ETV Bharat / state

Aurangabad Farmers Onion In Telangana : राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल; तेलंगाणात मिळाला चारपट भाव

author img

By

Published : Jun 15, 2023, 1:17 PM IST

Updated : Jun 15, 2023, 2:15 PM IST

कांद्याला कवडीमोल भाव असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले. मात्र तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना तेलंगाणात कांदा पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलंगाणात पाठवलेल्या कांद्याला चारपट जास्त भाव मिळाला आहे.

Aurangabad Farmers Onion In Telangana
तेलंगाणा सरकारने दिला चारपट भाव

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र तेलंगाणा सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. राज्यातून पाठवलेल्या कांद्याला तेलंगाणात पंधराशे ते अठराशे रुपये दर देण्यात आला. महाराष्ट्राच्या मानाने चार पट अधिकचा दर देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर त्याला लागणारे मजूर वाहन गोण्या यांची देखील सोय करण्यात आली होती. आगामी काळात शेतकऱ्यांनी आपला कांदा तेलंगाणाकडेच पाठवावा, असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले.

तेलंगाणात कांद्याला मिळाला चारपट भाव

तेलंगणा सरकारने दिला चौपट दर : राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. रस्त्यावर उतरून आंदोलन केली, कष्टाचा कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. मात्र सरकार दरबारी त्याची दखल घेतली गेली नाही. त्यावेळी हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे कांदा पाठवा असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कन्नड येथील शेतकऱ्यांनी कांदा तेलंगाणाकडे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी लागणारे गोण्या मजूर आणि वाहन पाठवण्यात आले. पहिल्या टप्प्यात चार ट्रक कांदा कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठवला. यावेळी काय भाव मिळेल, फायदा होईल का अशा अनेक शंका शेतकऱ्यांना वाटत होत्या. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दाखल होताच कांद्याचा दर्जा पाहून त्यांना दर देण्यात आला. कमीत कमी दीड हजार ते जास्तीत जास्त 1800 रुपये असा दर कांद्याला मिळाला. राज्यात मिळणाऱ्या दरापेक्षा चार पट अधिक दर मिळाल्याची माहिती बीआरएसचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

Aurangabad Farmers
कांदा उत्पादक शेतकरी

यापुढेही तेलंगाणात कांदा पाठवा : राज्यात गेल्या दोन महिन्यात कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवले. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव देण्यात आला. केलेला खर्च देखील निघाला नाही, गाडीचे भाडे देखील खिशातून भरावे लागले. त्यामुळे आता या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न पडला होता. कन्नड तालुक्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलन करत, शेती मालाला चांगले दर द्या असे आवाहन तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचेकडे केले. बीआरएस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण केले असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात आपला कांदा असो की इतर पीक राज्यात जर दर मिळत नसतील, तर तेलंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठवा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Crop Loss Due To Unseasonal Rain: अवकाळी पावसाने पळवले शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी; साठवलेला कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ
  2. Maharashtra Farmers: राज्यातील कांदा विकत घेण्याची तेलंगणा सरकारची तयारी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र तेलंगाणा सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. राज्यातून पाठवलेल्या कांद्याला तेलंगाणात पंधराशे ते अठराशे रुपये दर देण्यात आला. महाराष्ट्राच्या मानाने चार पट अधिकचा दर देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर त्याला लागणारे मजूर वाहन गोण्या यांची देखील सोय करण्यात आली होती. आगामी काळात शेतकऱ्यांनी आपला कांदा तेलंगाणाकडेच पाठवावा, असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले.

तेलंगाणात कांद्याला मिळाला चारपट भाव

तेलंगणा सरकारने दिला चौपट दर : राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. रस्त्यावर उतरून आंदोलन केली, कष्टाचा कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. मात्र सरकार दरबारी त्याची दखल घेतली गेली नाही. त्यावेळी हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे कांदा पाठवा असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कन्नड येथील शेतकऱ्यांनी कांदा तेलंगाणाकडे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी लागणारे गोण्या मजूर आणि वाहन पाठवण्यात आले. पहिल्या टप्प्यात चार ट्रक कांदा कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठवला. यावेळी काय भाव मिळेल, फायदा होईल का अशा अनेक शंका शेतकऱ्यांना वाटत होत्या. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दाखल होताच कांद्याचा दर्जा पाहून त्यांना दर देण्यात आला. कमीत कमी दीड हजार ते जास्तीत जास्त 1800 रुपये असा दर कांद्याला मिळाला. राज्यात मिळणाऱ्या दरापेक्षा चार पट अधिक दर मिळाल्याची माहिती बीआरएसचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

Aurangabad Farmers
कांदा उत्पादक शेतकरी

यापुढेही तेलंगाणात कांदा पाठवा : राज्यात गेल्या दोन महिन्यात कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवले. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव देण्यात आला. केलेला खर्च देखील निघाला नाही, गाडीचे भाडे देखील खिशातून भरावे लागले. त्यामुळे आता या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न पडला होता. कन्नड तालुक्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलन करत, शेती मालाला चांगले दर द्या असे आवाहन तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचेकडे केले. बीआरएस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण केले असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात आपला कांदा असो की इतर पीक राज्यात जर दर मिळत नसतील, तर तेलंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठवा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Crop Loss Due To Unseasonal Rain: अवकाळी पावसाने पळवले शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी; साठवलेला कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ
  2. Maharashtra Farmers: राज्यातील कांदा विकत घेण्याची तेलंगणा सरकारची तयारी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Last Updated : Jun 15, 2023, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.