ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार खते, बियाणे उपलब्ध करून देणार - भुसे

author img

By

Published : May 30, 2021, 9:21 PM IST

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचे कृषी विभागाचे नियोजन असून, सरकार नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे. सकारात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने शासन कृतीशील असून, शेती फायद्याची होण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार खते, बियाणे उपलब्ध करून देणार - भुसे
शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार खते, बियाणे उपलब्ध करून देणार - भुसे

औरंगाबाद - जिल्ह्यात खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचे कृषी विभागाचे नियोजन असून, सरकार नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे. सकारात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने शासन कृतीशील असून, शेती फायद्याची होण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत.

कृषीमंत्री दादा भुसे यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात खतांची, बियाण्यांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून, खत, बी- बियाणे यांची कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांची युरीयाची मागणी ही जास्त असल्याने त्यांना वाढीव प्रमाणात युरीया व इतर खते उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीकविमा प्रस्तावाबाबत जिल्ह्यातील प्रस्तावाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री सत्तार यांच्या सूचनेनुसार संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

राज्यात रब्बी व खरीप हंगामासाठी शेतकरी हिस्सा, राज्य हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा मिळून साधारणत: पाच हजार आठशे कोटी रुपयांची रक्कम पीकविम्यापोटी कंपन्यांना मिळाली, मात्र एकूण आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी केवळ एक हजार कोटी रुपयेच मिळाले आहेत. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या चार हजार आठशे कोटी रुपये कंपन्याना मिळाले. ही गोष्ट गंभीर असून, याची देखील चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगतिले.

शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार खते, बियाणे उपलब्ध करून देणार - भुसे

...तरीही शेतकऱ्यांना मदत - भुसे

गेल्या वर्षापासून कोरोना संकटामुळे राज्याचे उत्पन्न, आर्थिक स्त्रोत अडचणीत असतानाही राज्य शासनाने गारपीट, अवकाळी पाऊस यासह इतर विविध नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत केली आहे. महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 31 लाख शेतकरी बांधवाचे 20 हजार कोटी रुपये वर्ग केले आहेत. तसेच खतांच्या वाढीव दरात कपात करण्याबाबत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यानेच केंद्राकडे मागणी केली. त्यानुसार केंद्राने गेल्या वर्षीच्या किमतीप्रमाणेच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना लागणारे बियाणे उपलब्ध होण्यासाठी महाबीजकडून 10 टक्के बियाणे तर उर्वरीत बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी भुसे यांनी दिली.

पुढील वर्षांच्या बियाण्यांचे नियोजन आतापासूनच - भुसे

तसेच गावनिहाय शेतकऱ्यांची त्यांच्याकडील शिल्लक बियाण्यांची यादी कृषी सेवकांनी तयार केलेली आहे. बियाणे उगवण क्षमताबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच महाबीजच्या वतीने पूढील वर्षी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन आता पासूनच सुरू केले आहे. बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, ते संबंधित कंपन्यांसोबत त्याबाबत चर्चा करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देतील. शेतकऱ्याला मोबदला जर समाधानकारक वाटला नाही, तर ते ग्राहक मंचाकडे देखील न्याय मागू शकतात असं देखील यावेळी दादा भुसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - बिहार : रुग्णवाहिका उद्घाटन वादप्रकरणी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीवर दहा पानांचा एफआयआर दाखल

औरंगाबाद - जिल्ह्यात खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचे कृषी विभागाचे नियोजन असून, सरकार नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे. सकारात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने शासन कृतीशील असून, शेती फायद्याची होण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत.

कृषीमंत्री दादा भुसे यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात खतांची, बियाण्यांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून, खत, बी- बियाणे यांची कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांची युरीयाची मागणी ही जास्त असल्याने त्यांना वाढीव प्रमाणात युरीया व इतर खते उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीकविमा प्रस्तावाबाबत जिल्ह्यातील प्रस्तावाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री सत्तार यांच्या सूचनेनुसार संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

राज्यात रब्बी व खरीप हंगामासाठी शेतकरी हिस्सा, राज्य हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा मिळून साधारणत: पाच हजार आठशे कोटी रुपयांची रक्कम पीकविम्यापोटी कंपन्यांना मिळाली, मात्र एकूण आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी केवळ एक हजार कोटी रुपयेच मिळाले आहेत. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या चार हजार आठशे कोटी रुपये कंपन्याना मिळाले. ही गोष्ट गंभीर असून, याची देखील चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगतिले.

शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार खते, बियाणे उपलब्ध करून देणार - भुसे

...तरीही शेतकऱ्यांना मदत - भुसे

गेल्या वर्षापासून कोरोना संकटामुळे राज्याचे उत्पन्न, आर्थिक स्त्रोत अडचणीत असतानाही राज्य शासनाने गारपीट, अवकाळी पाऊस यासह इतर विविध नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत केली आहे. महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 31 लाख शेतकरी बांधवाचे 20 हजार कोटी रुपये वर्ग केले आहेत. तसेच खतांच्या वाढीव दरात कपात करण्याबाबत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यानेच केंद्राकडे मागणी केली. त्यानुसार केंद्राने गेल्या वर्षीच्या किमतीप्रमाणेच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना लागणारे बियाणे उपलब्ध होण्यासाठी महाबीजकडून 10 टक्के बियाणे तर उर्वरीत बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी भुसे यांनी दिली.

पुढील वर्षांच्या बियाण्यांचे नियोजन आतापासूनच - भुसे

तसेच गावनिहाय शेतकऱ्यांची त्यांच्याकडील शिल्लक बियाण्यांची यादी कृषी सेवकांनी तयार केलेली आहे. बियाणे उगवण क्षमताबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच महाबीजच्या वतीने पूढील वर्षी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन आता पासूनच सुरू केले आहे. बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, ते संबंधित कंपन्यांसोबत त्याबाबत चर्चा करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देतील. शेतकऱ्याला मोबदला जर समाधानकारक वाटला नाही, तर ते ग्राहक मंचाकडे देखील न्याय मागू शकतात असं देखील यावेळी दादा भुसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - बिहार : रुग्णवाहिका उद्घाटन वादप्रकरणी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीवर दहा पानांचा एफआयआर दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.