ETV Bharat / state

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

author img

By

Published : Jul 3, 2019, 9:08 PM IST

मृतक शेतकरी किशोर कल्याणराव ठोंबरे

औरंगाबाद- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये घडली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याचे दृष्य
गंगापूर तालुक्यातील दिनवाडा येथील किशोर ठोंबरे हा गावातील तरुण शेतकरी होता. घरातील सर्वात मोठा, शिवाय पालकांना एकुलता एक मुलगा असल्याने घरातील कर्ता व्यक्ती तोच होता. गेल्या तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे किशोरच्या शेतात कमी उतपन्न होत होते. तसेच सततची नापिकी व खासगी सावकार आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणार नसल्याची चिंता देखील त्याला सतावत होती. या विवचनेतून किशोरने स्वत:च्याच मालकीच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला फाशी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये घडली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याचे दृष्य
गंगापूर तालुक्यातील दिनवाडा येथील किशोर ठोंबरे हा गावातील तरुण शेतकरी होता. घरातील सर्वात मोठा, शिवाय पालकांना एकुलता एक मुलगा असल्याने घरातील कर्ता व्यक्ती तोच होता. गेल्या तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे किशोरच्या शेतात कमी उतपन्न होत होते. तसेच सततची नापिकी व खासगी सावकार आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणार नसल्याची चिंता देखील त्याला सतावत होती. या विवचनेतून किशोरने स्वत:च्याच मालकीच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला फाशी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Intro:बाभळीच्या झाडाला फाशी घेऊन एका तरुण शेतक-याने मृत्युस कवटाळल्याची घटना गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये घडली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे या तरुण शेतक-याचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जाची परतफेड करण्याच्या विवचनेतून त्याने आत्महत्या केली
Body:
गंगापूर तालुक्यातील दिनवाडातील किशोर ठोंबरे हा गावातील तरुण शेतकरी होता. घरातील सर्वात मोठा शिवाय पालकांना एकुलता एक मुलगा असल्याने घरातील कर्ता व्यक्ती म्हणून किशोर होता. गेल्या तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे शेतीचं उत्पन्न हे अत्यल्प दरात होत आहे. सततची नापिकी आणि खासगी सावकार तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड, या विवचनेतून किशोर या तरुण शेतक-याने आत्महत्या केली आहे. स्वतःच्या मालकीच्या शेतात बाभळीच्या झाडाला फाशी घेत मृत्यूला कवटाळले आहे. तरुण शेतक-याने आत्महत्या केल्याच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीयं. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.