ETV Bharat / state

'अभिनेता गेल्यावर जितकी चर्चा झाली, तितकी दूध आणि उसाबद्दल झाली असती तर..?'

author img

By

Published : Aug 20, 2020, 3:55 PM IST

Updated : Aug 20, 2020, 5:33 PM IST

अहमदनगरमध्ये आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाला वाढीव भाव मिळावा, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी आपले आंदोलन हे केंद्र आणि राज्य सरकार विरोधात असल्याचे सांगितले.

Swabhimani Shetkari Sanghatana agitation in Ahmednagar for increase in milk price
दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर येथे आंदोलन

अहमदनगर - राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षित बेरोजगारांना काम नाही. अनेक कोरोनाबाधितांना उपचार मिळत नाहीत. मात्र, एका अभिनेत्याच्या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

अहमदनगरमध्ये आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाला वाढीव भाव मिळावा, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी आपले आंदोलन हे केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आहे. भाजपने केवळ राजकारणासाठी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. मात्र, केंद्राच्या भूमिकेविरोधात ते शांत आहेत, असा आरोप केला.

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची परिणती दाभोलकरांच्या तपासाप्रमाणे होणार नाही, पवारांनी साधला निशाणा

शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांशी दूध दरवाढ या विषयावर बोलणे झाले आहे. पत्रव्यवहार देखील झाला, त्यानंतरच आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

अहमदनगर शहरातील कोठला चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात काही शेतकऱ्यांनी पशुधन आणले होते. मात्र, पोलिसांनी त्यास परवानगी दिली नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाअगोदरच स्टेट बँक चौकात मोर्चाला अडवण्यात आला. त्यानंतर राजू शेट्टी यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले निवेदन सादर केले.

अहमदनगर - राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षित बेरोजगारांना काम नाही. अनेक कोरोनाबाधितांना उपचार मिळत नाहीत. मात्र, एका अभिनेत्याच्या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

अहमदनगरमध्ये आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाला वाढीव भाव मिळावा, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी आपले आंदोलन हे केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आहे. भाजपने केवळ राजकारणासाठी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. मात्र, केंद्राच्या भूमिकेविरोधात ते शांत आहेत, असा आरोप केला.

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची परिणती दाभोलकरांच्या तपासाप्रमाणे होणार नाही, पवारांनी साधला निशाणा

शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांशी दूध दरवाढ या विषयावर बोलणे झाले आहे. पत्रव्यवहार देखील झाला, त्यानंतरच आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

अहमदनगर शहरातील कोठला चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात काही शेतकऱ्यांनी पशुधन आणले होते. मात्र, पोलिसांनी त्यास परवानगी दिली नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाअगोदरच स्टेट बँक चौकात मोर्चाला अडवण्यात आला. त्यानंतर राजू शेट्टी यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले निवेदन सादर केले.

Last Updated : Aug 20, 2020, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.