ETV Bharat / state

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने घेतला पेट

मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने पेट घेतला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

author img

By

Published : May 26, 2019, 12:07 PM IST

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने घेतला पेट

औरंगाबाद - जालना येथून मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने पेट घेतला. ही घटना नागपूर-मुंबई महामार्गावर शनिवारी घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने घेतला पेट

करंजगाव परिसरात ट्रक चालक प्रदीप चव्हाण हा (एम. एच. ०४ ई. एल. २८९४) या ट्रकने लोखंडी सळ्या घेऊन मुंबईकडे जात होता. दरम्यान, परसोडा फाट्याजवळ येताच ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले. यात मशीनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून गाडीतून उडी मारली.

ग्रामस्थांनी रस्त्याने जाणारे पाण्याचे टँकर थांबवले आणि ट्रकवर पाणी मारून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी परिसरातील पाणी टँकर चालक सोन्याबापू मराठे, रवी मोकळे सतीश मगर, तुकाराम वाळके आणि ग्रामस्थांनी मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.

औरंगाबाद - जालना येथून मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने पेट घेतला. ही घटना नागपूर-मुंबई महामार्गावर शनिवारी घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने घेतला पेट

करंजगाव परिसरात ट्रक चालक प्रदीप चव्हाण हा (एम. एच. ०४ ई. एल. २८९४) या ट्रकने लोखंडी सळ्या घेऊन मुंबईकडे जात होता. दरम्यान, परसोडा फाट्याजवळ येताच ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले. यात मशीनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून गाडीतून उडी मारली.

ग्रामस्थांनी रस्त्याने जाणारे पाण्याचे टँकर थांबवले आणि ट्रकवर पाणी मारून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी परिसरातील पाणी टँकर चालक सोन्याबापू मराठे, रवी मोकळे सतीश मगर, तुकाराम वाळके आणि ग्रामस्थांनी मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.

Intro:जालना येथून मुंबई कडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रक च्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन धावत ट्रक पेटलं ही घटना नागपूर मुंबई महामार्गावर शनिवारी घडली.चालकाने प्रसंगावधान राखल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.Body:करंजगाव परिसरात ट्रक चालक प्रदीप चव्हाण हा एम एच04ई एल2894 ट्रक ने लोखंडी गज घेऊन मुंबईकडे जात होता दरम्यान परसोडा फाट्याजवळ येताच ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले यात मशीनमधून दूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून गाडीतून उडी मारताच ट्रकने पेट घेतला बघता बघता ही आग वाढतच गेल्याने ग्रामस्थांनी रस्त्याने जाणारे पाण्याचे टँकर उभे करत त्यातील पाण्याने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही यावेळी परिसरातील पाणी टँकर चालक सोन्याबापू मराठे, रवी मोकळे सतीश मगर ,तुकाराम वाळके ,ग्रामस्थांनी मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.