ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये कीटकनाशक फवारणीनंतर तीन एकरवरील कपाशी वाळली

author img

By

Published : Aug 30, 2019, 10:51 AM IST

कीटकनाशक फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याचे तीन एकरवरील सरकीचे पीक वाळले आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याने औषध दुकानदारावर कारवई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

किटक नाशक फवारणी केल्यामुळ शेतकऱ्याचे नुकसान

औरंगाबाद - लाडसावंगीजवळील आलमपूर शिवारातील कपाशीवर कीटकनाशक फवारणी केल्याने तीन एकरवरील सरकी वाळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी सहायक गावात येत नसल्यामुळे कृषी दुकानदार जे औषध फवारणी करण्याचा सल्ला देतात तेच शेतकरी शेतात फवारतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी दुकानदार जास्त नफा देणारी औषधे फवारणी करण्याचा सल्ला देऊन शेतकऱ्याची लुटमार करतात.

कीटकनाशक फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान

हेही वाचा - बैल पोळ्याच्या आदल्या दिवशीच विजेचा झटका लागून दोन बैलांचा मृत्यू, शेतकरी गंभीर जखमी

भोगलवाडी क्रमांक २ येथील मदनसिंग फुलसिंग मंडावत या शेतकऱ्याने आलमपूर शिवारात (गट क्रमांक १०/१ ) पाच एकर कपाशी लागवड केली. यात तीन एकरावर १० ऑगस्टला कीटकनाशक व टॉनिक मिसळून फवारले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शेतात गेले असता कपाशीचे पिक करपून गेल्याने कृषी दुकानदाराला हा प्रकार दाखवला. त्याने सुचवलेल्या फवारण्या दोन वेळा केल्या परंतु कपाशीचे पिक सुधारण्याऐवजी वाळून गेल्याने तब्बल तीन एकरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - लातूरमध्ये शेती व्यवसाय धोक्यात; जगावे की मरावे शेतकऱ्यांसमोर प्रश्न

कपाशीवरील औषध फवारणी केल्यानंतर हा प्रकार दुकानदाराला दाखवला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. १७ ऑगस्टला तेच औषध दुकानदारासमोर दुसऱ्या शेतातील कपाशीवर फवारले असता तेही वाळत असल्याचे शेतकऱ्याने दुकानदाराला दाखवले. त्यानंतर दुकानदाराने आरेरावी केल्याचे शेतकऱयाने सांगितले. २० ऑगस्टला औषध दुकानदाराने कंपनीच्या अधिकाऱ्याना वाळलेली कपाशी दाखवायला आणले, मात्र शेतातल्या जमिनीत घटक कमी आहेत म्हणून असे झाले, असा किरकोळ पंचनामा करून अधिकारी निघून गेले. आधीच दुष्काळजन्य परस्थिती त्यात औषध फवारणीने तीन एकर जमिनीवरील कपाशी वाळून गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. वरिष्ठांनी दखर घेऊन संबंधीत औषध दुकानदारावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मदनसिंग मडावत यांनी केली आहे.

औरंगाबाद - लाडसावंगीजवळील आलमपूर शिवारातील कपाशीवर कीटकनाशक फवारणी केल्याने तीन एकरवरील सरकी वाळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी सहायक गावात येत नसल्यामुळे कृषी दुकानदार जे औषध फवारणी करण्याचा सल्ला देतात तेच शेतकरी शेतात फवारतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी दुकानदार जास्त नफा देणारी औषधे फवारणी करण्याचा सल्ला देऊन शेतकऱ्याची लुटमार करतात.

कीटकनाशक फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान

हेही वाचा - बैल पोळ्याच्या आदल्या दिवशीच विजेचा झटका लागून दोन बैलांचा मृत्यू, शेतकरी गंभीर जखमी

भोगलवाडी क्रमांक २ येथील मदनसिंग फुलसिंग मंडावत या शेतकऱ्याने आलमपूर शिवारात (गट क्रमांक १०/१ ) पाच एकर कपाशी लागवड केली. यात तीन एकरावर १० ऑगस्टला कीटकनाशक व टॉनिक मिसळून फवारले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शेतात गेले असता कपाशीचे पिक करपून गेल्याने कृषी दुकानदाराला हा प्रकार दाखवला. त्याने सुचवलेल्या फवारण्या दोन वेळा केल्या परंतु कपाशीचे पिक सुधारण्याऐवजी वाळून गेल्याने तब्बल तीन एकरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - लातूरमध्ये शेती व्यवसाय धोक्यात; जगावे की मरावे शेतकऱ्यांसमोर प्रश्न

कपाशीवरील औषध फवारणी केल्यानंतर हा प्रकार दुकानदाराला दाखवला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. १७ ऑगस्टला तेच औषध दुकानदारासमोर दुसऱ्या शेतातील कपाशीवर फवारले असता तेही वाळत असल्याचे शेतकऱ्याने दुकानदाराला दाखवले. त्यानंतर दुकानदाराने आरेरावी केल्याचे शेतकऱयाने सांगितले. २० ऑगस्टला औषध दुकानदाराने कंपनीच्या अधिकाऱ्याना वाळलेली कपाशी दाखवायला आणले, मात्र शेतातल्या जमिनीत घटक कमी आहेत म्हणून असे झाले, असा किरकोळ पंचनामा करून अधिकारी निघून गेले. आधीच दुष्काळजन्य परस्थिती त्यात औषध फवारणीने तीन एकर जमिनीवरील कपाशी वाळून गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. वरिष्ठांनी दखर घेऊन संबंधीत औषध दुकानदारावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मदनसिंग मडावत यांनी केली आहे.

Intro:औरंगाबादच्या लाडसावंगी जवळील आलमपुर शिवारात तिन एकर कपाशीवर किटक नाशक फवारणी केल्याने तिन एकर वरील सरकी वाळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.Body:भोगलवाडी क्रमांक २ येथील मदनसिंग फुलसिंग मंडावत या शेतकऱ्याची जमिन आलमपुर शिवारात गट क्रमांक १०/१ मध्ये पाच एकर कपाशी लागवड केली आहे.यात तिन एकरावर १० आॕगस्ट रोजी किटक नाशक व टाॕनिक मिसळून फवारले होते.परंतु दुसऱ्या दिवशी शेतात चकर मारला असता कपाशीचे पिक करपून गेल्याने कृषी दुकानदाराला हा प्रकार दाखवला असता त्याने सुचवलेल्या फवारण्या दोन वेळा केल्या परंतु कपाशीचे पिक सुधारण्या ऐवजी वाळून गेल्याने तब्बल तिन एकर वरील कपाशी वाळून गेली आहे.लाडसावंगी परिसरात कृषी साय्यक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाही महिना महिना गावात येत नसल्यामुळे कृषी दुकानदार जे औषधी फवारणी करण्याचा सल्ला देतात तेच किटक नाशक शेतकरी फवारणी करतात यात शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी दुकानदार जास्त नफा देणारी औषधी फवारणी करण्याचा सल्ला देऊन लुटमार करतात हे विशेष.Conclusion:कपाशी वरिल औषध फवारणी केल्यानंतर हा प्रकार दुकान दाराला दाखवला असता उडवाउडवीचे उत्तरे दिले शिवाय १७ आॕगस्ट रोजी तेच औषध दुकानदारा देखत दुसऱ्या शेतातील कपाशीवर चार तासे फवारले असता ते ही वाळत असल्याने शेतकऱ्याने दुकानदाराला दाखवले असता सदर दुकानदार आरेरावी केल्याचे सांगितले यात २० आॕगस्ट रोजी औषध दुकानदाराने कंपनी चा आधिकारी आहे म्हणून वाळलेली कपाशी दाखवयाला आनले मात्र शेतातील जमिनीत घटक कमी आहे म्हणून असे झाले आहे व किरकोळ पंचनामा करून निघून गेले. मात्र आधिच दुष्काळ जन्य परिस्थिती यात औषधी फवारणीने तिन एकर जमिनीवरील कपाशी वाळून गेल्याने शेतकरी हवालदीर झाला आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन संबंधित औषध दुकानदारावर कार्यवाही करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी मदनसिंग मडावत या शेतकऱ्याने केली आहे.
byte - मदनसिंग मडावत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.