ETV Bharat / state

अकोल्यात पती-पत्नीची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

author img

By

Published : May 31, 2019, 1:42 PM IST

वारुळे पती-पत्नी इंधन आणण्याकरिता ३० मे'ला सकाळी शेतात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. त्यांचा शोध घेतला असता सकाळी विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आले.

प्रतिकात्मक छायाचित्र

अकोला - अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या ठिकाणी शेतातील कोरड्या शंभर फूट खोल विहिरीमध्ये पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हे दोघेही इंधन गोळा करण्यासाठी ३० मे'ला सकाळी घरातून निघाले होते. समाधान वारुळे आणि बेबीताई वारुळे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

पती-पत्नीने आत्महत्या केलेली विहीर

वारुळे पती-पत्नी इंधन आणण्याकरिता ३० मे'ला सकाळी शेतात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. त्यांचा शोध घेतला असता सकाळी विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.

वारुळे पती-पत्नी मूळ कालवाडी येथील रहिवासी आहेत. मात्र, ते महागाव येथे राहत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि हाताला काम नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तातडीने पोलीस पथक रवाना केले. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अकोला - अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या ठिकाणी शेतातील कोरड्या शंभर फूट खोल विहिरीमध्ये पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हे दोघेही इंधन गोळा करण्यासाठी ३० मे'ला सकाळी घरातून निघाले होते. समाधान वारुळे आणि बेबीताई वारुळे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

पती-पत्नीने आत्महत्या केलेली विहीर

वारुळे पती-पत्नी इंधन आणण्याकरिता ३० मे'ला सकाळी शेतात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही. त्यांचा शोध घेतला असता सकाळी विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.

वारुळे पती-पत्नी मूळ कालवाडी येथील रहिवासी आहेत. मात्र, ते महागाव येथे राहत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि हाताला काम नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तातडीने पोलीस पथक रवाना केले. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Intro:अकोला - अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या भागातील शेतशिवारात कोरड्या शंभर फूट खोल विहिरीमध्ये पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हे दोघेही इंधन गोळा करण्यासाठी 30 मे रोजी सकाळी घरातून निघाले होते. समाधान वारुळे व बेबीताई वारुळे असे मृत पतिपत्नी चे नाव आहे.Body:अकोट तालुका दुष्काळ घोषित झाला आहे. अशा स्थितीत इंधन आणण्याकरीता समाधान वारुळे व बेबीताई वारुळे हे दोघे पती-पत्नी 30 मे रोजी सकाळपासून शेत शिवारात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यांचा शोध घेतला असता सकाळी विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. वारूळे पती-पत्नी मुळ कालवाडी येथील रहिवासी आहेत. सासुसासरे थकलेले असल्याने ते महागाव येथेच राहत होते. त्यांना एका मुलगी व मुलगा आहे. त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. बिकट परिस्थिती व हाताला काम नसल्याने परिस्थिती हलाखीची असल्याचे पोटाची खडगी भरणे कठीण झाल्याचे गावकरी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तातडीने पोलिस पथक रवाना केले आहे.Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ किंवा फोटो नसल्याने आपण लायब्ररीचा उपयोग करावा.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.