ETV Bharat / state

अमरावतीत भीषण आग, सात घरे जळून खाक

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील आग लागून घरे जळाल्याची घटना ताजी असताना; सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोली गवळी (ता.मोर्शी) येथे आज सकाळी सात वाजता भीषण आग लागली. आगीत झोपडपट्टी भागातील सात घरे पूर्णपणे जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी आहे.

author img

By

Published : May 7, 2019, 8:01 PM IST

घरांना लागलेली आग

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील आग लागून घरे जळाल्याची घटना ताजी असताना; सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोली गवळी (ता.मोर्शी) येथे आज सकाळी सात वाजता भीषण आग लागली. आगीत झोपडपट्टी भागातील सात घरे पूर्णपणे जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले आहे.

घरांना लागलेली आग


हिरावती अळसपुरे, मंदा नवडे, योगीराज पाटील, मदन डांगे, महिपल सिंग बावरी,चंद्रकला पाटील, प्रमोद पाटील यांच्या घरांना आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे ही आग इतरत्र पसरली. यामुळे अग्निशामक दलाची गाडी येण्यापूर्वीच सर्व घरे जळून खाक झाली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्रल्हाद पकडे यांनी पोलिसांना व अग्निशामक दलाला दिली. आग विझवण्यासाठी मोर्शी नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली.


ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.


योगीराज पाटील यांच्या घरचे गॅस सिलेंडर फुटल्याने ही आग मोठ्या प्रमाणात वाढली. आगीचे लोण दिसताच ज्यांच्या घरी आणखी सिलेंडर होते त्यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर फेकून दिले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून चिंचोली गवळीच्या नागरिकांनी एकजुटीने आग विझवण्यात आटोकाट प्रयत्न केले.

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील आग लागून घरे जळाल्याची घटना ताजी असताना; सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोली गवळी (ता.मोर्शी) येथे आज सकाळी सात वाजता भीषण आग लागली. आगीत झोपडपट्टी भागातील सात घरे पूर्णपणे जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले आहे.

घरांना लागलेली आग


हिरावती अळसपुरे, मंदा नवडे, योगीराज पाटील, मदन डांगे, महिपल सिंग बावरी,चंद्रकला पाटील, प्रमोद पाटील यांच्या घरांना आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे ही आग इतरत्र पसरली. यामुळे अग्निशामक दलाची गाडी येण्यापूर्वीच सर्व घरे जळून खाक झाली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्रल्हाद पकडे यांनी पोलिसांना व अग्निशामक दलाला दिली. आग विझवण्यासाठी मोर्शी नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली.


ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.


योगीराज पाटील यांच्या घरचे गॅस सिलेंडर फुटल्याने ही आग मोठ्या प्रमाणात वाढली. आगीचे लोण दिसताच ज्यांच्या घरी आणखी सिलेंडर होते त्यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर फेकून दिले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून चिंचोली गवळीच्या नागरिकांनी एकजुटीने आग विझवण्यात आटोकाट प्रयत्न केले.

Intro:अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात भीषण आग
सात घरे जळून खाक;20 लाख रुपयांचे नुकसान

अँकर
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील आग लागून घरे जळाल्याची घटना ताजी असताना मोर्शी पासून आठ किलोमीटर अंतरावर सह्याद्री पहाडा च्या पायथ्याशी असलेल्या चिंचोली गवळी येथे मंगळवारी सकाळी सात वाजता लागलेल्या आगीत झोपडपट्टी भागातील सात घरे पूर्णपणे जळून खाक झाले असून आगीत त्यांची घरे जळाली त्यांची नावे खालील प्रमाणे हिरावती अळसपुरे, मंदा नवडे , योगीराज पाटील, मदन डांगे, महिपल सिंग बावरी ,चंद्रकला पाटील ,प्रमोद पाटील, यांच्या घरांना आगीने रुद्र रूप धारण केल्याने पाहाडी जोरदार हवा असल्याने अग्निशामक दलाची गाडी येण्यापूर्वीच सर्व जळून खाक झाली. सकाळी सात वाजताच्या दरम्यान आग लागल्याची की माहिती प्रल्हाद पकडे यांनी पोलिस स्टेशन व कार्यालयांना दिली आग विजवण्यासाठी मोर्शी नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली. गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं म्हणणे आहे . घटनेची माहिती मिळताच मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व आगग्रस्त त्यांचे म्हणणे ऐकून घेतले . या आगीत घरगुती साहित्य म्हणून कूलर पंखा फ्रिज गोदरेज अलमारी घरी साठवणूक करण्यात आलेले धान्य पूर्णपणे जळून खाक झाले.
योगीराज पाटील यांच्या घरचे गॅस सिलेंडरची सिलेंडर फुटल्याने ही आग मोठ्या प्रमाणात वाढली आगीच्या लाडक्या दिसताच ज्यांच्या घरी आणखी सिलेंडर होते त्यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर फेकून दिले या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून चिंचोली गवळी च्या नागरिकांनी एकजुटीने आग विझवण्यात ऑटोकट प्रयत्न केले.Body:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.