ETV Bharat / state

अहमदनगर: विवाहीत महिला आणि पुरुषाची रेल्वेखाली आत्महत्या

पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नसले तरी ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा आहे.

author img

By

Published : Feb 3, 2021, 10:21 AM IST

अहमदनगर: विवाहीत महिला आणि पुरुषाची रेल्वेखाली आत्महत्या
अहमदनगर: विवाहीत महिला आणि पुरुषाची रेल्वेखाली आत्महत्या

अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे एका विवाहित महिला आणि पुरुषाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास श्रीगोंदा- बेलवंडी पोलीस करत आहेत.

आत्महत्या केलेले दोघे विवाहित असून दोघांना अपत्येदेखील आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजता दोघेही घरातून बाहेर पडले ते घरात आले नाहीच. महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली होती. या दोघांची शोधाशोध सुरू असतानाच आज (बुधवार) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दोघांनी मनमाड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नसले तरी ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या पुरुषाला दोन मुली आणि एक मुलगा आहे तर महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत.

अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे एका विवाहित महिला आणि पुरुषाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास श्रीगोंदा- बेलवंडी पोलीस करत आहेत.

आत्महत्या केलेले दोघे विवाहित असून दोघांना अपत्येदेखील आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजता दोघेही घरातून बाहेर पडले ते घरात आले नाहीच. महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली होती. या दोघांची शोधाशोध सुरू असतानाच आज (बुधवार) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दोघांनी मनमाड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नसले तरी ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या पुरुषाला दोन मुली आणि एक मुलगा आहे तर महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.