ETV Bharat / state

पीक विम्याच्या तुटपंज्या मदतीने शेकऱ्यांमध्ये नाराजी

author img

By

Published : Nov 18, 2019, 10:56 AM IST

उसनवारी, व्याजाने पैसे काढत शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. मशागत करून पीक जोपासले. मात्र, ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या पावसाने तोंडचे आलेले पीक हिरावून घेतले.

पीक विम्याच्या तुटपंज्या मदतीने शेकऱ्यांतून नाराजीचा सूर

अमरावती- परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजाराची मदत जाहीर केली. मात्र, एकूणच शेतीचे झालेले नुकसान पाहता करण्यात आलेली मदत ही तुटपुंजी आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा सूर सर्व क्षेत्रातून होत आहे.

पीक विम्याच्या तुटपंज्या मदतीने शेकऱ्यांतून नाराजीचा सूर

हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार

उसनवारी, व्याजाने पैसे काढत शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. मशागत करून पीक जोपासले. मात्र, ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या पावसाने तोंडचे आलेले पीक हिरावून घेतले. शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने याचे पंचनामे केले. मात्र, मदत करताना हात आकडता घेतला. हेक्टरी 8 हजार मदत करून शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत.

अमरावती- परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजाराची मदत जाहीर केली. मात्र, एकूणच शेतीचे झालेले नुकसान पाहता करण्यात आलेली मदत ही तुटपुंजी आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा सूर सर्व क्षेत्रातून होत आहे.

पीक विम्याच्या तुटपंज्या मदतीने शेकऱ्यांतून नाराजीचा सूर

हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार

उसनवारी, व्याजाने पैसे काढत शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. मशागत करून पीक जोपासले. मात्र, ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या पावसाने तोंडचे आलेले पीक हिरावून घेतले. शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने याचे पंचनामे केले. मात्र, मदत करताना हात आकडता घेतला. हेक्टरी 8 हजार मदत करून शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत.

Intro:स्पेशल स्टोरी करावी

अवकाळी पावसाने गारद केलं, सरकारने वाऱ्यावर सोडलं आता मदत मागायची कुणाकडे..

अमरावती अँकर
परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी,संत्रा व फळबागाचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी ही अपेक्षा शेतकऱ्यांची होती .मात्र राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटला नाही.त्यामुळे सरकार नावाची व्यवस्था राज्यात नाही.शनिवारी राज्यपालांनी शेतकऱ्यांना 8 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली पण ही तोकडी मदत असून राज्यपालांनी शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली आहे.
अवकाळी पावसाने गारद केलं, सरकारने वाऱ्यावर सोडलं आता मदत मागायची कुणाकडे अशी म्हणण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आली आहे..पाहूया एक रिपोर्ट

Vo-
हे आहेत अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील 70 वर्षीय शेतकरी सुभाष लोमटे.70 वर्ष आयुष्याच्या खरतड प्रवासात या शेतकऱ्याने अनेक ओले कोरडे दुष्काळ डोळ्याने पाहले पण यावर्षी उन्हाळ्यात पडलेला कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने आणलेला ओला दुष्काळ हा सत्तर वर्षात पाहलेल्या अनेक दुष्काळापेक्षा भयावह आहे.सुभाष रावांकडे ही दीड एकर ओलिताची शेती आहे.याच शेतीतून ते भाजीपाला पिकवतात .म्हणतात न साधला तर भाजीपाला नाही तर फक्त पाला यंदा तसच ,13 सदस्यांच्या कुटूंबाला पोहचणारा शेतातील भाजीपाला अवकाळी पावसाने पार सडून गेला .भाजीपाला विक्रीतुन 60,70 हजार येतील ही आशा होती. पण राज्यपालांनी जाहीर केलेली तुटपुंजी मदत 10,12 हजाराच्या आसपास मिळेल..

बाईट-1-सुभाष लोमटे -शेतकरी..-शेतात बसलेले शेतकरी

आता या सोयाबीन कडे बघा डोळ्यातून अश्रू पडतील अशी परिस्थिती, पाण्यात पोहनी लागलेलं हे हाता तोंडाशी आलेलं सोयाबीनच पीक ,ही दुर्दैवी कहाणी आहे.अमरावतीच्या तिवसा तालुक्यातीलच शेंदोळा बुजरूक या गावातील दयाराम राठोड या शेतकऱ्याची दहा एकर वर सोयाबीन पेरल चांगलं उत्पन्न मिळेल या भाबड्या आशेपोटी पोटच्या लेकरा सारखी त्याची वरखाल पण पाण्याचे पिकाचा चुराडा केला आणि तेवढाच चुराडा या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला.राज्य वाऱ्यावर आहे.सरकार नावाची व्यवस्था नाही. अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही.बेभरवशाच्या शेतीला कुनाची साथ नाही.सत्तास्थापणेची फक्त चर्चा सुरू आहे.
राज्यपालांनी मदतीच्या मलमपट्टीची घोषणा केली ,पण फक्त हेक्टरी आठ हजार रुपये.त्यातही दोन हेक्टर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या मदत मिळणार नाही.मग राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तरी कुठल्या कामाची.

बाईट-दयाराम राठोड शेतकरी

या वर्षी अवकाळी पावसाने नुकसान झालेले हजारो शेतकरी अमरावती जिल्ह्यात मिळतील .पण मिळालेली तुटपुंजी ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळनारीच आहे....

स्वप्निल उमप
ETV भारत अमरावती

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.