ETV Bharat / state

खासदार नवनीत राणांनी शेतात केली सोयाबीनची पेरणी; कर्जमाफीवरून राज्य सरकारवर साधला निशाणा - navneet rana sowed soyabean

अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी एका शेतात सोयाबीनची पेरणी केली. यावेळी कर्जमाफीच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. तर अन्नधान्य पुरवल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.

खासदार नवनीत राणा
खासदार नवनीत राणा
author img

By

Published : Jun 15, 2020, 5:06 PM IST

अमरावती - राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मात्र, अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. तरीही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एका शेतात सोयाबीनची पेरणी सुरू असताना खासदार नवनीत राणा तेथे पोहचल्या. राणांनीही शेतात महिलांसोबत पेरणी केली. दरम्यान पेरणी करताना कर्जमाफीवरून राणांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सध्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेरणीच्या कामाला लागला आहे. गेल्या वर्षीही खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी एका शेतात जाऊन पेरणी केली होती. यावर्षी सुध्दा खासदार नवनीत राणा यांनी एक शेत गाठून सोयाबीनची पेरणी केली. यावेळी बोलताना सरकारचे काही बँकांना लेखी आदेशच नसल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होत नसल्याची टीका खासदार राणा यांनी केली.

खासदार नवनीत राणांनी शेतात केली सोयाबीनची पेरणी

लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने आणि उद्योगधंदे बंद होते. मात्र, शेतकऱ्यांचे काम थांबले नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात गोरगरीबांना राज्य व केंद्र सरकार ने जो धान्यपुरवठा केला तो केवळ शेतकऱ्यांमुळेच शक्य होऊ शकला, असे म्हणत खासदार नवीन राणांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.

अमरावती - राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मात्र, अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. तरीही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एका शेतात सोयाबीनची पेरणी सुरू असताना खासदार नवनीत राणा तेथे पोहचल्या. राणांनीही शेतात महिलांसोबत पेरणी केली. दरम्यान पेरणी करताना कर्जमाफीवरून राणांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सध्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेरणीच्या कामाला लागला आहे. गेल्या वर्षीही खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी एका शेतात जाऊन पेरणी केली होती. यावर्षी सुध्दा खासदार नवनीत राणा यांनी एक शेत गाठून सोयाबीनची पेरणी केली. यावेळी बोलताना सरकारचे काही बँकांना लेखी आदेशच नसल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होत नसल्याची टीका खासदार राणा यांनी केली.

खासदार नवनीत राणांनी शेतात केली सोयाबीनची पेरणी

लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने आणि उद्योगधंदे बंद होते. मात्र, शेतकऱ्यांचे काम थांबले नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात गोरगरीबांना राज्य व केंद्र सरकार ने जो धान्यपुरवठा केला तो केवळ शेतकऱ्यांमुळेच शक्य होऊ शकला, असे म्हणत खासदार नवीन राणांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.