ETV Bharat / state

अमरावतीत मुसळधार : शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल माल पावसात भिजला

author img

By

Published : Jun 11, 2020, 7:23 AM IST

बुधवारी (दि.10 जून) अमरावतीत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेले शेतमाल
नुकसान झालेले शेतमाल

अमरावती - नैसर्गिक आपत्ती, कोरोना व टाळेबंदीने बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. भर उन्हाळ्यात मेहनत करून शेतकऱ्यांनी पिकवलेला भुईमूग व गहू अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला आणला होता. पण, बुधवारी (दि. 10 जून) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा गहू व भुईमूग पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेले शेतमाल
बुधवारी दुपारी 3 ते 4 या एक तासाच्या कालावधीत अमरावती शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विकायला आणलेला हजारो क्विंटल भुईमूग व गहू पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता अवघ्या काही दिवसांवर पेरणीचा हंगाम येऊन ठेपला असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणण्यासाठी बाजार समितीत मोठी गर्दी केली आहे. बाजार समितीत उभारण्यात आलेल्या शेडमध्ये आधीच शेतमाल पडून असल्याने शेतकऱ्यांना आपला हजारो क्विंटल माल हा उघड्यावर ठेवावा लागतो. याच दरम्यान बुधवारी दुपारी अमरावती शहरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस इतका मुसळधार होता की बाजार समितीतील परिसराला जणू तळ्याचे रूप आले होते.

अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा उघड्यावर असलेला शेतमाल झाकायला सुद्धा वेळ मिळाली नसल्याने हजारो क्विंटल माल तसाच पाण्याने भिजला आहे. याचा सर्वाधिक फटका भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजार समितीमध्ये पाणी शिरल्याने अनेक पोते भुईमुगाच्या शेंगा या पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाजार समितीमधील नाली बांधकामासाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा शेतकऱ्यांचा माल भिजत असल्याने बाजार समितीचे पदाधिकारी काय करतात, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा - अमरावतीत मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस... शेतकऱ्यांना मात्र मान्सूनची प्रतीक्षा

अमरावती - नैसर्गिक आपत्ती, कोरोना व टाळेबंदीने बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. भर उन्हाळ्यात मेहनत करून शेतकऱ्यांनी पिकवलेला भुईमूग व गहू अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला आणला होता. पण, बुधवारी (दि. 10 जून) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा गहू व भुईमूग पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेले शेतमाल
बुधवारी दुपारी 3 ते 4 या एक तासाच्या कालावधीत अमरावती शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विकायला आणलेला हजारो क्विंटल भुईमूग व गहू पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता अवघ्या काही दिवसांवर पेरणीचा हंगाम येऊन ठेपला असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणण्यासाठी बाजार समितीत मोठी गर्दी केली आहे. बाजार समितीत उभारण्यात आलेल्या शेडमध्ये आधीच शेतमाल पडून असल्याने शेतकऱ्यांना आपला हजारो क्विंटल माल हा उघड्यावर ठेवावा लागतो. याच दरम्यान बुधवारी दुपारी अमरावती शहरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस इतका मुसळधार होता की बाजार समितीतील परिसराला जणू तळ्याचे रूप आले होते.

अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा उघड्यावर असलेला शेतमाल झाकायला सुद्धा वेळ मिळाली नसल्याने हजारो क्विंटल माल तसाच पाण्याने भिजला आहे. याचा सर्वाधिक फटका भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजार समितीमध्ये पाणी शिरल्याने अनेक पोते भुईमुगाच्या शेंगा या पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाजार समितीमधील नाली बांधकामासाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा शेतकऱ्यांचा माल भिजत असल्याने बाजार समितीचे पदाधिकारी काय करतात, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा - अमरावतीत मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस... शेतकऱ्यांना मात्र मान्सूनची प्रतीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.