ETV Bharat / state

धक्कादायक! ६० टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या विळख्यात

बीड जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार बनलेल्या महिलांसाठी काम करणाऱ्या बनसारोळा विकास मंडळाच्या समुपदेशकांनी मागील २५ वर्ष केलेल्या कामासह पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे कुटुंबात केवळ सुनेवरच अन्याय, अत्याचार होतो असे नाही, तर जन्मदात्या आई-वडिलांनीदेखील आपल्या अल्पवयीन मुलींचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

author img

By

Published : Feb 22, 2020, 10:42 PM IST

Updated : Feb 22, 2020, 11:32 PM IST

domestic violence
सांकेतिक छायाचित्र

बीड - महिलाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य न होणारी मानसिकता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बळावत आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगण्याचा अट्टहास करणाऱ्या कुटुंबामध्ये महिलेचा छळ होण्याचे प्रमाण मागच्या पाच वर्षात ४५ टक्‍क्‍यांवरून चक्क ६० टक्क्यावर गेले असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार बनलेल्या महिलांसाठी काम करणाऱ्या बनसारोळा विकास मंडळाच्या समुपदेशकांनी मागील २५ वर्ष केलेल्या कामासह पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे कुटुंबात केवळ सुनेवरच अन्याय, अत्याचार होतो असे नाही, तर जन्मदात्या आई-वडिलांनीदेखील आपल्या अल्पवयीन मुलींचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आणि नव्याने आयुष्य जगण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांच्या, मुलींच्या समस्येचा 'ईटीव्ही भारत' आढावा घेतला आहे.

धक्कादायक! ६० टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या विळख्यात

हेही वाचा - अभिनेत्यासह दिग्दर्शकाला चित्रपट गृहासमोरच मारहाण

बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे. शिक्षणाचा अभाव, कुटुंबाची खोटी प्रतिष्ठा, बळावलेली संशयी वृत्ती आणि महिलांचे स्वतंत्र आयुष्य मान्य नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे कुटुंबातील महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत. आतापर्यंत सासू-सुनांची भांडणे किंवा सुनेचा सासरी होणारा छळ या घटना अधिक प्रमाणात घडत होत्या. मात्र, आता पोटच्या मुलीचादेखील आई-वडिलांनी छळ केल्यामुळे अल्पवयीन पीडित मुली स्वाधारगृहामध्ये वास्तव्य करत आहेत, अशी माहिती स्वाधार गृहाच्या समुपदेशिका आशा जाधव आणि उषा धनवडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

अत्यंत क्षुल्लक कारणावरून वाद, आत्महत्येपर्यंत गेलेली भांडण यासह अनेक गंभीर घटनांमधील पीडित महिला या स्वाधारगृहात वास्तव्य करत आहेत. इच्छेविरुद्ध लग्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हाकलून दिलेली अल्पवयीन पीडिताही याच आधारगृहात वास्तव्यास आहे.

हेही वाचा - २०० कोटींच्या कर्ज प्रकरणात बॉलिवूड निर्माता - दिग्दर्शकाला अटक

बनसारोळा विकास मंडळ ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून महिलांच्या प्रश्नांवर काम करते. तुटलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी विशेष मार्गदर्शन या मंडळाच्यावतीने केले जाते. केंद्र शासनाअंतर्गत या संस्थेमध्ये स्वाधारगृह चालवले जाते. या गृहात कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडितांना आधार देऊन त्यांचे पूनर्वसन केले जाते. कौटुंबिक हिंसाचारात शहरी आणि ग्रामीण असा फरक नसल्याचे संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि ज्येष्ठ समाजसेवक एस. बी. सय्यद यांनी सांगितले.

बीड - महिलाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य न होणारी मानसिकता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बळावत आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगण्याचा अट्टहास करणाऱ्या कुटुंबामध्ये महिलेचा छळ होण्याचे प्रमाण मागच्या पाच वर्षात ४५ टक्‍क्‍यांवरून चक्क ६० टक्क्यावर गेले असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार बनलेल्या महिलांसाठी काम करणाऱ्या बनसारोळा विकास मंडळाच्या समुपदेशकांनी मागील २५ वर्ष केलेल्या कामासह पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे कुटुंबात केवळ सुनेवरच अन्याय, अत्याचार होतो असे नाही, तर जन्मदात्या आई-वडिलांनीदेखील आपल्या अल्पवयीन मुलींचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आणि नव्याने आयुष्य जगण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांच्या, मुलींच्या समस्येचा 'ईटीव्ही भारत' आढावा घेतला आहे.

धक्कादायक! ६० टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या विळख्यात

हेही वाचा - अभिनेत्यासह दिग्दर्शकाला चित्रपट गृहासमोरच मारहाण

बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे. शिक्षणाचा अभाव, कुटुंबाची खोटी प्रतिष्ठा, बळावलेली संशयी वृत्ती आणि महिलांचे स्वतंत्र आयुष्य मान्य नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे कुटुंबातील महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत. आतापर्यंत सासू-सुनांची भांडणे किंवा सुनेचा सासरी होणारा छळ या घटना अधिक प्रमाणात घडत होत्या. मात्र, आता पोटच्या मुलीचादेखील आई-वडिलांनी छळ केल्यामुळे अल्पवयीन पीडित मुली स्वाधारगृहामध्ये वास्तव्य करत आहेत, अशी माहिती स्वाधार गृहाच्या समुपदेशिका आशा जाधव आणि उषा धनवडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

अत्यंत क्षुल्लक कारणावरून वाद, आत्महत्येपर्यंत गेलेली भांडण यासह अनेक गंभीर घटनांमधील पीडित महिला या स्वाधारगृहात वास्तव्य करत आहेत. इच्छेविरुद्ध लग्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हाकलून दिलेली अल्पवयीन पीडिताही याच आधारगृहात वास्तव्यास आहे.

हेही वाचा - २०० कोटींच्या कर्ज प्रकरणात बॉलिवूड निर्माता - दिग्दर्शकाला अटक

बनसारोळा विकास मंडळ ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून महिलांच्या प्रश्नांवर काम करते. तुटलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी विशेष मार्गदर्शन या मंडळाच्यावतीने केले जाते. केंद्र शासनाअंतर्गत या संस्थेमध्ये स्वाधारगृह चालवले जाते. या गृहात कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडितांना आधार देऊन त्यांचे पूनर्वसन केले जाते. कौटुंबिक हिंसाचारात शहरी आणि ग्रामीण असा फरक नसल्याचे संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि ज्येष्ठ समाजसेवक एस. बी. सय्यद यांनी सांगितले.

Last Updated : Feb 22, 2020, 11:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.