ETV Bharat / state

अकोला : 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन नियमावली जाहीर; पाहा, काय राहणार सुरू आणि बंद?

author img

By

Published : May 15, 2021, 10:08 PM IST

कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. रेशन दुकानेही सकाळी सात ते दुपारी ११ वाजेपर्यत सुरू राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत.

district collector office
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला

अकोला - 'ब्रेक द चैन' अंतर्गत नियमावलीमध्ये बदल करीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी नवीन आदेश काढले. या नव्या आदेशात व्यापाऱ्यांना, भाजी विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. या आदेशानुसार, सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. रेशन दुकानेही सकाळी सात ते दुपारी ११ वाजेपर्यत सुरू राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत. तसेच सर्व बँकांमधील कामकाज पुर्वी प्रमाणेच सर्व ग्राहकांसाठी निर्धारित ९ ते १ वेळेत सुरू राहणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी ७ ते सकाळी १२ वाजेदरम्यान करता येईल.

हेही वाचा - कोरोनाला घाबरू नका, परंतु जागरूक रहा; एआयजीची मार्गदर्शिका वाचा!

सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार 22 मेपर्यंत बंद राहतील. या जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत सुरु राहील. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्याचे संनियंत्रण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

संपूर्ण बंद काय राहणार?

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाइन शिक्षण-प्रशिक्षण व परीक्षा घेण्यास प्रतिबंध नाही. मात्र, त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे.

हेही वाचा - 'म्युकरमायकोसिसचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश'

अकोला - 'ब्रेक द चैन' अंतर्गत नियमावलीमध्ये बदल करीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी नवीन आदेश काढले. या नव्या आदेशात व्यापाऱ्यांना, भाजी विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. या आदेशानुसार, सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. रेशन दुकानेही सकाळी सात ते दुपारी ११ वाजेपर्यत सुरू राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत. तसेच सर्व बँकांमधील कामकाज पुर्वी प्रमाणेच सर्व ग्राहकांसाठी निर्धारित ९ ते १ वेळेत सुरू राहणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी ७ ते सकाळी १२ वाजेदरम्यान करता येईल.

हेही वाचा - कोरोनाला घाबरू नका, परंतु जागरूक रहा; एआयजीची मार्गदर्शिका वाचा!

सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार 22 मेपर्यंत बंद राहतील. या जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत सुरु राहील. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्याचे संनियंत्रण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

संपूर्ण बंद काय राहणार?

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाइन शिक्षण-प्रशिक्षण व परीक्षा घेण्यास प्रतिबंध नाही. मात्र, त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे.

हेही वाचा - 'म्युकरमायकोसिसचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.