ETV Bharat / state

अमरावतीत मंगळवारपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेला सुरुवात

author img

By

Published : Sep 13, 2020, 7:32 PM IST

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी मंगळवारपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य शिक्षण व संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविण्याचे कार्य केले जाणार आहे. त्यामुळे याला नागरिकांनी साथ देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे शासनाचे उद्दिष्ट
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे शासनाचे उद्दिष्ट

अमरावती : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात राबविण्यात येणारी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम जिल्ह्यात मंगळवारपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, एकही घर मोहिमेतून सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे शासनाचे उद्दिष्ट

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण् राज्यभर येत्या 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांचा ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत. या मोहिमेतून एकही घर सुटता कामा नये. नागरिकांनीही स्वयंसेवकांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ठाकूर यांनी केले आहे.

लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे. मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे.

आरोग्य पथकाला सहकार्य करावे :

याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवली जात आहे. हाय रिस्क रुग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

अमरावती जिल्ह्यात यापूर्वी ‘चला अमरावतीकर, मात करुया कोरोनावर’ ही मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येऊन 20 लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - अमरावतीत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल; माजी मंत्री अनिल बोंडेचा गंभीर आरोप

अमरावती : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात राबविण्यात येणारी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम जिल्ह्यात मंगळवारपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, एकही घर मोहिमेतून सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे शासनाचे उद्दिष्ट

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण् राज्यभर येत्या 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांचा ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत. या मोहिमेतून एकही घर सुटता कामा नये. नागरिकांनीही स्वयंसेवकांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ठाकूर यांनी केले आहे.

लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे. मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे.

आरोग्य पथकाला सहकार्य करावे :

याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवली जात आहे. हाय रिस्क रुग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

अमरावती जिल्ह्यात यापूर्वी ‘चला अमरावतीकर, मात करुया कोरोनावर’ ही मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येऊन 20 लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - अमरावतीत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल; माजी मंत्री अनिल बोंडेचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.