ETV Bharat / state

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, भाजपाकडून औरंगाबादमध्ये आंदोलन

गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आज औरंगाबादमध्ये निदर्शने करण्यात आली. दरम्यान भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वेळीच साहित्य जप्त केल्याने भाजपा कार्यकर्त्यांना पुतळा जाळता आला नाही.

author img

By

Published : Mar 21, 2021, 4:47 PM IST

Updated : Mar 21, 2021, 4:53 PM IST

भाजपाकडून औरंगाबादमध्ये आंदोलन
भाजपाकडून औरंगाबादमध्ये आंदोलन

औरंगाबाद- गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आज औरंगाबादमध्ये निदर्शने करण्यात आली. दरम्यान भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वेळीच साहित्य जप्त केल्याने भाजपा कार्यकर्त्यांना पुतळा जाळता आला नाही. दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊनचे आदेश असताना देखील, भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मिळून राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यासाठी प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले, ही बाब महाराष्ट्राला न शोभणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

भाजपाकडून औरंगाबादमध्ये आंदोलन

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्यपाल आणि मुख्यमत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देशमुख यांनी सचिन वझे यांना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे टारगेट दिले होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी कोणत्या हॉटेलमध्ये गैरप्रकार चालतो, अशा 50 हॉटेलची यादी गृहमंत्र्यांकडून वझेंना देण्यात आली होती. हे सर्व मुख्यमंत्र्यांना देखील माहिती होते, त्यामुळे मुख्यमंत्री देखील या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली.

पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद

अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या मागणीसाठी शहर भाजपाच्या वतीने सिडको परिसरात जोरदार निर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलस्थळी येऊन हस्तक्षेप केल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाद्बीक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद- गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आज औरंगाबादमध्ये निदर्शने करण्यात आली. दरम्यान भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वेळीच साहित्य जप्त केल्याने भाजपा कार्यकर्त्यांना पुतळा जाळता आला नाही. दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊनचे आदेश असताना देखील, भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मिळून राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यासाठी प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले, ही बाब महाराष्ट्राला न शोभणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

भाजपाकडून औरंगाबादमध्ये आंदोलन

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्यपाल आणि मुख्यमत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देशमुख यांनी सचिन वझे यांना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे टारगेट दिले होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी कोणत्या हॉटेलमध्ये गैरप्रकार चालतो, अशा 50 हॉटेलची यादी गृहमंत्र्यांकडून वझेंना देण्यात आली होती. हे सर्व मुख्यमंत्र्यांना देखील माहिती होते, त्यामुळे मुख्यमंत्री देखील या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली.

पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद

अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या मागणीसाठी शहर भाजपाच्या वतीने सिडको परिसरात जोरदार निर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलस्थळी येऊन हस्तक्षेप केल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाद्बीक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.

Last Updated : Mar 21, 2021, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.