ETV Bharat / state

राज्यात जातीय व्यवस्थेमुळे आणखी एका 'आकांक्षे'चा बळी, अमरावतीत तरुणीची आत्महत्या

नाव आकांक्षा तेलमोरे..अमरावतीच्या सार्शीत राहणारी १७ वर्षाची आकांशा आता या जगात नाहीये...आकांक्षाचे गावात राहणाऱ्या विवेक वानखडे या तरुणाशी प्रेमसंबंध होते...ही मुलगी प्रेमातून आपल्याकडे लग्नाची गळ घालेल म्हणून विवेकच्या घरच्यांनी आकांक्षाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या...शेवटी जीवापेक्षाही प्रेमाला जास्त जपणाऱ्या आकांक्षाने आपल्या घरीच गळफास घेऊन स्वतःला संपवून टाकले.

author img

By

Published : Jul 27, 2019, 10:11 PM IST

अमरावतीत तरुणीची आत्महत्या

अमरावती - तिवसा तालुक्यातील सार्शी या गावात राहणाऱ्या आकांक्षा तेलमोरे या तरूणीने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले आहे. आकांक्षाचे घराजवळील विवेक वानखडे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. परंतु, विवेक हा उच्चवर्णीय तर आकांक्षा ही दलित असल्याने मुलाच्या कुटुंबाला हे खटकत होते. प्रेमातून आकांक्षा आपल्याकडे लग्नाची गळ घालेल, म्हणून मुलाच्या कुटुंबाने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या धमक्यांमुळेच आकांक्षाने जीव दिला, असा आरोप आकांक्षाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात जातीय व्यवस्थेचा अजून एक बळी, अमरावतीत तरुणीची आत्महत्या

आकांक्षा तेलमोरे ही १७ वर्षीय तररणी तिवसा शहरात बारावीत शिकत होती. शनिवारी ती शाळेतून घरी आल्यानंतर घरी कुणीच नसल्याचे पाहून तिने बाथरुम मध्ये गळफास घेतला व आपले जीवन संपवले. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या व्यवस्थेनेच तिचा बळी घेतला असल्याचे तिचे कुटुंबीय सांगत आहेत. कुटुंबात आकांक्षा लहान असल्याने सर्वांचीच लाडकी होती. तिच्या जाण्याने तिच्या घरातल्यांना अश्रू अनावर झाले असून आरोपींना अटक करण्याची मागणी ते करत आहे.

young-womans-suicide-in-amravati
पुरोगामी महाराष्ट्रात जातीय व्यवस्थेचा अजून एक बळी, अमरावतीत तरुणीची आत्महत्या

या प्रकरणी माहुली पोलिसांनी प्रियकर विवेक नरेंद्र वानखडे, विक्की वानखडे, नरेंद्र वानखडे व दोन महिला असे एकाच कुटुंबातील पाच जणांवर अट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या घटनेला आठ दिवस उलटूनसुद्धा शुक्रवारी फक्त प्रियकरालाच अटक करण्यांत आली आहे. उर्वरित चार जणांना अद्यपही अटक केली नसल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपीना लवकर अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

अमरावती - तिवसा तालुक्यातील सार्शी या गावात राहणाऱ्या आकांक्षा तेलमोरे या तरूणीने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले आहे. आकांक्षाचे घराजवळील विवेक वानखडे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. परंतु, विवेक हा उच्चवर्णीय तर आकांक्षा ही दलित असल्याने मुलाच्या कुटुंबाला हे खटकत होते. प्रेमातून आकांक्षा आपल्याकडे लग्नाची गळ घालेल, म्हणून मुलाच्या कुटुंबाने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या धमक्यांमुळेच आकांक्षाने जीव दिला, असा आरोप आकांक्षाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात जातीय व्यवस्थेचा अजून एक बळी, अमरावतीत तरुणीची आत्महत्या

आकांक्षा तेलमोरे ही १७ वर्षीय तररणी तिवसा शहरात बारावीत शिकत होती. शनिवारी ती शाळेतून घरी आल्यानंतर घरी कुणीच नसल्याचे पाहून तिने बाथरुम मध्ये गळफास घेतला व आपले जीवन संपवले. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या व्यवस्थेनेच तिचा बळी घेतला असल्याचे तिचे कुटुंबीय सांगत आहेत. कुटुंबात आकांक्षा लहान असल्याने सर्वांचीच लाडकी होती. तिच्या जाण्याने तिच्या घरातल्यांना अश्रू अनावर झाले असून आरोपींना अटक करण्याची मागणी ते करत आहे.

young-womans-suicide-in-amravati
पुरोगामी महाराष्ट्रात जातीय व्यवस्थेचा अजून एक बळी, अमरावतीत तरुणीची आत्महत्या

या प्रकरणी माहुली पोलिसांनी प्रियकर विवेक नरेंद्र वानखडे, विक्की वानखडे, नरेंद्र वानखडे व दोन महिला असे एकाच कुटुंबातील पाच जणांवर अट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या घटनेला आठ दिवस उलटूनसुद्धा शुक्रवारी फक्त प्रियकरालाच अटक करण्यांत आली आहे. उर्वरित चार जणांना अद्यपही अटक केली नसल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपीना लवकर अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Intro:अमरावतीच्या सार्शीत प्रेमप्रकरनात जातीय व्यवस्थेने घेतला आकांशाचा बळी.


प्रियकराच्या कुटुंबियांच्या धमक्यांने तिने स्वतःच संपवलं आपलं जीवन.

-----------------------------------------------

अमरावती अँकर 

फोटोत दिसणाऱ्या या चेहऱ्याकडे जरा निरखून बघा सुंदर, देखना,सोजवळ,यापेक्षा अनेक चांगल्या उपमाही या फोटो समोर कमी पडतील परन्तु या फोटोत दिसणारि ही मुलगी मात्र कायमचीच जग सोडून गेली.आधी प्रेमाच्या आणा भाका करणाऱ्या प्रियकराच्याच कुटुंबाकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने शेवटी तिने आपल्या घरीच गळफास घेऊन स्वतःलाच संपवून टाकलं.


 Vo-1 


ही दुर्दैवी कहाणी आहे.प्रेमाची, अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सार्शी या गावात राहणाऱ्या आकांशाच नकळत एका तरुणाशी प्रेम झाल.जीवापेक्षाही प्रेमाला जास्त जपणारि आकांशा हिचे घराजवळील विवेक वानखडे या तरुनाशी तिचे प्रेमसंबंध होते.परन्तु मुलगा हा उच्चवर्णीय तर आकांशा ही दलित असल्याचं मुलाच्या कुटुंबाला खटकत होत.प्रेमातून मुलगी आपल्याकडे लग्नाची गळ घालेल म्हणुन मुलाच्या कुटूंबाने आपल्या मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप मृतक आकांशाच्या आईने केला आहे.


बाईट-1-आई 

VO-2
आकांशा तेलमोरे ही सतरा वर्षीय तरूणी तिवसा शहरात एका नामांकित शाळेत बारावीला  शिकत होती. शाळेत अगदी हुशार,कंबडी स्पर्धेत अनेक प्रमाणपत्र मिळवणारी होती.शनिवारि ती शाळेतून घरी आल्यानंतर घरी कुणीच नसल्याचे पाहून तिने बाथरुम मध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल .जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या व्यवस्थेने तिचा बळी घेतला .कुटूंबात ती लहान असल्याने सर्वांचीच लाडकी होती.तिच्या जाण्याने तिच्या बहिनीला अश्रू अनावर झाले असून आरोपींना अटक करण्याची मागणी ती करत आहे.


बाईट -2-बहीण
बाईट-3-वडील

Vo-3
प्रेम हे प्रेम असत त्याला कुठली जात नसते हे नेहमी आपण ऐकतो परन्तु स्वतःला उच्चवर्णीय म्हणून घेणाऱ्या जातीच्या ठेकेदाराणी मात्र अनेकदा प्रेमात प्रेम युगलांचे जीव घेतले आहे.असाच हा प्रकार अमरावती जिल्ह्यात घडला आहे.या प्रकरणी माहुली पोलिसांनी प्रियकर विवेक नरेंद्र वानखडे,विक्की नरेंद्र वानखडे,नरेंद्र नानाजी वानखडे व दोन महिला असे एकाच कुटुंबातील पाच जणांवर अट्रोसिटी व इतर
गुन्हे दाखल झाले आहे .

दरम्यान या घटनेला आठ दिवस उलटुन सुद्धा शुक्रवारी फक्त प्रियकरालाच अटक करण्यांत आली उर्वरित चार जणांना अद्यपही अटक केली नसल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.आरोपीना लवकर अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

बाईट-4-सागर भवते वंचित बहूजन आघाडी

Vo-4Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.