ETV Bharat / state

गृहमंत्री अनिल देशमुख करणार मूकबधिर 'वर्षा'चे कन्यादान

author img

By

Published : Jan 13, 2020, 11:40 PM IST

गृहमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी वज्झर येथील बालगृहात जाऊन त्याठिकाणच्या मुलांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. येथीलच वर्षा नामक मूकबधिर मुलीचा विवाह ठरला असून तिचे कन्यादान गृहमंत्र्यांनी करावे, असे शंकरबाबा पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता शंकरबाबा पापळकर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता शंकरबाबा पापळकर

अमरावती - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी अचलपूर तालुक्यातील वज्झर येथील अंबादास पंतवैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा तिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता शंकरबाबा पापळकर

गृहमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी वज्झर येथील बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. विशेष म्हणजे यावेळी स्वतः गृहमंत्र्यांनी बालगृहातील चुलीवर स्वतः चहा तयार करून मुलांना पाजला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख चहा बनवताना
गृहमंत्री अनिल देशमुख चहा बनवताना

आश्रमातील मूकबधिर वर्षाचा विवाह याच आश्रमातील समीर याच्याशी ठरला आहे. वर्षाचे कन्यादान गृहमंत्र्यांनी करावे, असे शंकरबाबा पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू असे ते म्हणाले.

हेही वाचा - 'महापुरुषांची विटंबना केल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही'

विशेष म्हणजे, वर्षा ही एक दिवसाची असताना नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली होती. तिला आश्रमात आणून तिचे पालन पोषण करण्यात आले. आज ती २२ वर्षांची झाली आहे. वज्झर येथील आश्रमशाळेत १२३ दिव्यांग मुले असून त्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, शासन नियमानुसार या विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा पापळकर यावेळी म्हणाले. याबाबत आपण सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - 'या' घटनांच्या निषेधार्थ धामणगावरेल्वे बंद; निषेध मोर्चाचेही आयोजन

अमरावती - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी अचलपूर तालुक्यातील वज्झर येथील अंबादास पंतवैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा तिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता शंकरबाबा पापळकर

गृहमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी वज्झर येथील बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. विशेष म्हणजे यावेळी स्वतः गृहमंत्र्यांनी बालगृहातील चुलीवर स्वतः चहा तयार करून मुलांना पाजला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख चहा बनवताना
गृहमंत्री अनिल देशमुख चहा बनवताना

आश्रमातील मूकबधिर वर्षाचा विवाह याच आश्रमातील समीर याच्याशी ठरला आहे. वर्षाचे कन्यादान गृहमंत्र्यांनी करावे, असे शंकरबाबा पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू असे ते म्हणाले.

हेही वाचा - 'महापुरुषांची विटंबना केल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही'

विशेष म्हणजे, वर्षा ही एक दिवसाची असताना नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली होती. तिला आश्रमात आणून तिचे पालन पोषण करण्यात आले. आज ती २२ वर्षांची झाली आहे. वज्झर येथील आश्रमशाळेत १२३ दिव्यांग मुले असून त्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, शासन नियमानुसार या विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा पापळकर यावेळी म्हणाले. याबाबत आपण सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - 'या' घटनांच्या निषेधार्थ धामणगावरेल्वे बंद; निषेध मोर्चाचेही आयोजन

Intro:(वीडियो,फोटो वेब मोजोवर पाठवतो)
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अचलपूर तालुक्यातील वज्झर स्थित स्व. अंबादास पंतवैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृह ला भेट दिली या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा तिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.


Body:गृहमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी वज्झर येथील बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली विशेष म्हणजे यावेळी स्वतः गृहमंत्र्यांनी बालगृहातील चुलीवर स्वतः चहा तयार करून मुलांना पाजला.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आश्रमातील मूकबधिर मुलगी वर्षा हिचा विवाह आश्रमातील मुलगा समीर याच्याशी ठरला असून वर्षाचे कन्यादान गृहमंत्र्यांनी करावे असे शंकरबाबा पापळकर यांनी सांगताच गृह मंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू असे ते म्हणाले. वर्षा ही मुलगी एक दिवसाची असताना ती नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली होती ती व जर येथील आश्रमात तिचे पालन पोषण करण्यात आले आज ती बावीस वर्षांची झाली आहे.
वज्झर येथील आश्रम शाळेत 123 विकलांग मुले आहेत आणि त्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली असून नियमानुसार या विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही तथापि हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा पापळकर यावेळी म्हणाले असता याबाबत आपण सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.