ETV Bharat / state

घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून हत्या; पतीनेच पोलीस ठाण्यात जाऊन दिली माहिती

author img

By

Published : Aug 17, 2019, 10:14 PM IST

उस्मानने घराबाहेर शेळी बांधण्याच्या दोरीने पत्नी नाजनींनची गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी पतीने घराला कुलूप लावून छावणी पोलीस ठाण्यात जाऊन, मी पत्नीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह घरात पडून आहे. असे पोलिसांना सांगितले.

आरोपी पती

औरंगाबाद - पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना शहराच्या कासम्बरीनगर भागात घडली आहे. नाजनींन उस्मान शेख (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर उस्मान शेख असे आरोपी पतीचे नाव आहे. हत्येनंतर घराला कुलूप लावून आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला.

पतीनेच केली पत्नीची गळा आवळून हत्या

मागील काही काळापासून पती-पत्नीत वाद होत होते. शनिवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, उस्मानने घराबाहेर शेळी बांधण्याच्या दोरीने पत्नी नाजनींनची गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी पतीने घराला कुलूप लावून छावणी पोलीस ठाण्यात जाऊन, मी पत्नीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह घरात पडून आहे, असे पोलिसांना सांगितले. त्याचे बोलणे एकून पोलीस चक्रावले. पोलीस उस्मानला घटनास्थळी घेऊन गेले असता पलंगावर नाजनींन मृतावस्थेत पडलेली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी उस्मानला अटक केली आहे. मृत नाजनींन आणि उस्मान या दोघांनी १५ वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. या दाम्पत्याला पाच मुले आहेत.

औरंगाबाद - पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना शहराच्या कासम्बरीनगर भागात घडली आहे. नाजनींन उस्मान शेख (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर उस्मान शेख असे आरोपी पतीचे नाव आहे. हत्येनंतर घराला कुलूप लावून आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला.

पतीनेच केली पत्नीची गळा आवळून हत्या

मागील काही काळापासून पती-पत्नीत वाद होत होते. शनिवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, उस्मानने घराबाहेर शेळी बांधण्याच्या दोरीने पत्नी नाजनींनची गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी पतीने घराला कुलूप लावून छावणी पोलीस ठाण्यात जाऊन, मी पत्नीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह घरात पडून आहे, असे पोलिसांना सांगितले. त्याचे बोलणे एकून पोलीस चक्रावले. पोलीस उस्मानला घटनास्थळी घेऊन गेले असता पलंगावर नाजनींन मृतावस्थेत पडलेली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी उस्मानला अटक केली आहे. मृत नाजनींन आणि उस्मान या दोघांनी १५ वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. या दाम्पत्याला पाच मुले आहेत.

Intro:
15 वर्षांपूर्वी घरच्यांचा विरोध जुगारून प्रेमविवाह केला मात्र घरातील किरकोळ भांडणावरून पतीनेच प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा दोरखंडणे गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली व हत्येनंतर घराला कुलूप लावून स्वता पोलीस ठाण्यात हजर झाला. हा गंभीर प्रकार घडला आहे औरंगाबाद शहराच्या कासम्बरीनगर भागात
नाजनींन उस्मान शेख असे हत्या करण्यात आलेल्या 35 वर्षीय महिलेचे नाव आहे. तर उस्मान शेख असे पत्नीची हत्या करणाऱ्या क्रूर पतीचे नाव आहे..

Body:
मृत नाजनींन आणि उस्मान या दोघांनी 16 वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. या दाम्पत्याला पाच मुले आहेत.मागील काही काळा पासून पती पत्नीत वाद होत होते. आज दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोघा मध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडण विकोपाला गेले त्या नन्तर उस्मान ने घराबाहेर शेळी बांधण्यच्या दोरखंडाच्या साहाय्याने पत्नी नाजनींन चा गळा आवळून क्रूर पद्धतीने हत्या केली. व घराला कुलूप लावून थेट छावणी पोलीस ठाण्यात जाऊन मी पत्नीची हत्या केली आहे तिचा मृतदेह घरात पडून आहे असे म्हणाला त्याचे शब्द एकूण पोलिसही चक्रावले पोलिसांनी उस्मानला घटनास्थळी घेऊन गेले असता पलंगावर नाजनींन मृत अवस्थेत पडलेली होती. छावणी पोलिसांनी उस्मानला अटक केली आहे.

बाईट...
गणेश सुरवसे ,
पोलीस उपनिरीक्षक,
छावणी पोलीस ठाणे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.