ETV Bharat / state

अकोल्यातील प्रसिद्ध पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर; शेतकरी आर्थिक संकटात

author img

By

Published : Nov 20, 2019, 3:38 PM IST

Updated : Nov 20, 2019, 4:52 PM IST

राज्यभरातून मागणी असलेल्या अकोला जिल्ह्यातील चविष्ट 'कपुरी पानाची' ओळख आता संपण्याच्या मार्गावर आहे. पानवेलीवर येणारे बुरशीजन्य विविध रोग, कुठलेही संशोधित कीटकनाशके किंवा खते उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस पानवेलीचे उत्पादन कमी होत आहे

अकोल्यातील प्रसिद्ध पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर

अकोला - कधीकाळी पानमळ्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्हातील अकोट, हिवरखेड, दानापूर, सोगोडा यासह अनेक गावातील पानमळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यभरातून मागणी असलेल्या अकोला जिल्ह्यातील चविष्ट 'कपुरी पानाची' ओळख आता संपण्याच्या मार्गावर आहे.

पानवेलीवर येणारे बुरशीजन्य विविध रोग, कुठलेही संशोधित कीटकनाशके किंवा खते उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस पानवेलीचे उत्पादन कमी होत आहे. यासोबतच पीक विम्यामध्ये नसलेला समावेश यासह अन्य कारणामुळे जिल्ह्यातील पानमळे नामशेष होऊन पानउद्योग संपण्याची चिन्हे दिसत आहेत. दरवर्षी जिल्ह्यातील पानमळ्यातून विक्रमी उत्पादन होणाऱ्या 'पट्टी आणी कपुरी' पानांना राज्यभरातील बाजारातुन विक्रमी मागणी असायची. त्यामुळे अकोट आणि तेल्हारा तालुक्यातून रोज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर पानांच्या पेट्या विक्रीसाठी राज्यभरात निर्यात व्हायच्या. परंतु, आज पानमळेच नामशेष होत असल्याने अकोट -तेल्हारा आगारातील एसटीचे उत्पन्नही कमी झाले आहे.

अकोल्यातील प्रसिद्ध पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर

यावर्षी पानवेलीवर बुरशीजन्य रोग, कीड यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पानवेलीची वाढ मध्येच खुंटली आहे. हिरवीगार पाने तयार होण्याअगोदरच ती रोगामुळे पिवळी पडून गळू लागल्याने यावर्षी पानवेलीवर केलेल्या खर्चा इतकेही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी न पडल्याने पान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने शेतातील प्रत्येक पिकाचा विम्यामध्ये समावेश केलेला आहे. परंतु विड्याच्या पानांची शेती करणाऱ्यांना पीकविम्यातून वगळण्यात आल्याने पानवेलीच्या कुठल्याच नुकसानीचा लाभ पीकविमा स्वरूपात उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे, पान उत्पादक शेतकऱ्यांची दुसरी पिढी पानशेतीकडून दूर जात असल्याने जिल्ह्यातील पानमळे आज शेवटची घटका मोजत आहे.

अकोला - कधीकाळी पानमळ्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्हातील अकोट, हिवरखेड, दानापूर, सोगोडा यासह अनेक गावातील पानमळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यभरातून मागणी असलेल्या अकोला जिल्ह्यातील चविष्ट 'कपुरी पानाची' ओळख आता संपण्याच्या मार्गावर आहे.

पानवेलीवर येणारे बुरशीजन्य विविध रोग, कुठलेही संशोधित कीटकनाशके किंवा खते उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस पानवेलीचे उत्पादन कमी होत आहे. यासोबतच पीक विम्यामध्ये नसलेला समावेश यासह अन्य कारणामुळे जिल्ह्यातील पानमळे नामशेष होऊन पानउद्योग संपण्याची चिन्हे दिसत आहेत. दरवर्षी जिल्ह्यातील पानमळ्यातून विक्रमी उत्पादन होणाऱ्या 'पट्टी आणी कपुरी' पानांना राज्यभरातील बाजारातुन विक्रमी मागणी असायची. त्यामुळे अकोट आणि तेल्हारा तालुक्यातून रोज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर पानांच्या पेट्या विक्रीसाठी राज्यभरात निर्यात व्हायच्या. परंतु, आज पानमळेच नामशेष होत असल्याने अकोट -तेल्हारा आगारातील एसटीचे उत्पन्नही कमी झाले आहे.

अकोल्यातील प्रसिद्ध पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर

यावर्षी पानवेलीवर बुरशीजन्य रोग, कीड यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पानवेलीची वाढ मध्येच खुंटली आहे. हिरवीगार पाने तयार होण्याअगोदरच ती रोगामुळे पिवळी पडून गळू लागल्याने यावर्षी पानवेलीवर केलेल्या खर्चा इतकेही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी न पडल्याने पान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने शेतातील प्रत्येक पिकाचा विम्यामध्ये समावेश केलेला आहे. परंतु विड्याच्या पानांची शेती करणाऱ्यांना पीकविम्यातून वगळण्यात आल्याने पानवेलीच्या कुठल्याच नुकसानीचा लाभ पीकविमा स्वरूपात उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे, पान उत्पादक शेतकऱ्यांची दुसरी पिढी पानशेतीकडून दूर जात असल्याने जिल्ह्यातील पानमळे आज शेवटची घटका मोजत आहे.

Intro:अकोला - कधीकाळी पानमळ्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्हातील अकोट, हिवरखेड, दानापूर, सोगोडा यासह अनेक गावातील पानमळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर असून राज्यभरातून मागणी असलेल्या अकोला जिल्ह्यातील चविष्ट 'कपुरी पानाची' ओळख आता संपण्याच्या मार्गावर आहे. पानवेलीवर येणारे बुरशीजन्य विविध रोग,कुठलेही संशोधित कीटकनाशके किंवा खते उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस कमी होत असलेले पानवेलीचे उत्पादन,पीक विम्यामध्ये नसलेला समावेश यासह अन्य कारणामुळे जिल्हातील पानमळे नामशेष होऊन पानउद्योग संपण्याची चिन्हे दिसत आहेत.Body:दरवर्षी जिल्ह्यातील पानमळ्यातून विक्रमी उत्पादन होणाऱ्या 'पट्टी आणी कपुरी' पानांना राज्यभरातील बाजारातुन विक्रमी मागणी असायची त्यामुळे अकोट आणि तेल्हारा तालुक्यातून रोज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसवर पानांच्या पेट्या विक्रीसाठी राज्यभरात निर्यात व्हायच्या परंतु आज पानमळेच नामशेष होत असल्याने पानांच्या पेट्याची वाहतूक होत नसल्याने अकोट -तेल्हारा आगारातील एसटीचे उत्पनही कमी झाले आहे. यावर्षी पानवेलीवर बुरशीजन्य रोग,कीड यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पानवेलीची वाढ मधेच खुंटली आहे. हिरवीगार पाने तयार होण्या अगोदरच ती रोगामुळे पिवळी पळून गळू लागल्याने यावर्षी पानवेलीवर केलेल्या खर्चा एवढेही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी न पडल्याने पान उत्पादक शेतकरी चिंतातुर आहे.
शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शेतातील प्रत्येक पिकाचा विम्यामध्ये समावेश केलेला आहे परंतु विड्याच्या पानांची शेती करणाऱ्या पणवेलींना पीकविम्यातून वगळण्यात आल्याने पानवेलीच्या कुठल्याच नुकसानीचा लाभ पीकविमा स्वरूपात पानउत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. पिकाच्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांची दुसरी पिढी पानशेती कडून दूर जात असल्याने जिल्ह्यातील पानमळे आज शेवटची घटका मोजत आहे.

बाईट - देविदास हागे
शेतकरीConclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.