औरंगाबाद - पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत इच्छुकांनी बंडखोरी केल्याच दिसून येत आहे. भाजपचे प्रवीण घुगे, बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आणि माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
चंद्रकांत पाटील यांनी नाराजांची समजूत काढणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यानुसार नाराज उमेदवारांची त्यांनी भेट घेतल्याचं बोललं जात आहे, असे असताना नाराजी नाट्य समोर आल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. 17 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत बंडखोरी शमवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी.. पक्षासमोर आव्हान - औरंगाबाद पदवीधर निवडणूक
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत बंडखोरी झाली आहे. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्याचबरोबर भाजपचे प्रवीण घुगे व जयसिंगराव गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडखोरी शमवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
![औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी.. पक्षासमोर आव्हान Rebellion in BJP in Aurangabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9516016-571-9516016-1605108581099.jpg?imwidth=3840)
औरंगाबाद - पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत इच्छुकांनी बंडखोरी केल्याच दिसून येत आहे. भाजपचे प्रवीण घुगे, बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आणि माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
चंद्रकांत पाटील यांनी नाराजांची समजूत काढणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यानुसार नाराज उमेदवारांची त्यांनी भेट घेतल्याचं बोललं जात आहे, असे असताना नाराजी नाट्य समोर आल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. 17 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत बंडखोरी शमवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.