ETV Bharat / state

शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...

author img

By

Published : Jan 3, 2020, 11:31 AM IST

Updated : Jan 3, 2020, 1:38 PM IST

गेल्या ४ दिवसांपासून विदर्भातील ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी सकाळी पावसासह गारपिटीने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अमरावतीमध्ये मोर्शी, तिवास, वरूड, चांदूर बाजार तालुक्याला याचा फटका बसला आहे. यामध्ये तूर, गहू, कापूस, संत्रा, केळी, हरभरा, भाजीपाला ही पीके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

rain, thunderstorms amravati
गारपीट, पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

अमरावती - शेतात येऊन पाहणी करून गेलो. कापूस वेचणीला आला होता, तर संत्रा तोडायचे होते. आता एक ते दोन दिवसात कापूस वेचायचा आणि संत्रा देखील तोडायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळला. त्यामध्येच गापीटीनेही भर टाकली आणि सर्व काही होत्याचे नव्हते झाले. अशी अवकळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...

गेल्या ४ दिवसांपासून विदर्भातील ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी सकाळी पावसासह गारपिटीने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अमरावतीमध्ये मोर्शी, तिवास, वरूड, चांदूर बाजार तालुक्याला याचा फटका बसला आहे. यामध्ये तूर, गहू, कापूस, संत्रा, केळी, हरभरा, भाजीपाला ही पीके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

राजू गरडे यांनी त्यांच्या शेतात कापूस आणि तूर पीक लावले होते. सर्व काही चांगले होते. यंदा तुरीचे उत्पादन देखील जास्त होणार होते. तसेच कापसाची १ वेचणी झाली होती. दुसऱ्या वेचणीला कापूस आला होता. त्यांनी बुधवारी रात्री जाऊन कापसाची पाहणी केली. आता मजूर पाहून १ ते २ दिवसात कापसाची वेचणी करायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्री पावसासह गारपीट झाली आणि कापूस पूर्ण जमीनदोस्त झाला. त्याच्यासोबतच तूर पिकाचेही अतोनात नुकसान झाले.

सध्या संत्र्याचा हंगाम सुरू आहे. संत्र्याचे उत्पादन देखील चांगले झाले. आता दुसऱ्या दिवशी संत्री तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायची होती. मात्र, गारपीट आली आणि संत्र्यांच्या अक्षरशः सडा पडला. ते पाहून पायाखालची जमीनच सरकरली, असे संत्रा उत्पादक शेतकरी सतीश काळे सांगतात.

अवकाळी पावसाने फक्त या एक-दोन शेतकऱ्यांवर अवकळा आली नाही, तर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे संकट ओढावले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्येही परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांची नासधूस केली. आता कापूस वेचणीला आल्यावर अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे आता शेती करावी की नाही? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.

गेल्या सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांना एकही पैसा मिळाला नाही. आता मात्र, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना किती मदत देते, की फक्त कगदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमरावती - शेतात येऊन पाहणी करून गेलो. कापूस वेचणीला आला होता, तर संत्रा तोडायचे होते. आता एक ते दोन दिवसात कापूस वेचायचा आणि संत्रा देखील तोडायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळला. त्यामध्येच गापीटीनेही भर टाकली आणि सर्व काही होत्याचे नव्हते झाले. अशी अवकळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...

गेल्या ४ दिवसांपासून विदर्भातील ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी सकाळी पावसासह गारपिटीने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अमरावतीमध्ये मोर्शी, तिवास, वरूड, चांदूर बाजार तालुक्याला याचा फटका बसला आहे. यामध्ये तूर, गहू, कापूस, संत्रा, केळी, हरभरा, भाजीपाला ही पीके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

राजू गरडे यांनी त्यांच्या शेतात कापूस आणि तूर पीक लावले होते. सर्व काही चांगले होते. यंदा तुरीचे उत्पादन देखील जास्त होणार होते. तसेच कापसाची १ वेचणी झाली होती. दुसऱ्या वेचणीला कापूस आला होता. त्यांनी बुधवारी रात्री जाऊन कापसाची पाहणी केली. आता मजूर पाहून १ ते २ दिवसात कापसाची वेचणी करायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्री पावसासह गारपीट झाली आणि कापूस पूर्ण जमीनदोस्त झाला. त्याच्यासोबतच तूर पिकाचेही अतोनात नुकसान झाले.

सध्या संत्र्याचा हंगाम सुरू आहे. संत्र्याचे उत्पादन देखील चांगले झाले. आता दुसऱ्या दिवशी संत्री तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायची होती. मात्र, गारपीट आली आणि संत्र्यांच्या अक्षरशः सडा पडला. ते पाहून पायाखालची जमीनच सरकरली, असे संत्रा उत्पादक शेतकरी सतीश काळे सांगतात.

अवकाळी पावसाने फक्त या एक-दोन शेतकऱ्यांवर अवकळा आली नाही, तर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे संकट ओढावले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्येही परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांची नासधूस केली. आता कापूस वेचणीला आल्यावर अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे आता शेती करावी की नाही? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.

गेल्या सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांना एकही पैसा मिळाला नाही. आता मात्र, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना किती मदत देते, की फक्त कगदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:हातातोंडाशी आलेला घास हिसकावत अवकाळी पावसाने आणली पुन्हा शेतकऱ्यांवर "अवकळा."

शेकडो गावात हजारो हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान.
-----–------------------------------------------------
स्पेशल पॅकेज स्टोरी करावी.

अमरावती अँकर
मागील चार दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण आहे.त्यामुळे तूर पीक धोक्यात आली असतानाच. गुरुवारी सकाळी आलेल्या अवकाळी पावसासह गारपीटने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.अमरावती जिल्ह्याला गारपिटीचा जबर फटका बसला आहे.तूर,गहू,कपाशी, संत्रा ,केळी,हरबरा,भाजीपाला ही पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहे.ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने गारद केलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचे भूत बसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.पाहूया एक स्पेशल रिपोर्ट.

Vo-1
गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने अमरावती जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे.218 गावांमधील 26 हजार हेक्टर वरील पिकांना याचा फटका बसला आहे.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी,तिवसा,वरुड,चांदुर बाजार,तालुक्याला फटका बसला आहे.तिवसा तालुक्यातील एका शेतकऱ्याचे केळी पीक तर अक्षरशः पूर्ण खराब झाले. जोरदार आलेल्या गारपिटीचा जबर फटका या शेतकऱ्याला बसला आहे.

बाईट-1-दिपक सावरकर -शेतकरी. शेंदुर्जना बाजार.

Vo-2
आता हे राजू गरडे या शेतकऱ्यांची कपाशी बघा बुधवारी राजू हे शेतांत पहाणी करायला आले.होते.एक दोन दिवसात कापूस वेचू याच्या ते नियोजनात होते.पण गुरुवारी दुपारी शेतातील कपाशीची विदारक चित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमिन सरकली.

बाईट-2-राजू गरडे -कापूस उत्पादक शेतकरी.

Vo-3
आंबट गोड चवीला प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्र्याला सातासमुद्रापार मागणी आहे.संत्रा विक्रीतून यावर्षी तरी आपलं तोंड गोड होईल या आशेवर हा शेतकरी होता.पण गुरुवारी आलेल्या गारपिटीने संपूर्ण शेतात संत्राचा पाडला.

बाईट-3-सतीश काळे-संत्रा उत्पादक शेतकरी

Vo-4
अवकाळी पावसाने फक्त या तीन शेतकऱ्यांवर अवकळा आणली नाही तर जिल्ह्यातील हजारो शेतकरी या अवकाळी पावसाच्या अवकळेच्या छायेत आले आहे.ऑक्टोबरमध्ये आलेय पावसाने सोयाबिन पिकाची दाणादाण केल्यानंतर गुरुवारी आलेल्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची सोकलेली जखम ताजी केली आहे.मागील सरकार ने नुकसान भरपाई ची घोषणा केली मात्र एकही खळकु शेतकऱ्यांच्या फाटक्या खिशात आला नाही.आता मात्र आघाडीचे सरकार किती मदत देते की फक्त पंचनाम्याच्या कागदचं लिखानाने भरून ठेवते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

स्वप्निल उमप
ETV भारत अमरावती.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jan 3, 2020, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.