ETV Bharat / state

काँग्रेसची कधी रेड्डी काँग्रेस, तर कधी चड्डी काँग्रेस झाली, नितीन गडकरींचा टोला

author img

By

Published : Oct 13, 2019, 6:48 PM IST

देशातील काँग्रेसची कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी रेड्डी काँग्रेस तर कधी चड्डी काँग्रेस झाली अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते.

नितीन गडकरी

अमरावती - देशातील काँग्रेसची कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी रेड्डी काँग्रेस तर कधी चड्डी काँग्रेस झाली अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते.

65 वर्षात काँग्रेस पक्षाने देशाचा कोणता विकास केला याचे चिंतन करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. संत्रा स्वस्त आहे पण त्याच संत्राचा जूस हा महाग आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. पिकले तर भाव मिळत नाही आणि भाव मिळाला तर पिकत नाही. त्यामुळे मजबुरीमधून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गडकरी म्हणाले.

हेही वाचा - 'काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते...'

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावात जाहीर सभा, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

आजही विदर्भात सिंचनाच्या सोयी ज्या प्रमाणात उपलब्ध पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. अमरावती जिल्ह्यात सिंचनासाठी मी ३ हजार कोटी रुपये दिले आहेत. तर जिल्ह्याला 10 हजार कोटी रुपयाचे पॅकेज हे रस्त्यासाठी दिल्याचे गडकरी म्हणाले.

नितीन गडकरींचा काँग्रेसला टोला

50 टक्के जमीन जर सिंचनाखाली आली तर विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आम्ही जे बोलून दाखवतो ते करून दाखवतो असेही गडकरी म्हणाले. मोदींच्या नेतृत्वात देशाचं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रच चित्र बदलल्याचे गडकरी म्हणाले.

नागपूर ते बडनेरा, बडनेरा ते गोंदिया, नागपूर ते नरखेड मेट्रो सुरू करणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील 10 हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. मेट्रो कंपनीचे तीन महिन्यांत भूमिपूजन होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

अमरावती - देशातील काँग्रेसची कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी रेड्डी काँग्रेस तर कधी चड्डी काँग्रेस झाली अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते.

65 वर्षात काँग्रेस पक्षाने देशाचा कोणता विकास केला याचे चिंतन करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. संत्रा स्वस्त आहे पण त्याच संत्राचा जूस हा महाग आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. पिकले तर भाव मिळत नाही आणि भाव मिळाला तर पिकत नाही. त्यामुळे मजबुरीमधून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गडकरी म्हणाले.

हेही वाचा - 'काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते...'

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावात जाहीर सभा, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

आजही विदर्भात सिंचनाच्या सोयी ज्या प्रमाणात उपलब्ध पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. अमरावती जिल्ह्यात सिंचनासाठी मी ३ हजार कोटी रुपये दिले आहेत. तर जिल्ह्याला 10 हजार कोटी रुपयाचे पॅकेज हे रस्त्यासाठी दिल्याचे गडकरी म्हणाले.

नितीन गडकरींचा काँग्रेसला टोला

50 टक्के जमीन जर सिंचनाखाली आली तर विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आम्ही जे बोलून दाखवतो ते करून दाखवतो असेही गडकरी म्हणाले. मोदींच्या नेतृत्वात देशाचं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रच चित्र बदलल्याचे गडकरी म्हणाले.

नागपूर ते बडनेरा, बडनेरा ते गोंदिया, नागपूर ते नरखेड मेट्रो सुरू करणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील 10 हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. मेट्रो कंपनीचे तीन महिन्यांत भूमिपूजन होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

Intro:काँग्रेसची कधी रेड्डी काँग्रेस तर कधी चड्डी काँग्रेस झाली-.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
------------------------------------------
अमरावती अँकर

देशातील काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेस झाली.कधी राष्ट्रवादीची काँग्रेस झाली तर कधी रेड्डी तर कधी चड्डी काँग्रेस झाली अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.


प्रचार सभे दरम्यान बोलताना गडकरी म्हणाले 65 वर्षात काँग्रेस पक्षाने देशाचा कोणता विकास केला याचे चिंतन करणे गरजेचे आहे.देशातील जनता गरीब असल्याचे कारण हे काँग्रेस सरकारचे चुकीचे धोरण आहे.

संत्र स्वस्त आहे पण त्याच संत्राचा जूस हा महाग आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही,पिकल तर भाव मिळत नाही,भाव मिळाला तर पिकत नाही.त्यामुळे मजबुरी मधून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.


आजही विदर्भात सिंचनाच्या सोयी ज्या प्रमाणात उपलब्ध पाहिजे त्या प्रमाणात नाहीअमरावती जिल्ह्यात  सिंचनासाठी मी तीन हजार कोटी रुपये दिले. तर जिल्ह्याला 10 हजार कोटी रुपये चे पॅकेज हे रस्त्यासाठी दिले असे गडकरी म्हणाले. 


50 टक्के जमीन जर सिंचनाखाली आली तर विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करनार नाही.मी फोकळणार केंद्र नाही,जे बोलून दाखवतो ते करून दाखवतो.असंही गडकरी म्हणाले.मोदींच्या नेतृत्वात देशाचं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रच चित्र बदललं आहे.
नागपूर ते बडनेरा ,बडनेरा ते गोंदिया, नागपूर ते नरखेड, ही मेट्रो सुरू करणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातूनविदर्भातील 10  हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. मेट्रो कंपनीचे तीन महिन्यांत भूमिपूजन होईल असे गडकरी म्हणालेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.