ETV Bharat / state

बाहेरच्या लोकांनी येऊन शिर्डीतील वातावरण गढुळ करू नये - राधाकृष्ण विखे पाटील

author img

By

Published : Dec 8, 2020, 9:04 PM IST

Updated : Dec 8, 2020, 9:43 PM IST

साई संस्थानच्यावतीने भारतीय पोशाखांबाबतचे आवाहनात्मक फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहे. यास भूमाता ब्रिगडच्या तृप्ती देसाई यांनी विरोध दर्शवत फलक काढण्याबाबत पत्र पाठवले आहे. फलक काढला नाही तर आम्ही येऊन फलक काढू, असा इशारावजा पत्र साई संस्थानला देण्यात आला आहे. यावरुन शिर्डीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात भारतीय पोशाखात मंदिरात येण्याचे भाविकांसाठी फलक लावत आवाहन करण्यात आले आहे. यावरुन संस्थानने तातडीने हे फलक हवावित, अशी मागमी तृप्ती देसाई यांनी केली. फलक न काढल्यास 10 डिसेंबरला येऊन हटवणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे. याविरोधात शिर्डीतील सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ एकवटले आहे. दरम्यान, बाहेरच्या लोकांनी येऊन शिर्डीतील वातावरण गढूळ करू नये, असे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

बाहेरच्या लोकांनी येऊन शिर्डीतील वातावरण गढुळ करू न

देसाईंनी साई संस्थानला पाठवले पत्र

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला आहे. मात्र, अद्याप हा बोर्ड हटवण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही 10 डिसेंबरला हा बोर्ड काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले आहे.

देसाईंच्या तोंडाला काळे फासण्याचा शिवसेना महिला आघाडीने दिला इशारा

दुसरीकडे शिर्डीतील ग्रामस्थांनी साई संस्थानने लावलेल्या आवाहन फलकाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तृप्ती देसाईंनी शिर्डीत येऊन फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास देसाईंच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला. याच बरोबरी साईसंस्थाने लावलेल्या फलकांना भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठींबा दर्शविला आहे.

ग्रामस्थ्यांच्या भूमिकेबरोबर राहू - विखे पाटील

साई मंदीरातील पावित्र्य जपले पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. याबाबत साईबाबा संस्थानने आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. बाहेरच्या लोकांनी शिर्डीतील वातावरण गढूळ करू नये शिर्डीतील ग्रामस्थांनी एकत्रितपणे विचार विनिमय करूनच निर्णय घ्यावा. शिर्डी ग्रामस्थ जी भूमिका घेतील त्याचबरोबर आपण राहू, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

साई संस्थानकडून नोंदवून घेतले जाते भाविकांची अभिप्राय

मंदिरात साई दर्शानासाठी भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, असे अवाहनात्मक फलक लावले आहे, असे स्पष्टीकरण आधीच साई संस्थाने दिले आहे. आता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून पोषाखाबाबतचे अभिप्राय नोंदवून घेतले जात आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांबाबतचे घातक कायदे रद्द करा; अण्णा हजारेंचे आज राळेगणसिद्धीत एकदिवसीय उपोषण

हेही वाचा - 'नाक दाबा, सरकार बरोबर तोंड उघडेल'; भारत बंदला अण्णा हजारेंचा पाठिंबा

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात भारतीय पोशाखात मंदिरात येण्याचे भाविकांसाठी फलक लावत आवाहन करण्यात आले आहे. यावरुन संस्थानने तातडीने हे फलक हवावित, अशी मागमी तृप्ती देसाई यांनी केली. फलक न काढल्यास 10 डिसेंबरला येऊन हटवणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे. याविरोधात शिर्डीतील सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ एकवटले आहे. दरम्यान, बाहेरच्या लोकांनी येऊन शिर्डीतील वातावरण गढूळ करू नये, असे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

बाहेरच्या लोकांनी येऊन शिर्डीतील वातावरण गढुळ करू न

देसाईंनी साई संस्थानला पाठवले पत्र

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला आहे. मात्र, अद्याप हा बोर्ड हटवण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही 10 डिसेंबरला हा बोर्ड काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले आहे.

देसाईंच्या तोंडाला काळे फासण्याचा शिवसेना महिला आघाडीने दिला इशारा

दुसरीकडे शिर्डीतील ग्रामस्थांनी साई संस्थानने लावलेल्या आवाहन फलकाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तृप्ती देसाईंनी शिर्डीत येऊन फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास देसाईंच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला. याच बरोबरी साईसंस्थाने लावलेल्या फलकांना भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठींबा दर्शविला आहे.

ग्रामस्थ्यांच्या भूमिकेबरोबर राहू - विखे पाटील

साई मंदीरातील पावित्र्य जपले पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. याबाबत साईबाबा संस्थानने आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. बाहेरच्या लोकांनी शिर्डीतील वातावरण गढूळ करू नये शिर्डीतील ग्रामस्थांनी एकत्रितपणे विचार विनिमय करूनच निर्णय घ्यावा. शिर्डी ग्रामस्थ जी भूमिका घेतील त्याचबरोबर आपण राहू, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

साई संस्थानकडून नोंदवून घेतले जाते भाविकांची अभिप्राय

मंदिरात साई दर्शानासाठी भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, असे अवाहनात्मक फलक लावले आहे, असे स्पष्टीकरण आधीच साई संस्थाने दिले आहे. आता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून पोषाखाबाबतचे अभिप्राय नोंदवून घेतले जात आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांबाबतचे घातक कायदे रद्द करा; अण्णा हजारेंचे आज राळेगणसिद्धीत एकदिवसीय उपोषण

हेही वाचा - 'नाक दाबा, सरकार बरोबर तोंड उघडेल'; भारत बंदला अण्णा हजारेंचा पाठिंबा

Last Updated : Dec 8, 2020, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.