ETV Bharat / state

कोरोना प्रतिबंधासाठी सरसावली महिला शक्ती; 36 हजार मास्कची केली निर्मिती

आता महिला बचत गटांनीही मास्कनिर्मितीत आघाडी घेत अत्यल्प कालावधीत 36 हजार मास्कची निर्मिती केली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महिला शक्ती सरसावली असून, जिल्ह्यातील 57 महिला बचत गट मास्कनिर्मितीत योगदान देत आहेत.

author img

By

Published : Apr 11, 2020, 9:24 AM IST

कोरोना
कोरोना

अमरावती - जिल्ह्यातील कारागृहामधील बंदीजनांकडून मास्कनिर्मिती होत असतानाच आता महिला बचत गटांनीही मास्कनिर्मितीत आघाडी घेत अत्यल्प कालावधीत 36 हजार मास्कची निर्मिती केली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महिला शक्ती सरसावली असून, जिल्ह्यातील 57 महिला बचत गट मास्कनिर्मितीत योगदान देत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत मास्कचा तुटवडा भासू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून कारागृहातील बंदीजनांकडून, तसेच महिला बचत गटांकडूनही मास्कनिर्मिती करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात 57 बचत गटांच्या माध्यमातून आतापर्यंत 36 हजाराच्यावर मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. हे मास्क हे माफक दरात उपलब्ध करून दिले जात असून योग्य रितीने स्वच्छ करून पुनर्वापर करण्याच्या योग्यतेचे आहेत. याद्वारे महिला बचत गटाला रोजगारही उपलब्ध होत आहे आणि जनतेसाठी माफक दरात व चांगल्या गुणवत्तेचे मास्क उपलब्ध होत आहेत.

उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचत गटातील महिला ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण व स्वच्छता समिती मार्फत गावामध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये हातभार लावत आहेत. त्याबरोबरच मास्कची निर्मिती करून करून कोरोनाविरोधातील शस्त्र जनतेला उपलब्ध करून देत आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

उमेद अभियानातील बचत गटांना मास्क तयार करण्याबाबत योग्य मार्गदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती मार्फत करण्यात आलेले आहे. यातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील बचत गट महिला मास्क तयार करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये यांच्याकडून बचत गटांकडून निर्मित मास्कची खरेदी करण्यात येत आहे.

पंचायत समिती चिखलदरामार्फत रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी मास्कसाठी बचत गटांकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत 14 वित्त आयोगातील अनुदानातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत बचत गटांकडून मास्कची खरेदी करत आहेत. गटातील महिला देखील गावातील नागरिकांना मास्क वापरण्यासाठी प्रेरित करीत आहे.

विविध गावातील ग्रामसंघांद्वारेही गरजूंना मोफत मास्कचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत बचत गटातील महिलांनी 36 हजारच्या वर मास्क तयार केले असून यामधून 4 लक्ष 80 हजारची विक्री करण्यात आली आहे.

अमरावती - जिल्ह्यातील कारागृहामधील बंदीजनांकडून मास्कनिर्मिती होत असतानाच आता महिला बचत गटांनीही मास्कनिर्मितीत आघाडी घेत अत्यल्प कालावधीत 36 हजार मास्कची निर्मिती केली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महिला शक्ती सरसावली असून, जिल्ह्यातील 57 महिला बचत गट मास्कनिर्मितीत योगदान देत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत मास्कचा तुटवडा भासू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून कारागृहातील बंदीजनांकडून, तसेच महिला बचत गटांकडूनही मास्कनिर्मिती करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात 57 बचत गटांच्या माध्यमातून आतापर्यंत 36 हजाराच्यावर मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. हे मास्क हे माफक दरात उपलब्ध करून दिले जात असून योग्य रितीने स्वच्छ करून पुनर्वापर करण्याच्या योग्यतेचे आहेत. याद्वारे महिला बचत गटाला रोजगारही उपलब्ध होत आहे आणि जनतेसाठी माफक दरात व चांगल्या गुणवत्तेचे मास्क उपलब्ध होत आहेत.

उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचत गटातील महिला ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण व स्वच्छता समिती मार्फत गावामध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये हातभार लावत आहेत. त्याबरोबरच मास्कची निर्मिती करून करून कोरोनाविरोधातील शस्त्र जनतेला उपलब्ध करून देत आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

उमेद अभियानातील बचत गटांना मास्क तयार करण्याबाबत योग्य मार्गदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती मार्फत करण्यात आलेले आहे. यातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील बचत गट महिला मास्क तयार करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये यांच्याकडून बचत गटांकडून निर्मित मास्कची खरेदी करण्यात येत आहे.

पंचायत समिती चिखलदरामार्फत रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी मास्कसाठी बचत गटांकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत 14 वित्त आयोगातील अनुदानातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत बचत गटांकडून मास्कची खरेदी करत आहेत. गटातील महिला देखील गावातील नागरिकांना मास्क वापरण्यासाठी प्रेरित करीत आहे.

विविध गावातील ग्रामसंघांद्वारेही गरजूंना मोफत मास्कचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत बचत गटातील महिलांनी 36 हजारच्या वर मास्क तयार केले असून यामधून 4 लक्ष 80 हजारची विक्री करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.