ETV Bharat / state

दिलासादायक..! मागील दहा वर्षात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा

लघु प्रकल्पामध्ये बीड जिल्ह्यातील महासांगवी मध्यम प्रकल्प, लांबडवाडी, इंचरणा, मौज, ईट, दुजगव्हाण, पिंपळवंडी व नारायणगड येथील सिंचन प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहेत. या दरम्यान मोठे पाऊस होत असतात. त्यामुळे यंदा पावसाची चांगली परिस्थिती असल्याने बळीराजा सुखावला आहे.

author img

By

Published : Jul 29, 2020, 12:22 PM IST

Updated : Aug 1, 2020, 2:42 PM IST

good rainfall in beed
बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा

बीड - यंदा दुष्काळी बीड जिल्ह्यावर वरुण राजाने कृपा केली आहे. मागील आठ दहा वर्षाच्या पावसाच्या सरासरीनुसार परतीच्या पावसावरच बीड जिल्ह्याची मदार असते. यावर्षी मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 61.89 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी बीड जिल्ह्यातील लघु व मध्यम असे एकूण 144 सिंचन प्रकल्पापैकी अर्धे प्रकल्प 50 टक्के भरले आहेत. तर काही प्रकल्पांमध्ये 40 ते 45 टक्के पाणीसाठा झाला आहे.

बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा
दरवर्षी 30 जुलै नंतर बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाचे आगमन होते. त्यानंतरच पेरण्या होतात व पुन्हा हा पाऊस लांबणीवर जातो, परिणामी जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याेच पाहायला मिळाले. यंदा मात्र, वरुण राजाने बीड जिल्ह्यावर कृपा केली आहे. लघु प्रकल्पामध्ये बीड जिल्ह्यातील महासांगवी मध्यम प्रकल्प, लांबडवाडी, इंचरणा, मौज, ईट, दुजगव्हाण, पिंपळवंडी व नारायणगड येथील सिंचन प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहेत. या दरम्यान मोठे पाऊस होत असतात. त्यामुळे यंदा पावसाची चांगली परिस्थिती असल्याने बळीराजा सुखावला आहे.दर वर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र यंदा आष्टी, केज, अंबाजोगाई, धारूर, गेवराई या तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरला देखील पाणी आले आहे.

बीड - यंदा दुष्काळी बीड जिल्ह्यावर वरुण राजाने कृपा केली आहे. मागील आठ दहा वर्षाच्या पावसाच्या सरासरीनुसार परतीच्या पावसावरच बीड जिल्ह्याची मदार असते. यावर्षी मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 61.89 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी बीड जिल्ह्यातील लघु व मध्यम असे एकूण 144 सिंचन प्रकल्पापैकी अर्धे प्रकल्प 50 टक्के भरले आहेत. तर काही प्रकल्पांमध्ये 40 ते 45 टक्के पाणीसाठा झाला आहे.

बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा
दरवर्षी 30 जुलै नंतर बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाचे आगमन होते. त्यानंतरच पेरण्या होतात व पुन्हा हा पाऊस लांबणीवर जातो, परिणामी जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याेच पाहायला मिळाले. यंदा मात्र, वरुण राजाने बीड जिल्ह्यावर कृपा केली आहे. लघु प्रकल्पामध्ये बीड जिल्ह्यातील महासांगवी मध्यम प्रकल्प, लांबडवाडी, इंचरणा, मौज, ईट, दुजगव्हाण, पिंपळवंडी व नारायणगड येथील सिंचन प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहेत. या दरम्यान मोठे पाऊस होत असतात. त्यामुळे यंदा पावसाची चांगली परिस्थिती असल्याने बळीराजा सुखावला आहे.दर वर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र यंदा आष्टी, केज, अंबाजोगाई, धारूर, गेवराई या तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरला देखील पाणी आले आहे.
Last Updated : Aug 1, 2020, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.