अमरावती - वलगाव येथील 'हिंदू मुस्लीम कौमी एकता मंच' चे कार्यकर्ते अनिसभाई अहेमद मिर्झा यांच्या सायमा नाज व अदिबा सानिया या दोन मुली आहेत. त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोन्ही शूरवीर राजांच्या धार्मिक दृष्टिकोनाबाबतची माहिती दिली आहे. समाजबांधवांना कळावी, या अनुषंगाने ही पत्रिका तयार करण्यात आली आहे.

ही पत्रिका वैचारिक प्रगल्भतेची साक्ष - टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन दान दिली, तर काशीच्या मंदिरात १० हजार सोन्याचे शिक्के दान दिले होते. त्याचप्रमाणे गुरू याकूब शाहा यांच्या दर्ग्यासाठी शिवाजी महाराजांनी १०० एकर जमीन दान दिली होती. तसेच, रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरासोबतच मशीदही बांधली असल्याचे त्या पत्रिकेत नमूद आहे. सध्याच्या काळात धार्मिक तेढ वाढले असताना, या दोन धर्मातील अंतर कमी व्हावे, यासाठी अनिस भाईंची ही कृती म्हणजे त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्षच आहे.