरांनी उपस्थित केला आहे. शासन धोरणामुळे मुकादम देखील उध्वस्त होत आहेत.

हेही वाचा - पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर जाणार का? चर्चांना उधान

गेल्यावर्षी मुकादमाकडून घेतलेली 80 हजाराची रक्कम फिटली नव्हती. यंदातर अजून वाईट परिस्थिती आहे. कारखाने उसाअभावी चालतील की नाही? अशी स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या 80 हजारातून 45 हजार रुपये उचल आमच्याकडे बाकी आहेत. आता यंदा पुन्हा गेल्याच वर्षीच्याच उचलीत ऊस तोडायला निघालोय, अशी कैफियत मांडताना ऊसतोड कामगारांच्या डोळ्यात पाणी आले.

ही व्यथा मांडली आहे धारूर तालुक्यातील ऊसतोड कामगार कलाबाई धोत्रे, दैवाण आंधळे, काळूराम धोत्रे या ऊसतोड मजुरांनी. बीड जिल्ह्यातून 7 लाखहुन अधिक ऊसतोड मजूर उसतोडणीसाठी पर राज्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार व मुकादम वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रदीप भागे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ऊस उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. याचा परिणाम बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांवर होताना दिसत असल्याचे ऊसतोड मजुरांचे मुकादम हनुमंत नागरगोजे यांनी सांगितले.

हेही वाचा - विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला

गेल्यावर्षी साधारणतः 9 कोटी रुपये उचल ऊसतोड कामगारांना मी वाटली होती. या 9 कोटी पैकी केवळ 4 ते साडेचार कोटी रुपये ऊसतोड मजुरांनी फेडले. माझ्याकडे 6 हजार ऊसतोड कामगार काम करतात. या सगळ्या ऊसतोड कामगारांकडे यावर्षी माझी गेल्या वर्षीचेच साडेचार ते 5 कोटी उचल शिल्लक आहेत. आता यावर्षी माझ्याकडच्या ऊसतोड कामगारांना गेल्यावर्षीच्याच उचललीमध्ये काम करावे लागणार आहे. ज्याप्रमाणे ऊसतोड मजुरांवर हे संकट कोसळले आहे. तसेच आम्हा सगळ्या मुकादमाकडे देखील कारखान्याची गेल्या वर्षीची उचल फिटलेली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे केवळ ऊसतोड मजुरच नव्हे तर मुकादम देखील उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे.

उचल फेडायची का? कुटुंब जगवायचं?

गेल्या 10 वर्षापासून ऊस तोडणीचे काम करणाऱ्या कलाबाई धोत्रे व काळूराम धोत्रे यांनी आपली बिकट परिस्थिती मांडताना सांगितले की, गेल्यावर्षी आम्ही 80 हजार रुपये उचल घेऊन कारखान्याला गेलो होतो. या 80 हजारांपैकी साधारणत: 40 हजार रुपये फिटले. राहिलेले 40 हजार रुपये यावर्षी आम्हाला फेडावे लागणार आहेत. आता मुकादमाचे 40 हजार रुपये फेडायचे का? कुटुंब जगवायचं? हा प्रश्न आमच्यासमोर आहे.

मुकादमांकडेही कारखान्याची कोट्यवधीची उचल शिल्लक-

यावर्षी कारखाने आम्हाला देखील उचल देण्यासाठी सकारात्मक नाहीत. कारण गेल्या वर्षीची साखर कारखान्याकडून आणलेली उचल फिटलेली नाही. आमच्याकडे कोट्यवधी रुपयांची साखर कारखान्यांची उचल शिल्लक आहे. यंदा किती दिवस कारखाने चालतील याचा नेम नाही, अशा परिस्थितीत ऊसतोड मजुरांकडील शिल्लक उचल व पुन्हा त्यांना घरखर्चासाठी यंदा द्यावी लागणारी रक्कम याचा कुठेच मेळ बसत नाही. त्यामुळे आम्ही मुकादम देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहोत, अशी व्यथा धारूर येथील मुकादम हनुमंत नागरगोजे यांनी मांडली.

बीड - वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून ऊस तोडणीचे काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील 7 लाख ऊसतोड मजुरांची अवस्था वाईट आहे. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी हातात कोयता घेऊन उसाच्या फडात आयुष्याशी झगडणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या जीवावर जिल्ह्यात अनेक नेते मोठे झाले आहेत. मात्र, उसाच्या फडात आयुष्याचे पाचरट झालेल्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न गेल्या 25 वर्षात सुटले नाहीत.

ऊसतोड मजुरांची व्यथा

ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात बीड जिल्ह्यातून 7 लाखाहून अधिक ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी राज्याबाहेर निघाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या उचलीतच यंदा देखील उस तोडवा लागणार असल्याचे दुःख उरावर घेऊन कामगारांनी कोयता उचलला आहे. या सगळ्या परिस्थितीत कुटुंब जगवायचं कसं? हा प्रश्न ऊसतोड मजुरांनी उपस्थित केला आहे. शासन धोरणामुळे मुकादम देखील उध्वस्त होत आहेत.

हेही वाचा - पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर जाणार का? चर्चांना उधान

गेल्यावर्षी मुकादमाकडून घेतलेली 80 हजाराची रक्कम फिटली नव्हती. यंदातर अजून वाईट परिस्थिती आहे. कारखाने उसाअभावी चालतील की नाही? अशी स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या 80 हजारातून 45 हजार रुपये उचल आमच्याकडे बाकी आहेत. आता यंदा पुन्हा गेल्याच वर्षीच्याच उचलीत ऊस तोडायला निघालोय, अशी कैफियत मांडताना ऊसतोड कामगारांच्या डोळ्यात पाणी आले.

ही व्यथा मांडली आहे धारूर तालुक्यातील ऊसतोड कामगार कलाबाई धोत्रे, दैवाण आंधळे, काळूराम धोत्रे या ऊसतोड मजुरांनी. बीड जिल्ह्यातून 7 लाखहुन अधिक ऊसतोड मजूर उसतोडणीसाठी पर राज्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार व मुकादम वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रदीप भागे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ऊस उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. याचा परिणाम बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांवर होताना दिसत असल्याचे ऊसतोड मजुरांचे मुकादम हनुमंत नागरगोजे यांनी सांगितले.

हेही वाचा - विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला

गेल्यावर्षी साधारणतः 9 कोटी रुपये उचल ऊसतोड कामगारांना मी वाटली होती. या 9 कोटी पैकी केवळ 4 ते साडेचार कोटी रुपये ऊसतोड मजुरांनी फेडले. माझ्याकडे 6 हजार ऊसतोड कामगार काम करतात. या सगळ्या ऊसतोड कामगारांकडे यावर्षी माझी गेल्या वर्षीचेच साडेचार ते 5 कोटी उचल शिल्लक आहेत. आता यावर्षी माझ्याकडच्या ऊसतोड कामगारांना गेल्यावर्षीच्याच उचललीमध्ये काम करावे लागणार आहे. ज्याप्रमाणे ऊसतोड मजुरांवर हे संकट कोसळले आहे. तसेच आम्हा सगळ्या मुकादमाकडे देखील कारखान्याची गेल्या वर्षीची उचल फिटलेली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे केवळ ऊसतोड मजुरच नव्हे तर मुकादम देखील उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे.

उचल फेडायची का? कुटुंब जगवायचं?

गेल्या 10 वर्षापासून ऊस तोडणीचे काम करणाऱ्या कलाबाई धोत्रे व काळूराम धोत्रे यांनी आपली बिकट परिस्थिती मांडताना सांगितले की, गेल्यावर्षी आम्ही 80 हजार रुपये उचल घेऊन कारखान्याला गेलो होतो. या 80 हजारांपैकी साधारणत: 40 हजार रुपये फिटले. राहिलेले 40 हजार रुपये यावर्षी आम्हाला फेडावे लागणार आहेत. आता मुकादमाचे 40 हजार रुपये फेडायचे का? कुटुंब जगवायचं? हा प्रश्न आमच्यासमोर आहे.

मुकादमांकडेही कारखान्याची कोट्यवधीची उचल शिल्लक-

यावर्षी कारखाने आम्हाला देखील उचल देण्यासाठी सकारात्मक नाहीत. कारण गेल्या वर्षीची साखर कारखान्याकडून आणलेली उचल फिटलेली नाही. आमच्याकडे कोट्यवधी रुपयांची साखर कारखान्यांची उचल शिल्लक आहे. यंदा किती दिवस कारखाने चालतील याचा नेम नाही, अशा परिस्थितीत ऊसतोड मजुरांकडील शिल्लक उचल व पुन्हा त्यांना घरखर्चासाठी यंदा द्यावी लागणारी रक्कम याचा कुठेच मेळ बसत नाही. त्यामुळे आम्ही मुकादम देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहोत, अशी व्यथा धारूर येथील मुकादम हनुमंत नागरगोजे यांनी मांडली.

Intro:बीड जिल्ह्यातून दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान सात लाखांहून अधिक ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी परराज्यात जातो मात्र यंदा कारखाने किती दिवस चालतील याचा भरवसा नाही यातच गेल्या वर्षीची उचल भेटलेली नसल्याने बीड जिल्ह्यातील सात लाखांहून अधिक तोड मजूर संकटात सापडला आहे मुका जन्मांची देखील आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे गेल्यावर्षी कारखान्यांकडून घेतलेली उचल विकली नसल्याचे मुकादम हनुमंत नागरगोजे यांनी सांगितले


Body:बीड


Conclusion:बीड
Last Updated : Oct 31, 2019, 12:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.