ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आयुक्तांचे अकोलेकरांना आवाहन

ईटीव्ही भारतच्या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाकडून प्रकल्पातील पाण्या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढत पाणी काटकसरीने वापरण्याचे, आवाहन अकोलेकरांना केले आहे.

author img

By

Published : Jul 12, 2019, 11:12 PM IST

मनपा आयुक्त संजय कापडणीस

अकोला - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या 4.22 दलघमी पाणी आहे. हे पाणी दीड महिना पुरणार असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाकडून प्रकल्पातील पाण्या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढत पाणी काटकसरीने वापरण्याचे, आवाहन अकोलेकरांना केले आहे.

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.

काटेपूर्णा प्रकल्प मागील वर्षी 96 टक्के भरले होते. या प्रकल्पातील पाणी मुर्तीजापूर शहर आणि खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी वितरित करण्यात येते. त्यासोबतच या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सोडण्यात आले. तसेच या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला. हा साठा एवढा कमी झाला की तो सध्या 4. 22 दलघमी आहे.

विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असला तरीही या प्रकल्पात पावसाचे एक थेंबही पाणी साचलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची पाण्याची पातळी सतत खाली जात असल्यामुळे या प्रकल्पातील पाणी दीड महिना पुरेल असे प्रकल्पाचे अभियंता यांनी सांगितले होते. हे वृत्त ईटीव्ही भारतने नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी महापालिका जलप्रदाय विभागाची बैठक घेऊन प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेत पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून अकोलेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले.

अकोला - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या 4.22 दलघमी पाणी आहे. हे पाणी दीड महिना पुरणार असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाकडून प्रकल्पातील पाण्या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढत पाणी काटकसरीने वापरण्याचे, आवाहन अकोलेकरांना केले आहे.

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.

काटेपूर्णा प्रकल्प मागील वर्षी 96 टक्के भरले होते. या प्रकल्पातील पाणी मुर्तीजापूर शहर आणि खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी वितरित करण्यात येते. त्यासोबतच या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सोडण्यात आले. तसेच या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला. हा साठा एवढा कमी झाला की तो सध्या 4. 22 दलघमी आहे.

विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असला तरीही या प्रकल्पात पावसाचे एक थेंबही पाणी साचलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची पाण्याची पातळी सतत खाली जात असल्यामुळे या प्रकल्पातील पाणी दीड महिना पुरेल असे प्रकल्पाचे अभियंता यांनी सांगितले होते. हे वृत्त ईटीव्ही भारतने नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी महापालिका जलप्रदाय विभागाची बैठक घेऊन प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेत पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून अकोलेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले.

Intro:अकोला - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 4.22 दलघमी पाणी आहे. हे पाणी दीड महिना पुरणार असल्याचे वृत्त ईटीवी भारतने नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाकडून प्रकल्पातील पाण्यासाठी संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढत पाणी काटकसरीने वापरण्याचे, आवाहन अकोलेकरांना केले आहे.


Body:काटेपूर्णा प्रकल्प मागील वर्षी 96 टक्के भरले होते. या प्रकल्पातील पाणी मुर्तीजापुर शहर आणि खांबोरा पाणीपुरवठा योजने वितरित करण्यात येते. त्यासोबतच या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सोडण्यात आले. तसेच या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला. हा साठा एवढा कमी झाला की तो सध्या 4. 22 दलघमी आहे. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असला तरीही या प्रकल्पात पावसाचे एक थेंबही पाणी साचलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची पाण्याची पातळी सतत खाली जात असल्यामुळे या प्रकल्पातील पाणी दीड महिना पुरेल असे प्रकल्पाचे अभियंता यांनी सांगितले होते. हे वृत्त ईटीव्ही भारतने नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी महापालिका जलप्रदाय विभागाची बैठक घेऊन प्रकल्पातील पानिसाठ्याची माहिती घेत पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून अकोलेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले.


Conclusion:सूचना - या बातमीत एटीव्ही भारताचा इम्पॅक्ट आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.