अमरावती - दरवर्षी घरचे पेरणीलायक सोयाबीन बियाणे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी वापरावे, यावर कृषी विभागाचा भर असतो. परंतु, शेतकरी महागड्या बियाण्याच्या कंपनीच्या बॅगांवर जास्त विश्वास ठेवतात. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली आहे. मागच्या खरीप हंगामात पावसामुळे 80% पर्यंत खराब झालेले सोयाबीन व कंपन्यांनी आकारलेले जादा दर यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता ते गावामध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला प्राधान्य देत आहे. गावामध्ये JS-335, 9305, MAUS-158 या जातींचे सोयाबीन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. बियाण्यासाठी हे सोयाबीन उपयोगात आणताना सर्वप्रथम त्याची उगवणक्षमता किती आहे, हे पाहणे अतिशय आवश्यक असते.
अमरावतीत कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकरी करणार घरच्याच सोयाबीन बियाण्याचा वापर
कृषी विभागाच्या समन्वयाने बहुसंख्य शेतकरी घरच्याच सोयाबीन बियाण्याचा वापर करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक दाखवले जातेय. बहुसंख्य शेतकरी स्वतःच आपल्या सोयाबीनची उगवणक्षमता तपासून घेत आहेत. ही क्षमता 65% पेक्षा जास्त आहे, अशा सोयाबीनला गावामध्ये भरपूर मागणी आहे.
अमरावती - दरवर्षी घरचे पेरणीलायक सोयाबीन बियाणे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी वापरावे, यावर कृषी विभागाचा भर असतो. परंतु, शेतकरी महागड्या बियाण्याच्या कंपनीच्या बॅगांवर जास्त विश्वास ठेवतात. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली आहे. मागच्या खरीप हंगामात पावसामुळे 80% पर्यंत खराब झालेले सोयाबीन व कंपन्यांनी आकारलेले जादा दर यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता ते गावामध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला प्राधान्य देत आहे. गावामध्ये JS-335, 9305, MAUS-158 या जातींचे सोयाबीन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. बियाण्यासाठी हे सोयाबीन उपयोगात आणताना सर्वप्रथम त्याची उगवणक्षमता किती आहे, हे पाहणे अतिशय आवश्यक असते.