ETV Bharat / state

अमरावतीत बाजार समित्या बंद; शेतमाल विकायचा कुठे? खरीप हंगामासाठी पैसाच नाही

author img

By

Published : May 20, 2021, 7:41 AM IST

शेतकऱ्यांना पेरणीची पूर्वतयारी करण्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागते. घरात असलेला शेतमाल विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून शेतकरी बियाणे खतांची खरेदी करतात. परंतु गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आम्ही शेतमाल विकायचा कुठे व पेरणी करायची कशी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.

amaravati lockdown ,  lockdown effect on farmers ,  लॉकडाऊनचा परिणाम ,  अमरावती लॉकडाऊन
बाजार समित्या बंद

अमरावती- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील मागील दहा दिवसापासून बंद आहेत. त्यातच आता खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतमाल विक्री अभावी घरी पडून असल्याने शेताची मशागतीला पैसे कुठून आणायचे, बी बियाणे कसे खरेदी करायचे? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल तसाच पडून आहे. त्यामुळे तत्काळ जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना पेरणीची पूर्वतयारी करण्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागते. घरात असलेला शेतमाल विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून शेतकरी बियाणे खतांची खरेदी करतात. परंतु गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आम्ही शेतमाल विकायचा कुठे व पेरणी करायची कशी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.

बाजार समित्या बंद असल्यानं शेतकरी हवालदिल...

बहुतेक शेतकऱ्यांच्या घरी गहू, तूर, भुईमूग सोयाबीन आदी शेतमाल पडून आहे. बाजार समिती उघडली की तो माल विकून शेतकऱ्यांना पुढचे नियोजन करावे लागणार आहे. शेतमाल विकून मिळणाऱ्या रकमेतून कौटुंबिक गरजांसोबत शेतातील पेरणीची व्यवस्था शेतकरी करतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे बाजार समितीने खरेदी केलेले धान्य खराब होत असून व्यापारी वर्गाला फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाजार समिती सुरू करावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे.

गावातील व्यापारी मागतात कमी भावाने शेतमाल -

सध्या बाजार समिती बंद असल्याने शेतमाल घरात पडून आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे, त्या शेतकऱ्यांकडून काही गावातील व्यापाऱ्यांकडून अतिशय कमी दरात शेतमाल खरेदी करत आहेत. त्यामुळे प्रचंड नुकसान आहे. शासनाने बाजार समित्या सुरू केल्या तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजीपाला कोणी घेईना -

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार तसेच भाजी बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतमाल शेतात पडून आहे. शेतकरी आधीच संकटात असताना बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.

अमरावती- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील मागील दहा दिवसापासून बंद आहेत. त्यातच आता खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतमाल विक्री अभावी घरी पडून असल्याने शेताची मशागतीला पैसे कुठून आणायचे, बी बियाणे कसे खरेदी करायचे? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल तसाच पडून आहे. त्यामुळे तत्काळ जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना पेरणीची पूर्वतयारी करण्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागते. घरात असलेला शेतमाल विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून शेतकरी बियाणे खतांची खरेदी करतात. परंतु गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आम्ही शेतमाल विकायचा कुठे व पेरणी करायची कशी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.

बाजार समित्या बंद असल्यानं शेतकरी हवालदिल...

बहुतेक शेतकऱ्यांच्या घरी गहू, तूर, भुईमूग सोयाबीन आदी शेतमाल पडून आहे. बाजार समिती उघडली की तो माल विकून शेतकऱ्यांना पुढचे नियोजन करावे लागणार आहे. शेतमाल विकून मिळणाऱ्या रकमेतून कौटुंबिक गरजांसोबत शेतातील पेरणीची व्यवस्था शेतकरी करतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे बाजार समितीने खरेदी केलेले धान्य खराब होत असून व्यापारी वर्गाला फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाजार समिती सुरू करावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे.

गावातील व्यापारी मागतात कमी भावाने शेतमाल -

सध्या बाजार समिती बंद असल्याने शेतमाल घरात पडून आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे, त्या शेतकऱ्यांकडून काही गावातील व्यापाऱ्यांकडून अतिशय कमी दरात शेतमाल खरेदी करत आहेत. त्यामुळे प्रचंड नुकसान आहे. शासनाने बाजार समित्या सुरू केल्या तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजीपाला कोणी घेईना -

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार तसेच भाजी बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतमाल शेतात पडून आहे. शेतकरी आधीच संकटात असताना बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.